शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

नऊ वर्षांपासून 'त्या' गावाला ग्रामपंचायतच नाही; कसा होणार गावाचा विकास ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 12:47 IST

कसा होणार विकास? : कथा सरडपार गावची, व्यथा ग्रामपंचायतीची !

राजकुमार चुनारकरलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : देशाच्या विकासाची सुरुवात गावखेड्यापासून होते. यासाठी ग्रामपंचायत पंचायतराज व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. ग्रामीण जनतेच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाने राबविलेल्या योजना ग्रामपंचायतमार्फत नागरिकांना पुरविण्यात येतात तर गावातील तंटे, जन्ममृत्यू नोंदी, आरोग्य, शिक्षण या सुविधा ग्रामपंचायतमार्फत नागरिकांना दिल्या जातात. मात्र चिमूर तालुक्यातील सातशे लोकसंख्या असलेल्या सरडपार गावात मागील नऊ वर्षांपासून ग्रामपंचायतच नाही. 

त्यामुळे गावातील नागरिक ग्रामपंचायतसाठी नऊ वर्षांपासून शासन दरबारी पायपीट करीत आहेत. मात्र या बिना ग्रामपंचायतच्या गावाकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधीचेही कमालीचे दुर्लक्ष केले आहे.

सरडपार गाव १९६२ ते २०१५ पर्यंत सरडपार गावची एक गटग्रामपंचायत होती. परंतु २०१५ मध्ये चिमूर नगर परिषद नवीन झाल्याने सरडपार गट ग्रामपंचायतमधील दोन गावे चिमूर नगर परिषदमध्ये समाविष्ट करण्यात आले व सरडपार गावाचे जास्त अंतर पडल्याने वाऱ्यावर सोडून दिले. २०१५ मध्ये सरडपार गाव जवळच्या ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट केले असते तर सरडपार गावाला नऊ वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून वंचित राहावे लागले नसते.

या संदर्भात गट विकास अधिकारी चिमूर, तहसील कार्यालय चिमूर, जिल्हा अधिकारी चंद्रपूर, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले असून मेलद्वारेसुद्धा कळविण्यात आले. तरी या गावाची दखल २०१५ पासून कोणी घेतली नाही. याचा त्रास सरडपार गाववासीयांना होत आहे. तसेच शासकीय कामासाठी लागणारे कागदपत्रे कार्यालय नसल्याने उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक योजनांपासून गावकरी वंचित झाले आहेत

गाव विकासापासून वंचितसरडपार येथे ग्रामपंचायतच नसल्याने हे गाव अनेक समस्यांच्या विळख्यात आहे. कारण विकास करण्यासाठी ग्रामपंचायतसारखे कुठले प्रशासनच नसल्याने नाले, रस्ते, स्वच्छता या सगळ्यांचे तीन तेरा वाजले आहेत. येथील नागरिक शासकीय योजनांपासून वंचित आहे. मुलांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो आहे. दाखला मिळण्यासाठी त्यांना पायपीट करावी लागते. येथील नागरिक गेल्या नऊ वर्षांपासून टाहो फोडत आहे. मात्र शासन दरबारी त्यांचा आवाज अद्यापही पोहोचलेला नाही. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतchandrapur-acचंद्रपूर