शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

वन अकादमीमधून जिल्ह्यातील वनाचे वैभव वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : चंद्रपूर हा विपुल वनसंपत्तीने नटलेला जिल्हा आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्याघ्र ...

ठळक मुद्देवनमंत्र्यांचा पुढाकार : देशातील दुसऱ्या क्रमांकाची वन अकादमी चंद्रपुरात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर हा विपुल वनसंपत्तीने नटलेला जिल्हा आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्याघ्र प्रकल्प जिल्ह्यात आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन खात्याचे मंत्रिपद स्वीकारताच चंद्रपूरच्या जंगलाचे वैभव आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पुढाकारातूनच चंद्रपूर देशातील दुसºया क्रमांकाची वन अकादमी उभारण्यात आली आहे. या वन अकादमीमधून वनाधिकारी, वन कर्मचारी सर्व बाजुंनी प्रशिक्षित होणार असून जिल्ह्यातील वनाचे वैभवही वाढणार आहे.उत्तर भारतामध्ये डेहराडूनला ज्या पध्दतीची आयएस झालेल्या उमेदवारांसाठी प्रशिक्षणाची सोय व सुविधा आहे, त्याच पध्दतीची वन कर्मचाऱ्यांसाठी सोयी व सुविधा असणारी प्रशिक्षण संस्था वन अकादमी म्हणून चंद्रपूरमध्ये उभी झाली आहे. चंद्रपूर येथील वन प्रशिक्षण संस्थेचे वन अकादमीमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय ४ डिसेंबर २०१४ रोजी झाला. सदर संस्थेचे नामकरण चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रोबोधिनी (चंद्रपूर फॉरेस्ट अ‍ॅकेडमी आॅफ अ‍ॅडमिनीस्ट्रेशन, डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड मॅनेजमेंट) असे झाले. या वन अकादमीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला पुढाकार ठळकपणे दिसून येतो.वन खात्याची शिखर संस्थावन अकादमीची इमारत देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम इमारत ठरली आहे. या अकादमीमध्ये दीर्घकालीन व्यवसायिक प्रशिक्षणासमवेतच विविध विकास प्रकल्पांचा पर्यावरणीय अभ्यास अहवाल तयार करून देण्यात येणार आहे. पर्यावरण क्षेत्रात संस्थांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे व जनजागृतीचे उपक्रम हाती घेणे, तसेच वनखात्याची शिखर संस्था म्हणून ही अकादमी काम करणार आहे. यामध्ये तांत्रिकी तसेच सेवांतर्गत प्रशिक्षण देण्यात येईल.वन अकादमीत अशी होणार कामेवन अकादमी म्हणजेच वन प्रशिक्षण संस्था चंद्रपूर या प्रशिक्षण संस्थेचा दर्जा वाढवून राज्य वन अकादमीमध्ये रूपांतर करण्यात आले. ही संस्था वन विभागाची अत्यंत महत्त्वपूर्ण संस्था असणार आहे. वन्यजीव व्यवस्थापन, वनापासून होणारे उत्पादन व वनांवर अवलंबून असणारी इतर कामे या संस्थेच्या माध्यमातून होणार आहे.नैसर्गिक आपत्तीचे होणार निवारणचंद्रपुरातील वन अकादमी ही केवळ वनाधिकारी, वन कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याचेच काम करणार नाही. तर जंगलातील वनसंपत्तीचे रक्षण व जतन करण्याचे महत्त्वपूर्ण काम ही संस्था करणार आहे. वन अकादमी संकुल परिसरात वन वणवा व नैसर्गिक आपत्ती निवारण केंद्राची निर्मितीसुध्दा करण्यात येणार आहे. यामुळे चंद्रपूर वन अकादमी आपत्ती निवारणाच्या प्रक्रियेतील महत्वपूर्ण केंद्र म्हणून मान्यता प्राप्त ठरणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग