शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

राज्यातील बांधकाम कामगारांचे पाच हजार अनुदान बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 15:14 IST

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत असणाऱ्या कामगारांची अनुदानाची योजना शासनाने बंद केली आहे.

ठळक मुद्देबोगस कामगार नोंदीचा परिणाम खरे मजूर होणार वंचित

राजकुमार चुनारकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत असणाऱ्या कामगारांना मार्च २०१८ पासून अवजार खरेदी करण्याकरिता शासनाकडून पाच हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत होते; परंतु यामध्ये अनेक कामगार बोगस असल्याच्या लेखी तक्रारी संबंधित मंत्रालय व शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाने बांधकाम कामगारांची अनुदानाची योजना बंद केली आहे.शासनाच्या या निर्णयाने राज्यातील बांधकाम कामगारांमध्ये  खळबळ उडाली आहे. बोगस बांधकाम कामगारांवर कारवाई करा; परंतु योजना का बंद करता, अशा भावना बांधकाम कामगार व संघटनांमधून व्यक्त होत आहे. सध्या राज्यामध्ये शासनाच्या या कल्याणकारी मंडळाकडे २०,६७,७५८ बांधकाम कामगार नोंदणीकृत असून त्यापैकी आज अखेर पाच लाख आठ हजार ३७९ कामगारांनी पाच हजार अनुदान खरेदी करण्यासाठी मिळणाºया योजनेचा लाभ घेतला आहे. तर अद्यापही १५ लाख ५९ हजार ३७९ बांधकाम कामगारांना लाभ मिळालेला नाही.या मंडळाकडे बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी होते व लाभ घेतले जातात, अशा लेखी तक्रारी संबंधित आयुक्त मंत्रालयस्तरावर प्राप्त झाल्यानंतर नुकताच शासनाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील साडेपंधरा लाख बांधकाम कामगार पाच हजार रुपयांच्या अनुदान योजनेपासून वंचित राहणार आहेत.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे गवंडी, मिस्त्री, बिगारी, पेंटर, प्लम्बर, सुतार, सेंट्रिंगवाले, फिटिंग करणारे, अशा बांधकाम कामगारांची नोंदणी आहे; परंतु या नोंदणीमध्ये बोगस कामगारदेखील असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या शासनाने तत्काळ निर्णय घेतल्याने प्रामाणिक व बांधकाम कामगार यांनादेखील पाच हजार रुपयाच्या अनुदानापासून दूर राहावे लागणार आहे.२०११ पर्यंत या मंडळाकडून कामगारांना कोणत्याही योजनेचा लाभ नव्हता. संघटनांच्या सततच्या आंदोलन व मोर्चानंतर शासनाने कामगारांना योजनांचा लाभ देण्यास सुरुवात केली. या मंडळाकडून बांधकाम कामगारांना व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना शालेय शिष्यवृत्ती आदी २३ विविध प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जातो; परंतु पाच हजार रुपये अनुदान योजना बंद करून शासन बांधकाम कामगारांवर अन्याय करत आहे.बोगस कामगारांची जरूर चौकशी करा व दोषी असणाºयावर कारवाई करावी. पण थेट अनुदान योजना बंद करणे हा प्रकार चुकीचा आहे. मजुरांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न आहे. त्यामुळे अनुदान बंद निर्णयाचा पुनर्विचार करावा व मजुरांसाठी आरोग्य योजना सुरू करावी.-धनराज गेडाम,राज्याध्यक्ष, स्वराज्य बांधकाम कामगार संघटना.

टॅग्स :Governmentसरकार