शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

दोन किलो सोन्याच्या लालसेने गमविले २० लाख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2022 20:26 IST

Chandrapur News विशिष्ट रक्कम दिल्यास सराफा बाजारपेठेपेक्षा दुप्पट सोने देतो,असे आमिष दाखवून राजस्थान येथील भामट्याने बेंबाळ येथील एकाला २० लाखांनी गंडविल्याची घटना तीन दिवसांपूर्वी उघडकीस आली.

ठळक मुद्देबदनामीच्या भीतीपोटी रचली वाटमारीची कथा

चंद्रपूर : विशिष्ट रक्कम दिल्यास सराफा बाजारपेठेपेक्षा दुप्पट सोने देतो,असे आमिष दाखवून राजस्थान येथील भामट्याने बेंबाळ येथील एकाला २० लाखांनी गंडविल्याची घटना तीन दिवसांपूर्वी उघडकीस आली. दरम्यान,बदनामी होईल,या भीतीपोटी त्या व्यक्तीने वाटमारीची कथा रचून तशी तक्रारही केली. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने खरा प्रकार सांगितला. त्यानंतर आधीची तक्रार बदलवून मूल पोलीस ठाण्यात नवीन तक्रार दाखल केली.

व्यवसायाच्या निमित्ताने तीन महिन्यापूर्वी राजस्थान येथील त्या भामट्याची बेंबाळ येथील विवेक नामक व्यक्तीशी भेट झाली. भामट्याने आपण सोन्याचा व्यवसाय करतो, बाजारपेठेपेक्षा ठराविक रक्कमेत दुप्पट शुद्ध सोने विकत देतो,असे सांगून विवेकला सोने घेण्याचा आग्रह केला. विश्वास बसावा,यासाठी भामट्याने शुद्ध सोन्याचे दोन मनी दिले. मनीची सोनाराकडून खात्री झाल्यानंतर विवेकच्या मनात लालसा जागृत झाली. विवेक आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांनी त्या भामट्याशी संपर्क साधला. ठरल्यानुसार विवेक व एक सहकारी गोंडपिपरीला जाऊन त्या भामट्याला २० लाख रुपये दिले आणि दोन किलो सोन्याची बॅग घेऊन बेंबाळला परतले. दुसऱ्या दिवशी सोनाराकडे खात्री करण्यासाठी गेले. मात्र ते बनावट सोने असल्याचे स्पष्ट होताच विवेकने त्या भामट्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र भामट्याशी संपर्क न झाल्याने त्याने गोंडपिपरी गाठली. परंतु,तिथेही त्यांचा पत्ता लागला नाही.

म्हणे दोन युवकांनी पत्नीची पर्स पळवली !

२० लाखांनी फसवणूक झाल्याने बदनामी टाळण्यासाठी आणि पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यातून बचावासाठी विवेकने कथा रंगविली. त्यानुसार,पत्नीसह मूलकडे दुचाकीने येत असताना वाटेत दोन युवकांनी पत्नीची पर्स पळवून नेली. त्यामध्ये अंदाजे ६ लाखांचे सोन्याचे दागिने होते,अशी खोटी तक्रार मूल पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र ठाणेदाराने कसून चौकशी केल्याने खरा प्रकार उघडकीस आला.

अखेर मूल ठाण्यात खरी तक्रार

मूल येथील ठाणेदार सतीशसिंह राजपूत यांनी तपासाची चक्रे फिरविताच वाटमारीची घटनाच घडली नाही,असे सिद्ध झाले. ठाणेदार राजपूत यांनी विवेक आणि त्याच्या पत्नीची तपासणी करताच चक्रावून गेला. शेवटी पितळ उघडे पडेल,या भीतीपोटी चोरीची घटना घडली नसल्याचे विवेकने सांगितले. त्यानंतर वाटमारीची तक्रार मागे घेऊन वास्तविक घटनेची दाखल केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी