शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्यात एलएलबीच्या पाच हजार जागा रिक्त, आतापर्यंत ६३०५ जागांवर प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2022 10:59 IST

विधी महाविद्यालयातील १० हजार ६४८ जागा या कॅम्पमधून प्रवेश घेण्यासाठी उपलब्ध होत्या. संस्थास्तरावरील १ हजार ७ जागा होत्या. यापैकी दोन फेरीमतध्ये ६ हजार ३०५ प्रवेश पूर्ण झाले आहेत.

ठळक मुद्देराज्यात एकूण जागा ११७५५

चंद्रपूर : पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन फेऱ्या संपल्या. एकूण ११ हजार ७५५ जागांपैकी आतापर्यंत ६ हजार ३०५ प्रवेश पूर्ण झाले आहेत. संस्थास्तर फेरीला प्रारंभ झाला. १ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशासाठी पसंतीक्रम भरले जाणार आहेत. ३ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश पूर्ण केले जाईल, तर ११ फेब्रुवारी प्रवेशाची कटऑफ राहील. मात्र, दोन प्रवेश फेऱ्यांनंतरही यंदाच्या शैक्षणिक सत्रात एलएलबीच्या ५ हजार जागा रिक्त असल्याची माहिती आहे.

राज्यातील प्रचलित शिक्षण पद्धतीनुसार कोणत्याही शाखेचे विद्यार्थी तीन वर्षांचा कायदेविषयक अभ्यासक्रम किंवा बारावी उत्तीर्ण होऊन पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाला पसंती देतात. यंदा नोंदणीत वाढ झाली. मात्र, प्रत्यक्ष कॅप फेरीत मात्र प्रवेश कमी झाल्याचे दिसून येत आहेत. या अभ्यासक्रमासाठी सीईटीतून पात्र झालेले सुमारे १६ हजार विद्यार्थी होते. त्यापैकी प्रवेशासाठी १३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. विधी महाविद्यालयातील १० हजार ६४८ जागा या कॅम्पमधून प्रवेश घेण्यासाठी उपलब्ध होत्या. संस्थास्तरावरील १ हजार ७ जागा होत्या. यापैकी दोन फेरीमतध्ये ६ हजार ३०५ प्रवेश पूर्ण झाले आहेत. राज्यात ५ हजार ४५० जागा अजूनही रिक्त आहेत. आता संस्थास्तरावर प्रवेश पूर्ण केला जाणार असून ११ फेब्रुवारीही प्रवेशाची कटऑफ असणार आहे.

संस्थास्तर फेरीला प्रारंभ

पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन फेऱ्या संपूनही पाच हजार जागा रिक्त आहेत. त्यामुळे आता कॉलेज संस्थास्तर फेरीला प्रारंभ करण्यात आल्याची माहिती आहे. राज्यात एलएलबी पाच वर्षे अभ्यासक्रमांसाठी १३२ महाविद्यालये आहेत. ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत संस्थास्तरावरील प्रवेशाची कटऑफ असणार आहे.

एलएलबी प्रवेशाची स्थिती

विधी महाविद्यालये १३२

सीईटी पात्र १६०७१

प्रत्यक्ष नोंदणी १२८८९

एकूण जागा ११७५५

आतापर्यंतचे प्रवेश ६३०५

रिक्त जागा ५४५०

टॅग्स :Educationशिक्षणjobनोकरी