शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

विदर्भातील पाचलाख टन धानकोंडा सडण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 23:50 IST

राज्य शासनाने बायोमास पॉवर प्लांटची वीज खरेदी बंद केली. शिवाय, परवाना नुतनीकरणाला काही महिन्यांपूर्वी प्रतिबंध घातल्याने पाच जिल्ह्यातील सुमारे पाचलाख टन कोंडा पावसामुळे सडण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देबायोमास वीज प्रकल्पाकडून खरेदी बंदकोंड्याची विल्हेवाट लावताना राईसमील व्यावसायिक त्रस्त

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : पूर्व विदर्भात धान उत्पादन व त्यावर आधारीत राईसमील उद्योग हा प्रमुख व्यवसाय आहे. धानापासून तांदूळ तयार करताना लाखो टन कोंडा (टरफल) निघतो. कोंड्यापासून बायोमास पॉवर प्लांटद्वारे वीज निर्मिती केली जाते. मात्र, राज्य शासनाने बायोमास पॉवर प्लांटची वीज खरेदी बंद केली. शिवाय, परवाना नुतनीकरणाला काही महिन्यांपूर्वी प्रतिबंध घातल्याने पाच जिल्ह्यातील सुमारे पाचलाख टन कोंडा पावसामुळे सडण्याच्या मार्गावर आहे.विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यात सुमारे नऊ लाख हेक्टर क्षेत्रावर सहा लाख शेतकरी दरवर्षी धानाची लागवड करतात. उन्हाळी हंगामातही साधारणत: ६० हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. दोन्ही हंगामातील धानाची एकूण लागवड लक्षात घेता ४० ते ४५ लाख टन उत्पादन होते. धानापासून सुमारे पाचलाख टन निघतो. कोंड्यापासून वीज निर्मिती केली जाते. पूर्व विदर्भातील मिलर्सच्या उत्पन्नाचा धान कोंडा हा मोठा भाग आहे. शेकडो राईसमीलचा बहुतांश खर्च कोंड्यापासून मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यातून भागविला जातो. पाच जिल्ह्यांमध्ये १० बायोमास पॉवर प्लांटद्वारे कार्यरत होते. यापूर्वी पॉवर प्लांट चालकांकडून ३ हजार ५०० प्रति टन दराने कोंड्याची खरेदी केली जात होती. मात्र, राज्य शासनाने बायोमास पॉवर प्लांटकडून वीज खरेदी बंद केल्याने राईसमील व्यावसायिक संकटांचा सामना करीत आहेत.४० सहकारी तांदूळ उद्योग बंदसरकारचे पाठबळ नसल्याने आतापर्यंत विदर्भातील ४० सहकारी तांदूळ उद्योग बंद पडले. आता केवळ स्वबळावरच उद्योग सुरू आहेत. सरकारचे आयात-निर्यात धोरणातील जाचक अटींचा सामना करत असताना कोंड्याची दररोज विल्हेवाट लावणे कठीण झाले. पावसाळा सुरू झाल्याने राईसमील एकूण क्षमतेच्या केवळ २० टक्केच उत्पादन सुरू असल्याची माहिती राईस मील असोसिएशनने दिली.तीन राज्यांकडून घ्यावा बोधमध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्याने राईसमील उद्योगाला सहकार्य करण्यासाठी कोंड्याला अधिक दर मिळवून दिला. त्यामुळे तेथील उद्योगधंदे व्यवस्थित सुरू आहेत. धान उत्पादनात अग्रेसर असलेल्या चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील उद्योग संकटात सापडले. या उद्योगावर सहा लाख शेतकरी, ५० हजार मजूर, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, उद्योजक अवलंबून आहेत.सरकारी धोरणांमुळे राईसमील उद्योग संकटात सापडले. यावर लाखो मजुरांचा रोजगार अवलंबून आहे. कोंड्याचे दर कमी झाल्याने किंवा मागणी घटल्याने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष शेतकऱ्यांचेही नुकसान होते. धानाचे भाव कमालीचे घसरतात. त्यामुळे राज्य सरकारने बायोगॅस प्लांटचे नुतनीकरण करून राईसमील उद्योगाला आर्थिक संकटातून बाहेर काढावे.- जीवन कोंतमवार, राईसमील व्यावसायिक, मूल जि. चंद्रपूर.

टॅग्स :agricultureशेती