शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दोन महिन्यांत वाघाने घेतला पाच जणांचा बळी; नागरिक दहशतीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 11:26 IST

बफर क्षेत्रात ११ वाघांचा संचार : मानव-वन्यप्राणी संघर्ष शिगेला

लोकमत न्यूज नेटवर्क मूल : तालुक्यात दोन महिन्यांत वाघाने ५ जणांचा बळी घेतला तर, एकजण गंभीर जखमी झाला. त्यात बफर क्षेत्रात ११ वाघांचा संचार असल्याने नागरिक दहशतीत आहेत. वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मूल तालुक्यातील काही गावे कोर तर, काही बफर झोन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून आहेत. गावांलगत वन्यप्राण्यांचा वावर आहे. ताडोबा क्षेत्र राखीव असल्याने वन्य प्राण्यांची संख्या वाढतच आहे. यातून शिकारीच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे आगेकूच करीत आहेत. अशावेळी तावडीत सापडलेल्या इसमांचा बळी घेत आहेत. त्यामुळे मानव-वन्यप्राणी संघर्ष वाढला. बफर क्षेत्रात ११ वाघांचा वावर असून, इतरही प्राण्यांची संख्या भरपूर आहे. जंगलातील प्राण्यांच्या तुलनेत वनविभागाकडून तयार केलेल्या पाणवठ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे हिंस्त्र वन्यप्राणी पाणी व शिकारीच्या शोधात गावाकडे येत आहेत. मानव-वन्यप्राणी संघर्षात दोन महिन्यांत पाच जणांचा बळी गेला. चिंचोली येथील देवाजी राऊत (वय ६४) यांचा गुरुवारी (दि. १९) वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यापूर्वी गणपत मराठे (वय ६०, केळझर), मुनिम गोलावार (वय ४१, चिंचाळा), वासुदेव पेंदोर (वय ६०, रा. मरेगाव), गुलाब वेळमे (वय ५२, रा. जानाळा), देवाजी राऊत (वय ६४, रा. चिंचोली) आदींचा मृत्यू झाला. बोरचांदलीचे विनोद बोलीवर हे जखमी झाले. 

"मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या. नागरिकांनी जंगलात जाताना काळजी घ्यावी. वाघाने हल्ला केलेल्या परिसरात तीन ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले. कॅमेऱ्यात वाघ कैद झाल्यावर जेरबंद करण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. वनविभागाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन केल्यास धोके टाळता येणे शक्य"- राहुल कारेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, मूल

टॅग्स :Tigerवाघchandrapur-acचंद्रपूर