शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
5
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
6
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
7
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
8
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
10
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
11
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
12
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
14
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
15
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
16
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
17
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
18
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
19
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
20
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

फ्लोराईडयुक्त पाण्यावर भागते तहान

By admin | Updated: May 10, 2015 01:06 IST

पाणी म्हणजे जीवन आहे. एखाद्यावेळी तहानेने व्याकूळ झाल्यास पाण्याची महिमा कळून येते .

गोवरी : पाणी म्हणजे जीवन आहे. एखाद्यावेळी तहानेने व्याकूळ झाल्यास पाण्याची महिमा कळून येते . मात्र चिंचोली (खुर्द) गावातील पाणी फ्लोराईडयुक्त असल्याने येथील नागरिकांना नाईलाजाने असे दूषित पाणी प्यावे लागत आहे. शासकीय यंत्रणाच पांगळी झाल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र गावात दिसून येत आहे.राजुरा तालुक्यातील चिंचोली (खुर्द) पूर्वीपासूनच तसे दुर्लक्षित गाव. मात्र चिंचोलीसारख्या गावात शाळा, महाविद्यालय, वसतिगृह व पदवीच्या शिक्षणाची सोय झाल्याने बाहेरील विद्यार्थी शिक्षणासाठी गावात येऊ लागले. त्यामुळे गावाची विकासाकडे वाटचाल सुरू झाली. मात्र स्वातंत्र्यानंतर एवढी वर्ष लोटूनही चिंचोली येथील नागरिकांना फ्लोराईडयुक्त पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. पाण्यामुळे येथील अनेक नागरिकांना साधेदुखी, कमरेचे आजार तर शिक्षण घेत असलेल्या तरुण मुलांचे दात पाण्यामुळे पिवळे पडले आहेत.गावात विहिरी आहेत. परंतु पाण्याची पातळी खोल गेल्याने विहिरींना पाणी नाही. त्यामुळे सरकारी हातपंंपांवर गावकऱ्यांना आपली तहान भागवावी लागत आहे. गावात नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता जलशुद्धीकरणाची एक टाकी गावातील शासकीय हातपंपाजवळ बसविण्यात आली आहे. मात्र त्या टाकीची दूरवस्था झाल्याने शुद्ध पाणी मिळणे कठीण झाले आहे. २०१० मध्ये या गावात तापाची साथ आल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी या गावाला भेट दिल्याने चिंचोली हे गाव अधिकच प्रकाशझोतात आले होते. गावातील दूषित पाणी आणि घाणीचे साम्राज्य यामुळे तापाची साथ आल्याचे स्पष्ट झाले.गावातील फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे गावकऱ्यांचे आयुष्य करपत चालले असून अजूनही प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नाही. त्यामुळे आजही चिंचोली येथील नागरिकांना फ्लोराईडयुक्त पाणी प्यावे लागत आहे. मात्र यावर कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे शासकीय यंत्रणा पांगळी झाली आहे. (वार्ताहर)