शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

विदर्भातील पाचलाख टन धानकोंडा सडण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 23:50 IST

राज्य शासनाने बायोमास पॉवर प्लांटची वीज खरेदी बंद केली. शिवाय, परवाना नुतनीकरणाला काही महिन्यांपूर्वी प्रतिबंध घातल्याने पाच जिल्ह्यातील सुमारे पाचलाख टन कोंडा पावसामुळे सडण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देबायोमास वीज प्रकल्पाकडून खरेदी बंदकोंड्याची विल्हेवाट लावताना राईसमील व्यावसायिक त्रस्त

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : पूर्व विदर्भात धान उत्पादन व त्यावर आधारीत राईसमील उद्योग हा प्रमुख व्यवसाय आहे. धानापासून तांदूळ तयार करताना लाखो टन कोंडा (टरफल) निघतो. कोंड्यापासून बायोमास पॉवर प्लांटद्वारे वीज निर्मिती केली जाते. मात्र, राज्य शासनाने बायोमास पॉवर प्लांटची वीज खरेदी बंद केली. शिवाय, परवाना नुतनीकरणाला काही महिन्यांपूर्वी प्रतिबंध घातल्याने पाच जिल्ह्यातील सुमारे पाचलाख टन कोंडा पावसामुळे सडण्याच्या मार्गावर आहे.विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यात सुमारे नऊ लाख हेक्टर क्षेत्रावर सहा लाख शेतकरी दरवर्षी धानाची लागवड करतात. उन्हाळी हंगामातही साधारणत: ६० हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. दोन्ही हंगामातील धानाची एकूण लागवड लक्षात घेता ४० ते ४५ लाख टन उत्पादन होते. धानापासून सुमारे पाचलाख टन निघतो. कोंड्यापासून वीज निर्मिती केली जाते. पूर्व विदर्भातील मिलर्सच्या उत्पन्नाचा धान कोंडा हा मोठा भाग आहे. शेकडो राईसमीलचा बहुतांश खर्च कोंड्यापासून मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यातून भागविला जातो. पाच जिल्ह्यांमध्ये १० बायोमास पॉवर प्लांटद्वारे कार्यरत होते. यापूर्वी पॉवर प्लांट चालकांकडून ३ हजार ५०० प्रति टन दराने कोंड्याची खरेदी केली जात होती. मात्र, राज्य शासनाने बायोमास पॉवर प्लांटकडून वीज खरेदी बंद केल्याने राईसमील व्यावसायिक संकटांचा सामना करीत आहेत.४० सहकारी तांदूळ उद्योग बंदसरकारचे पाठबळ नसल्याने आतापर्यंत विदर्भातील ४० सहकारी तांदूळ उद्योग बंद पडले. आता केवळ स्वबळावरच उद्योग सुरू आहेत. सरकारचे आयात-निर्यात धोरणातील जाचक अटींचा सामना करत असताना कोंड्याची दररोज विल्हेवाट लावणे कठीण झाले. पावसाळा सुरू झाल्याने राईसमील एकूण क्षमतेच्या केवळ २० टक्केच उत्पादन सुरू असल्याची माहिती राईस मील असोसिएशनने दिली.तीन राज्यांकडून घ्यावा बोधमध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्याने राईसमील उद्योगाला सहकार्य करण्यासाठी कोंड्याला अधिक दर मिळवून दिला. त्यामुळे तेथील उद्योगधंदे व्यवस्थित सुरू आहेत. धान उत्पादनात अग्रेसर असलेल्या चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील उद्योग संकटात सापडले. या उद्योगावर सहा लाख शेतकरी, ५० हजार मजूर, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, उद्योजक अवलंबून आहेत.सरकारी धोरणांमुळे राईसमील उद्योग संकटात सापडले. यावर लाखो मजुरांचा रोजगार अवलंबून आहे. कोंड्याचे दर कमी झाल्याने किंवा मागणी घटल्याने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष शेतकऱ्यांचेही नुकसान होते. धानाचे भाव कमालीचे घसरतात. त्यामुळे राज्य सरकारने बायोगॅस प्लांटचे नुतनीकरण करून राईसमील उद्योगाला आर्थिक संकटातून बाहेर काढावे.- जीवन कोंतमवार, राईसमील व्यावसायिक, मूल जि. चंद्रपूर.

टॅग्स :agricultureशेती