शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
4
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
5
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
6
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
7
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
8
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
9
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
10
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
12
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
13
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
14
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
15
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
16
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
17
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
18
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
19
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
20
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील पाचलाख टन धानकोंडा सडण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 23:50 IST

राज्य शासनाने बायोमास पॉवर प्लांटची वीज खरेदी बंद केली. शिवाय, परवाना नुतनीकरणाला काही महिन्यांपूर्वी प्रतिबंध घातल्याने पाच जिल्ह्यातील सुमारे पाचलाख टन कोंडा पावसामुळे सडण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देबायोमास वीज प्रकल्पाकडून खरेदी बंदकोंड्याची विल्हेवाट लावताना राईसमील व्यावसायिक त्रस्त

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : पूर्व विदर्भात धान उत्पादन व त्यावर आधारीत राईसमील उद्योग हा प्रमुख व्यवसाय आहे. धानापासून तांदूळ तयार करताना लाखो टन कोंडा (टरफल) निघतो. कोंड्यापासून बायोमास पॉवर प्लांटद्वारे वीज निर्मिती केली जाते. मात्र, राज्य शासनाने बायोमास पॉवर प्लांटची वीज खरेदी बंद केली. शिवाय, परवाना नुतनीकरणाला काही महिन्यांपूर्वी प्रतिबंध घातल्याने पाच जिल्ह्यातील सुमारे पाचलाख टन कोंडा पावसामुळे सडण्याच्या मार्गावर आहे.विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यात सुमारे नऊ लाख हेक्टर क्षेत्रावर सहा लाख शेतकरी दरवर्षी धानाची लागवड करतात. उन्हाळी हंगामातही साधारणत: ६० हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. दोन्ही हंगामातील धानाची एकूण लागवड लक्षात घेता ४० ते ४५ लाख टन उत्पादन होते. धानापासून सुमारे पाचलाख टन निघतो. कोंड्यापासून वीज निर्मिती केली जाते. पूर्व विदर्भातील मिलर्सच्या उत्पन्नाचा धान कोंडा हा मोठा भाग आहे. शेकडो राईसमीलचा बहुतांश खर्च कोंड्यापासून मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यातून भागविला जातो. पाच जिल्ह्यांमध्ये १० बायोमास पॉवर प्लांटद्वारे कार्यरत होते. यापूर्वी पॉवर प्लांट चालकांकडून ३ हजार ५०० प्रति टन दराने कोंड्याची खरेदी केली जात होती. मात्र, राज्य शासनाने बायोमास पॉवर प्लांटकडून वीज खरेदी बंद केल्याने राईसमील व्यावसायिक संकटांचा सामना करीत आहेत.४० सहकारी तांदूळ उद्योग बंदसरकारचे पाठबळ नसल्याने आतापर्यंत विदर्भातील ४० सहकारी तांदूळ उद्योग बंद पडले. आता केवळ स्वबळावरच उद्योग सुरू आहेत. सरकारचे आयात-निर्यात धोरणातील जाचक अटींचा सामना करत असताना कोंड्याची दररोज विल्हेवाट लावणे कठीण झाले. पावसाळा सुरू झाल्याने राईसमील एकूण क्षमतेच्या केवळ २० टक्केच उत्पादन सुरू असल्याची माहिती राईस मील असोसिएशनने दिली.तीन राज्यांकडून घ्यावा बोधमध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्याने राईसमील उद्योगाला सहकार्य करण्यासाठी कोंड्याला अधिक दर मिळवून दिला. त्यामुळे तेथील उद्योगधंदे व्यवस्थित सुरू आहेत. धान उत्पादनात अग्रेसर असलेल्या चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील उद्योग संकटात सापडले. या उद्योगावर सहा लाख शेतकरी, ५० हजार मजूर, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, उद्योजक अवलंबून आहेत.सरकारी धोरणांमुळे राईसमील उद्योग संकटात सापडले. यावर लाखो मजुरांचा रोजगार अवलंबून आहे. कोंड्याचे दर कमी झाल्याने किंवा मागणी घटल्याने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष शेतकऱ्यांचेही नुकसान होते. धानाचे भाव कमालीचे घसरतात. त्यामुळे राज्य सरकारने बायोगॅस प्लांटचे नुतनीकरण करून राईसमील उद्योगाला आर्थिक संकटातून बाहेर काढावे.- जीवन कोंतमवार, राईसमील व्यावसायिक, मूल जि. चंद्रपूर.

टॅग्स :agricultureशेती