शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

फ्लोराईडयुक्त पाण्यावर भागते तहान

By admin | Updated: May 10, 2015 01:06 IST

पाणी म्हणजे जीवन आहे. एखाद्यावेळी तहानेने व्याकूळ झाल्यास पाण्याची महिमा कळून येते .

गोवरी : पाणी म्हणजे जीवन आहे. एखाद्यावेळी तहानेने व्याकूळ झाल्यास पाण्याची महिमा कळून येते . मात्र चिंचोली (खुर्द) गावातील पाणी फ्लोराईडयुक्त असल्याने येथील नागरिकांना नाईलाजाने असे दूषित पाणी प्यावे लागत आहे. शासकीय यंत्रणाच पांगळी झाल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र गावात दिसून येत आहे.राजुरा तालुक्यातील चिंचोली (खुर्द) पूर्वीपासूनच तसे दुर्लक्षित गाव. मात्र चिंचोलीसारख्या गावात शाळा, महाविद्यालय, वसतिगृह व पदवीच्या शिक्षणाची सोय झाल्याने बाहेरील विद्यार्थी शिक्षणासाठी गावात येऊ लागले. त्यामुळे गावाची विकासाकडे वाटचाल सुरू झाली. मात्र स्वातंत्र्यानंतर एवढी वर्ष लोटूनही चिंचोली येथील नागरिकांना फ्लोराईडयुक्त पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. पाण्यामुळे येथील अनेक नागरिकांना साधेदुखी, कमरेचे आजार तर शिक्षण घेत असलेल्या तरुण मुलांचे दात पाण्यामुळे पिवळे पडले आहेत.गावात विहिरी आहेत. परंतु पाण्याची पातळी खोल गेल्याने विहिरींना पाणी नाही. त्यामुळे सरकारी हातपंंपांवर गावकऱ्यांना आपली तहान भागवावी लागत आहे. गावात नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता जलशुद्धीकरणाची एक टाकी गावातील शासकीय हातपंपाजवळ बसविण्यात आली आहे. मात्र त्या टाकीची दूरवस्था झाल्याने शुद्ध पाणी मिळणे कठीण झाले आहे. २०१० मध्ये या गावात तापाची साथ आल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी या गावाला भेट दिल्याने चिंचोली हे गाव अधिकच प्रकाशझोतात आले होते. गावातील दूषित पाणी आणि घाणीचे साम्राज्य यामुळे तापाची साथ आल्याचे स्पष्ट झाले.गावातील फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे गावकऱ्यांचे आयुष्य करपत चालले असून अजूनही प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नाही. त्यामुळे आजही चिंचोली येथील नागरिकांना फ्लोराईडयुक्त पाणी प्यावे लागत आहे. मात्र यावर कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे शासकीय यंत्रणा पांगळी झाली आहे. (वार्ताहर)