शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

एक दिवस कोरडा पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 05:01 IST

नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळून पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ धुवावे, तसेच घरात व परिसरात स्वच्छता ठेवल्यास आजारापासून दूर राहता येईल. विशेष ेम्हणजे, दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मनपाने झोन क्र. २ अंतर्गत १५ कामगारांचे पथक तयार करून बाबूपेठ, महाकाली भिवापूर व भानापेठ प्रभागात डेंग्यू व मलेरिया निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहानगर पालिका : कोरोना काळात सांभाळा आरोग्य

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरासह जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. या पावसाळ्यात साथीच्या आजारांचा धोकाही वाढला आहे. दूषित पाण्याचा पुरवठा, उघड्यावरील खाद्यपदार्थाचे सेवन, दूषित पाण्यातून प्रवास केल्यानंतर घेण्यात न आलेली काळजी, अशा अनेक कारणांमुळे साथीच्या आजाराची लागण होते. विशेषत: पाणी साचत असलेल्या परिसरात डेंग्यू मलेरियासारखे आजार पसरण्याची भीती असल्याने प्रत्येकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर राखी कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.साथीच्या आजारांना कारणीभूत डासांच्या उत्पतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी आवश्यक उपययोजना करणे गरजेचे आहे. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळून पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ धुवावे, तसेच घरात व परिसरात स्वच्छता ठेवल्यास आजारापासून दूर राहता येईल. विशेष ेम्हणजे, दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मनपाने झोन क्र. २ अंतर्गत १५ कामगारांचे पथक तयार करून बाबूपेठ, महाकाली भिवापूर व भानापेठ प्रभागात डेंग्यू व मलेरिया निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली आहे.काही कामगार फवारणी, काही धुरळणी तर इतर कामगारांद्वारे नागरीकांच्या घरी पाण्याने भरलेले कुलर, पाण्याचे टाके, ड्रम रिकामे करून त्यात आबेट नावाचे औषध सोडत आहे त्यामुळे डासांची अंडी नष्ट होण्यास मदत मिळत आहे. मात्र तरीसुद्धा नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन मनपाचे आयुक्त राजेश मोहिते, व महापौर कंचर्लावार यांनी केले आहे.मादी घालते तीन वेळा अंडीडासांचे आयुष्य तीन ते सहा आठवड्यांचे असते. या आयुष्यात डासांची मादी साधारणता, तीन वेळा अंडी घातले. प्रत्येक वेळी साधारणत: ८० ते १०० अंडी घातली जातात. ही अंडी शुल्क अवस्थेतही वर्षभरापर्यंत राहू शकतात. पाण्याशी संपर्क आल्यानंतर ही अंडी फलित होवू शकतात.डासांची अंडी नष्ट करापिंप, ड्रम, बादल्यांमधील पाणी सात दिवसांतून किमान एक वेळा पूर्णपणे बदला. आठवड्यातून किमान एकदिवस कोरडा पाळा. पाणी साठवण्यिाची भांडी कोरडी ठेवून ती कोरड्या फडक्याने पुसून घ्या. जेणेकरुन भांड्याच्या कडांना चिटकलेली डासांची अंडी नष्ट होतील.डासांना अंडी घालण्यासाठी चमचाभर पाणीही पुरेसेमलेरिया व डेंग्यू पसरवित असलेल्या डासाची मादी ही आपली अंडी स्वच्छ व साचलेल्या पाण्यातच घातले. ही अंडी घालण्यासाठी चमचाभर साचलेले पाणीही पुरेसे असते. अंडी घातल्यापासून साधारणपणे आठवड्याभरात डासांची उत्पती होते. हे लक्षात घेऊन आपल्या घरात तसेच परिसरात पाणी साचू देऊ नये, असे आवाहन मनपा आरोग्य विभागाने केले.

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यू