शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

दोन किलो सोन्याच्या लालसेने गमविले २० लाख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2022 20:26 IST

Chandrapur News विशिष्ट रक्कम दिल्यास सराफा बाजारपेठेपेक्षा दुप्पट सोने देतो,असे आमिष दाखवून राजस्थान येथील भामट्याने बेंबाळ येथील एकाला २० लाखांनी गंडविल्याची घटना तीन दिवसांपूर्वी उघडकीस आली.

ठळक मुद्देबदनामीच्या भीतीपोटी रचली वाटमारीची कथा

चंद्रपूर : विशिष्ट रक्कम दिल्यास सराफा बाजारपेठेपेक्षा दुप्पट सोने देतो,असे आमिष दाखवून राजस्थान येथील भामट्याने बेंबाळ येथील एकाला २० लाखांनी गंडविल्याची घटना तीन दिवसांपूर्वी उघडकीस आली. दरम्यान,बदनामी होईल,या भीतीपोटी त्या व्यक्तीने वाटमारीची कथा रचून तशी तक्रारही केली. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने खरा प्रकार सांगितला. त्यानंतर आधीची तक्रार बदलवून मूल पोलीस ठाण्यात नवीन तक्रार दाखल केली.

व्यवसायाच्या निमित्ताने तीन महिन्यापूर्वी राजस्थान येथील त्या भामट्याची बेंबाळ येथील विवेक नामक व्यक्तीशी भेट झाली. भामट्याने आपण सोन्याचा व्यवसाय करतो, बाजारपेठेपेक्षा ठराविक रक्कमेत दुप्पट शुद्ध सोने विकत देतो,असे सांगून विवेकला सोने घेण्याचा आग्रह केला. विश्वास बसावा,यासाठी भामट्याने शुद्ध सोन्याचे दोन मनी दिले. मनीची सोनाराकडून खात्री झाल्यानंतर विवेकच्या मनात लालसा जागृत झाली. विवेक आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांनी त्या भामट्याशी संपर्क साधला. ठरल्यानुसार विवेक व एक सहकारी गोंडपिपरीला जाऊन त्या भामट्याला २० लाख रुपये दिले आणि दोन किलो सोन्याची बॅग घेऊन बेंबाळला परतले. दुसऱ्या दिवशी सोनाराकडे खात्री करण्यासाठी गेले. मात्र ते बनावट सोने असल्याचे स्पष्ट होताच विवेकने त्या भामट्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र भामट्याशी संपर्क न झाल्याने त्याने गोंडपिपरी गाठली. परंतु,तिथेही त्यांचा पत्ता लागला नाही.

म्हणे दोन युवकांनी पत्नीची पर्स पळवली !

२० लाखांनी फसवणूक झाल्याने बदनामी टाळण्यासाठी आणि पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यातून बचावासाठी विवेकने कथा रंगविली. त्यानुसार,पत्नीसह मूलकडे दुचाकीने येत असताना वाटेत दोन युवकांनी पत्नीची पर्स पळवून नेली. त्यामध्ये अंदाजे ६ लाखांचे सोन्याचे दागिने होते,अशी खोटी तक्रार मूल पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र ठाणेदाराने कसून चौकशी केल्याने खरा प्रकार उघडकीस आला.

अखेर मूल ठाण्यात खरी तक्रार

मूल येथील ठाणेदार सतीशसिंह राजपूत यांनी तपासाची चक्रे फिरविताच वाटमारीची घटनाच घडली नाही,असे सिद्ध झाले. ठाणेदार राजपूत यांनी विवेक आणि त्याच्या पत्नीची तपासणी करताच चक्रावून गेला. शेवटी पितळ उघडे पडेल,या भीतीपोटी चोरीची घटना घडली नसल्याचे विवेकने सांगितले. त्यानंतर वाटमारीची तक्रार मागे घेऊन वास्तविक घटनेची दाखल केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी