शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

पाच लाखांच्या बंधाऱ्याची चौकशी थंडबस्त्यात

By admin | Updated: December 16, 2015 01:18 IST

एखाद्या भ्रष्टाचारात कंत्राटदारासोबत अधिकाऱ्यांचेही हात काळे झाले की, त्या प्रकरणाची वासलात कशी लावली जाते, याची अनुभूती सावली तालुक्यातील सायखेडा येथील गावकरी घेत आहे.

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न : लोखंडाविना दगडांनी बांधला बंधाराचंद्रपूर : एखाद्या भ्रष्टाचारात कंत्राटदारासोबत अधिकाऱ्यांचेही हात काळे झाले की, त्या प्रकरणाची वासलात कशी लावली जाते, याची अनुभूती सावली तालुक्यातील सायखेडा येथील गावकरी घेत आहे. सायखेडा गावालगत बंधारा बांधताना त्यात लोखंडाचा वापरच करण्यात आला नाही. केवळ दगडांचा वापर करून हा बंधारा तयार करण्यात आला. याची तक्रार होऊन आज अनेक वर्षे लोटली; परंतु आजवर कोणतीही कारवाई न झाल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मार्च २०१० मध्ये सायखेडा गावालगत भानुदास वाघरे यांच्या शेतालगतच्या पाच लाख रुपये किंमतीच्या नाल्यावर सिमेंट प्लग बंधाऱ्याला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारी २०११ मध्ये ग्रामपंचायतीच्या मार्फतीने बंधाऱ्याच्या कामाला सुरूवात ककरण्यात आली. हे काम करताना बंधाऱ्यात मोठ-मोठे दगड भरण्यात आले. विशेष म्हणजे तेथेच बांधून असलेल्या कच्चा बंधाऱ्यातील दगड व मातीचा या बंधाऱ्याच्या बांधकामासाठी सर्रास वापर करण्यात आला. यासंदर्भात सायखेडा येथील रहिवासी खुशाल लोडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र या तक्रारीला केराची टोपली दाखविण्यात आली. त्यानंतर २०१३ मध्ये याच विषयात लोडे यांनी तत्कालिन जलसंपदा मंत्र्यांकडेदेखील तक्रार केली. मात्र तक्रारींची चौकशीच करण्यात आली नाही. मात्र तरीही जिल्हा परिषद सिंचन विभागातील दोन अधिकाऱ्यांनी या कामाचे बिल अदा केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.दरम्यान या बंधाऱ्याविषयी वारंवार तक्रारी होत असल्याची बाब लक्षात घेऊन विद्यमान कार्यकारी अभियंता सहारे यांनी स्वत: ३० सप्टेंबर रोजी या बंधाऱ्याची पाहणी केली. तेव्हा बंधाऱ्याला मोठमोठ्या भेगा पडलेल्या दिसून आल्यात. या बंधाऱ्यावर पाट्या नसून स्लॅबचे मजबुतीकरणदेखील झाले नाही. या बंधाऱ्याचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा झाला नाही. त्यामुळे या बंधाऱ्याच्या बांधकामाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी खुशाल लोडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)