शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

गोवरी-सास्ती गावाला पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:20 IST

वेकोलिने जिवंत नाल्याचा प्रवाह बदलला : मातीचे महाकाय ढिगारे टाकल्याने शेकडो हेक्टर शेती बुडण्याची भीती नितीन मुसळे/प्रकाश काळे ...

वेकोलिने जिवंत नाल्याचा प्रवाह बदलला : मातीचे महाकाय ढिगारे टाकल्याने शेकडो हेक्टर शेती बुडण्याची भीती

नितीन मुसळे/प्रकाश काळे

सास्ती / गोवरी : वेकोलिने जिवंत नाल्याचे प्रवाह बदलले. काही ठिकाणी नैसर्गिक नालेच बंद करून नवीन नाल्यांची निर्मिती केली. मातीचे महाकाय ढिगारे नदी, नाल्याच्या किनाऱ्यावर टाकल्याने गोवरी, सास्ती गावाला यंदा मोठ्या प्रमाणात पुराचा धोका निर्माण झाल्याने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु वेकोलिने यावर अजूनही कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही.

राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वेकोलिच्या भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. वेकोलिने कोळसा उत्खननासाठी मातीचे महाकाय ढिगारे सास्ती, गोवरी, पोवनी, साखरी, गोयेगाव, अंतरगाव, बाबापूर परिसरात टाकले आहे. परंतु वेकोलिने मातीचे ढिगारे टाकताना भविष्यात होणाऱ्या धोक्याचा जराही विचार केला नाही. उलट गोवरी, सास्ती, चिंचोली (खु.) परिसरातील जिवंत नाले बदलून नवीन नाले वेकोलिने तयार केले. त्यामुळे यंदा या परिसरातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोवनी २ विस्तारित कोळसा खाणींसाठी वेकोलिने हिरापूर, चिंचोली (खु.) परिसरात नैसर्गिक जिवंत नाल्याचे पात्र बदलून नवीन नाला तयार केला आहे. नैसर्गिक जिवंत नाल्याचे प्रवाह बदलविणे पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे. परंतु वेकोलिने नियम धाब्यावर बसवून सर्रास मातीचे महाकाय ढिगारे नदी, नाल्याच्या किनाऱ्यावर टाकले. तसेच नैसर्गिक नाले बदलविण्यात आल्याने यंदा वेकोलि परिसरात गावांना पुराचा वेढा पडण्याची शक्यता बळावली आहे. कोळसा काढण्याच्या हव्यासापोटी वेकोलि गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ करीत असल्याने वेकोलिचे दुष्परिणाम नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून सहन करावे लागत आहेत. परंतु गावकऱ्यांच्या समस्येशी काहीही घेणेदेणे नसलेल्या वेकोलि प्रशासनाने आजपर्यंत गावकऱ्यांचे हित जोपासले नाही. हे वेकोलि परिसरातील गावकऱ्यांचे दुर्दैव आहे.

कोळसा खाणींचे निर्माण झाल्यापासून वेकोलि परिसरातील गावांमध्ये अन्याय करीत आहे. परंतु स्थानिक प्रशासनाने अद्यापही वेकोलिविरोधात आवाज उठविला नाही. हे न समजणारे कोडेच आहे. त्यामुळे वेकोलिचे दुष्परिणाम गावकरी केव्हापर्यंत सहन करणार, हा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून अनुत्तरितच आहे.

कोट

वेकोलिने गोवरी-सास्ती गावाच्या सभोवताल मातीचे महाकाय ढिगारे टाकले आहेत. मातीच्या ढिगाऱ्याला पाण्याचा प्रवाह अडून यंदा मोठ्या प्रमाणात बॅकवॉटरचा फटका बसण्याची शक्यता आहे. वेकोलिमुळे परिसरातील गावांना पुराचा मोठा धोका निर्माण झाला असून वेकोलिने अजूनही कोणतीच कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही.

- आशा उरकुडे,

सरपंच, गोवरी

कोट

वेकोलिने नदी, नाल्याच्या किनाऱ्यावर टाकलेले मातीचे महाकाय ढिगारे नियमबाह्य आहेत. काही ठिकाणी वेकोलि प्रशासनाने नैसर्गिक नाल्याचे प्रवाह बदलविण्याने परिसरातील गावांना पुराचा वेढा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोबतच शेकडो हेक्टरवरील शेती पाण्याखाली येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

- सुनील चिलविरवार, निसर्गप्रेमी

बॉक्स

गावकऱ्यांच्या नशिबाचे भोग संपेना

राजुरा तालुक्यात जेमतेम ३०-३५ वर्षांपूर्वी कोळसा खाणींचे निर्माण करण्यात आले. सास्ती, गोवरी, पोवनी परिसरात कोळशाचे मुबलक प्रमाणात साठे असल्याने कालांतराने तालुक्याला खुल्या कोळसा खाणींचा वेढा पडला. वेकोलीने कोळसा उत्पादनाच्या हव्यासापोटी नियम धाब्यावर बसविले. त्यामुळे वेकोली परिसरातील गावांना वेकोलिने केलेल्या दुष्परिणामांचा मोठा फटाका बसला आहे. परंतु अजूनही गावकऱ्यांचे भोग संपायला तयार नाही. हे गावकऱ्यांचे दुर्दैव आहे.