शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

११० एकर शेतात फुलविले नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:49 IST

सर्वाधिक संकटांचा सामना शेतकरीवर्ग करीत आहे. निसर्गावर अवलंबून असलेला हा बळीराजा निसर्गाच्याच दगाफटक्याने उद्ध्वस्त होत आहे. मात्र वरोरा तालुक्यातील एका शेतकऱ्याने येणाऱ्या संकटांशी झुंज देत शेतातच नंदनवन फुलविले आहे.

ठळक मुद्देचारगावातील शेतकऱ्यांची किमया : दुय्यम तुरीलाच केले मुख्य पीक

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्वाधिक संकटांचा सामना शेतकरीवर्ग करीत आहे. निसर्गावर अवलंबून असलेला हा बळीराजा निसर्गाच्याच दगाफटक्याने उद्ध्वस्त होत आहे. मात्र वरोरा तालुक्यातील एका शेतकऱ्याने येणाऱ्या संकटांशी झुंज देत शेतातच नंदनवन फुलविले आहे. तूर या पिकालाच मुख्य पीक समजून त्याची विक्रमी लागवड करीत लाखोंचे उत्पन्न घेत त्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर नवा आदर्शच ठेवला.मधुकर भलमे हे अल्पभुधारक शेतकरी आहेत. वरोरा तालुक्यातील चारगाव (बु.) येथील ते रहिवासी आहेत. त्यांच्याकडे केवळ तीन एकर शेती आहे. त्यांनी दहा ते बारा वर्षांपूर्वी शेतात फळझाडांची व इतर पडित जागेवर विविध वृक्षांची लागवड करून उत्पन्न वाढविले होते. त्यानंतर त्यांचे शेतात नवीन प्रयोग करण्याचे धाडस वाढत गेले. हेक्टरी ३६ क्विंटल सोयाबीन पिकवून त्यांनी कृषी विभागाचेही लक्ष वेधले. त्यांनी नवनवीन प्रयोग करून यशस्वीही करून दाखविले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना शासनाने यापूर्वीच कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरविले आहे.एरवी इतर मुख्य पीक शेतात लावल्यानंतर पाळीवर किंवा बांधावर तुरीची लागवड करण्याची सर्वसाधारण पद्धत आहे. मात्र मधुकर भलमे यांनी तुरीचेच मुख्य पीक म्हणून लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रारंभी त्यांनी १० एकर शेती भाडेतत्वावर घेतली. त्यात त्यांनी तुरीचे भरघोष उत्पन्न घेतले. त्यानंतर त्यांनी ३० एकर, आणि आता ११० एकर शेती भाडेतत्वावर त्यांनी घेतली. त्यात केवळ तुरीचीच लागवड केली आहे. ११० एकर शेतातून ६०० ते ७०० क्विंटल तुरीचे उत्पादन होणार, अशी आशा भलमे यांना आहे.कृषी भूषण पुरस्कारमधुकर भलमे यांनी २००५ मध्ये केंद्र शासनाच्या पीक स्पर्धेत भाग घेतला होता. यात त्यांनी सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेऊन दाखविले होते. तेव्हा त्यांनी स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावला होता. यासोबतच त्यांच्या यशस्वी प्रयोगाची दखल घेत २००८ मध्ये कृषी भूषण पुरस्कारही मिळाला.आपल्याकडे कोरडवाहू शेती अधिक आहे. उत्पन्न होत नाही, अशी शेतकऱ्यांची ओरड असते. मात्र आंतर पिकांवर अधिक जोर दिला तर नुकसान भरून काढता येते. मी तूर पीक लावले आहे. ७०० ते ७५० क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. शेतकºयांनी ओरड करण्यापेक्षा शेतात नवनवीन प्रयोग करावे.- मधुकर भलमे, शेतकरी चारगाव (बु.)