शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

११० एकर शेतात फुलविले नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:49 IST

सर्वाधिक संकटांचा सामना शेतकरीवर्ग करीत आहे. निसर्गावर अवलंबून असलेला हा बळीराजा निसर्गाच्याच दगाफटक्याने उद्ध्वस्त होत आहे. मात्र वरोरा तालुक्यातील एका शेतकऱ्याने येणाऱ्या संकटांशी झुंज देत शेतातच नंदनवन फुलविले आहे.

ठळक मुद्देचारगावातील शेतकऱ्यांची किमया : दुय्यम तुरीलाच केले मुख्य पीक

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्वाधिक संकटांचा सामना शेतकरीवर्ग करीत आहे. निसर्गावर अवलंबून असलेला हा बळीराजा निसर्गाच्याच दगाफटक्याने उद्ध्वस्त होत आहे. मात्र वरोरा तालुक्यातील एका शेतकऱ्याने येणाऱ्या संकटांशी झुंज देत शेतातच नंदनवन फुलविले आहे. तूर या पिकालाच मुख्य पीक समजून त्याची विक्रमी लागवड करीत लाखोंचे उत्पन्न घेत त्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर नवा आदर्शच ठेवला.मधुकर भलमे हे अल्पभुधारक शेतकरी आहेत. वरोरा तालुक्यातील चारगाव (बु.) येथील ते रहिवासी आहेत. त्यांच्याकडे केवळ तीन एकर शेती आहे. त्यांनी दहा ते बारा वर्षांपूर्वी शेतात फळझाडांची व इतर पडित जागेवर विविध वृक्षांची लागवड करून उत्पन्न वाढविले होते. त्यानंतर त्यांचे शेतात नवीन प्रयोग करण्याचे धाडस वाढत गेले. हेक्टरी ३६ क्विंटल सोयाबीन पिकवून त्यांनी कृषी विभागाचेही लक्ष वेधले. त्यांनी नवनवीन प्रयोग करून यशस्वीही करून दाखविले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना शासनाने यापूर्वीच कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरविले आहे.एरवी इतर मुख्य पीक शेतात लावल्यानंतर पाळीवर किंवा बांधावर तुरीची लागवड करण्याची सर्वसाधारण पद्धत आहे. मात्र मधुकर भलमे यांनी तुरीचेच मुख्य पीक म्हणून लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रारंभी त्यांनी १० एकर शेती भाडेतत्वावर घेतली. त्यात त्यांनी तुरीचे भरघोष उत्पन्न घेतले. त्यानंतर त्यांनी ३० एकर, आणि आता ११० एकर शेती भाडेतत्वावर त्यांनी घेतली. त्यात केवळ तुरीचीच लागवड केली आहे. ११० एकर शेतातून ६०० ते ७०० क्विंटल तुरीचे उत्पादन होणार, अशी आशा भलमे यांना आहे.कृषी भूषण पुरस्कारमधुकर भलमे यांनी २००५ मध्ये केंद्र शासनाच्या पीक स्पर्धेत भाग घेतला होता. यात त्यांनी सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेऊन दाखविले होते. तेव्हा त्यांनी स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावला होता. यासोबतच त्यांच्या यशस्वी प्रयोगाची दखल घेत २००८ मध्ये कृषी भूषण पुरस्कारही मिळाला.आपल्याकडे कोरडवाहू शेती अधिक आहे. उत्पन्न होत नाही, अशी शेतकऱ्यांची ओरड असते. मात्र आंतर पिकांवर अधिक जोर दिला तर नुकसान भरून काढता येते. मी तूर पीक लावले आहे. ७०० ते ७५० क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. शेतकºयांनी ओरड करण्यापेक्षा शेतात नवनवीन प्रयोग करावे.- मधुकर भलमे, शेतकरी चारगाव (बु.)