शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

११० एकर शेतात फुलविले नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:49 IST

सर्वाधिक संकटांचा सामना शेतकरीवर्ग करीत आहे. निसर्गावर अवलंबून असलेला हा बळीराजा निसर्गाच्याच दगाफटक्याने उद्ध्वस्त होत आहे. मात्र वरोरा तालुक्यातील एका शेतकऱ्याने येणाऱ्या संकटांशी झुंज देत शेतातच नंदनवन फुलविले आहे.

ठळक मुद्देचारगावातील शेतकऱ्यांची किमया : दुय्यम तुरीलाच केले मुख्य पीक

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्वाधिक संकटांचा सामना शेतकरीवर्ग करीत आहे. निसर्गावर अवलंबून असलेला हा बळीराजा निसर्गाच्याच दगाफटक्याने उद्ध्वस्त होत आहे. मात्र वरोरा तालुक्यातील एका शेतकऱ्याने येणाऱ्या संकटांशी झुंज देत शेतातच नंदनवन फुलविले आहे. तूर या पिकालाच मुख्य पीक समजून त्याची विक्रमी लागवड करीत लाखोंचे उत्पन्न घेत त्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर नवा आदर्शच ठेवला.मधुकर भलमे हे अल्पभुधारक शेतकरी आहेत. वरोरा तालुक्यातील चारगाव (बु.) येथील ते रहिवासी आहेत. त्यांच्याकडे केवळ तीन एकर शेती आहे. त्यांनी दहा ते बारा वर्षांपूर्वी शेतात फळझाडांची व इतर पडित जागेवर विविध वृक्षांची लागवड करून उत्पन्न वाढविले होते. त्यानंतर त्यांचे शेतात नवीन प्रयोग करण्याचे धाडस वाढत गेले. हेक्टरी ३६ क्विंटल सोयाबीन पिकवून त्यांनी कृषी विभागाचेही लक्ष वेधले. त्यांनी नवनवीन प्रयोग करून यशस्वीही करून दाखविले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना शासनाने यापूर्वीच कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरविले आहे.एरवी इतर मुख्य पीक शेतात लावल्यानंतर पाळीवर किंवा बांधावर तुरीची लागवड करण्याची सर्वसाधारण पद्धत आहे. मात्र मधुकर भलमे यांनी तुरीचेच मुख्य पीक म्हणून लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रारंभी त्यांनी १० एकर शेती भाडेतत्वावर घेतली. त्यात त्यांनी तुरीचे भरघोष उत्पन्न घेतले. त्यानंतर त्यांनी ३० एकर, आणि आता ११० एकर शेती भाडेतत्वावर त्यांनी घेतली. त्यात केवळ तुरीचीच लागवड केली आहे. ११० एकर शेतातून ६०० ते ७०० क्विंटल तुरीचे उत्पादन होणार, अशी आशा भलमे यांना आहे.कृषी भूषण पुरस्कारमधुकर भलमे यांनी २००५ मध्ये केंद्र शासनाच्या पीक स्पर्धेत भाग घेतला होता. यात त्यांनी सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेऊन दाखविले होते. तेव्हा त्यांनी स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावला होता. यासोबतच त्यांच्या यशस्वी प्रयोगाची दखल घेत २००८ मध्ये कृषी भूषण पुरस्कारही मिळाला.आपल्याकडे कोरडवाहू शेती अधिक आहे. उत्पन्न होत नाही, अशी शेतकऱ्यांची ओरड असते. मात्र आंतर पिकांवर अधिक जोर दिला तर नुकसान भरून काढता येते. मी तूर पीक लावले आहे. ७०० ते ७५० क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. शेतकºयांनी ओरड करण्यापेक्षा शेतात नवनवीन प्रयोग करावे.- मधुकर भलमे, शेतकरी चारगाव (बु.)