शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

नदी काठावरील जोखमीच्या गावांचा पूर ओसरतो, मात्र जखमा कायम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती समुद्रसपाटीची नसल्याने दरड कोसळण्याच्या घटनांची संख्या अत्यल्पच आहे. मात्र, इरई, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता या प्रमुख नद्या आणि उपनद्यांना पूर आल्यास नदीकाठावरील गावांना दरवर्षी पुराचा जोरदार तडाखा बसतो. विशेषत: वैनगंगा नदी काठावरील अतिजोखमीच्या गावांची पावसाळ्यात कोंडी होते. 

ठळक मुद्दे८६ पूरग्रस्त गावांची व्यथा : नवीन सर्वंकष पुनर्वसन धोरणातून न्याय मिळेल काय?

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गत २० वर्षांच्या कालावधीत पुरामुळे गावांचे नुकसान होणे आणि दरड कोसळणे अशा संकटांमुळे जीवित व वित्तहानी झालेल्या अतिजोखमीच्या पूरपीडित गावांसाठी राज्य सरकार नवीन पुनर्वसन धोरण तयार करणार आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील पूरप्रवण ८६ गावांचाही पुनर्वसन व पायाभूत सुविधांच्या यादीत समावेश होणार काय, असा सवाल गावकऱ्यांनी ‘लोकमत’जवळ उपस्थित केला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती समुद्रसपाटीची नसल्याने दरड कोसळण्याच्या घटनांची संख्या अत्यल्पच आहे. मात्र, इरई, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता या प्रमुख नद्या आणि उपनद्यांना पूर आल्यास नदीकाठावरील गावांना दरवर्षी पुराचा जोरदार तडाखा बसतो. विशेषत: वैनगंगा नदी काठावरील अतिजोखमीच्या गावांची पावसाळ्यात कोंडी होते. पूरपीडित सर्वच गावांच्या पुनर्वसनाची आवश्यकता नाही, असे गावकऱ्यांचेच म्हणणे आहे. परंतु, पुरापासून बचाव करण्यासाठी पायाभूत सोईसुविधा मागील २० वर्षांच्या कालखंडात निर्माण होऊ शकल्या नाही. याची जबर किमत पूरपीडित गावांना मोजावी लागत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. घरांची पडझड होणे, पुरामुळे उभी पिके वाहून जाणे आणि हजारो हेक्टर शेतीची जमीन खरवडून निघणे या घटना आता दरवर्षीच घडू लागल्या आहेत, याबाबत गावकरी नाराज आहेत. मदत व पुनर्वसनमंत्री जिल्ह्याचेच असल्याने   राज्य शासनाकडून नवीन पुनर्वसन सर्वंकष धोरण तयार करताना जिल्ह्यातील पूरप्रवण ८६ गावांचा प्राधान्याने विचार झाला तरच हे नैसर्गिक संकट टळू शकते, अशी गावकऱ्यांची अपेक्षा  आहे.

जीवनवाहिनी वैनगंगा नदीचा सर्वाधिक फटका- वैनगंगा नदी ही विदर्भातील एक महत्त्वाची दक्षिणवाहिनी नदी आहे. या नदीचा उगम मध्य प्रदेशातील मैकल पर्वतरांगात शिवनी जिल्ह्यात दरकेसा टेकड्यांतून समुद्र सपाटीपासून ६४० मीटर उंचीवर झाला आहे. तिथून ती बालाघाट जिल्ह्यातला ९८ किलोमीटरचा प्रवास करून भंडारा जिल्ह्यात प्रवेश करते. भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांमधून वाहते. जीवनवाहिनी म्हणून ओळखणाºया वैगंगेला पूर आल्यास ब्रह्मपुरी तालुक्यातील नदी काठावरील गावांना सर्वाधिक फटका बसतो..

गतवर्षी ६७ गावांमधील शेती महापुराने केली उद्‌ध्वस्तn२०२० मध्ये मध्य प्रदेशातील धरणाचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीला महापूर आला होता. या पुराने ब्रह्मपुरी ३५, सावली ८, मूल ७, गोंडपिपरी १७ व पोंभुर्णा तालुक्यातील १० अशा एकूण ६७ गावांचे प्रचंड नुकसान झाले. ब्रह्मपुरी तालुक्ययातील लाडज, पिंपळगाव, अन्हेरगाव, भालेश्वर, चखलगाव, सौंद्री, हरदोली, सुरबोडी, सोनेगाव, बेलगाव, बेटाळा, पारधगाव, रणमोचन, खरकाळा, नांदगाव जानी, हल्दा, कोलारी, मालडोंगरी या गावांच्या जखमा तर अजूनही सुकल्या नाहीत.

पूरबाधित गावांची तीन श्रेणीमागील २० वर्षांत पूर आलेल्या गावांची यादी तयार करून स्थानांतरण, पुनर्वसन तसेच पायाभूत सुविधांबाबत नव्याने विचार केला जाणार आहे. या सर्वंकष पूनर्वसन धोरणासाठी जिल्हाधिकारी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन अशा पूरबाधित गावांची यादी निश्चित करतील. त्यामध्ये अति जोखमीची पहिल्या यादीत, मध्यम दुसऱ्या व कमी जोखमीच्या गावांची नावे तिसऱ्या यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर