शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

मृूल तालुक्यात वर्षभरात वाघ हल्ल्यात पाचजणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:35 IST

मूल : तालुक्याच्या विविध भागांत झालेल्या वाघांच्या हल्ल्यात यावर्षी पाचजणांचा मृत्यू झाला असून, चालू झालेल्या शेतीच्या हंगामात जंगलालगतच्या शेतकऱ्यांना ...

मूल : तालुक्याच्या विविध भागांत झालेल्या वाघांच्या हल्ल्यात यावर्षी पाचजणांचा मृत्यू झाला असून, चालू झालेल्या शेतीच्या हंगामात जंगलालगतच्या शेतकऱ्यांना भीती वाटू लागली आहे. त्यामुळे तालुक्यात वाढलेल्या वाघांचा तातडीने बंदोबस्त करून जनतेला संरक्षण द्यावे, अशी मागणी तालुका काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेला मूल तालुका ५० टक्के जंगलाने व्याप्त असून, यातील बहुतांश भाग बफर झोनमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील अनेक गावांत वाघांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. यावर्षी तालुक्यात आगडी येथील कल्पना वाढई, जानाळा येथील वनिता गेडाम आणि कीर्तीराम कुळमेथे, मारोडा येथे मनोहर प्रधाने आणि सुशी येथील वैशाली मांदाडे अशा पाचजणांवर वाघाने हल्ला केल्याने त्यांना जीव गमवावा लागला आहे. तालुक्यात घडलेल्या या पाच घटनांमुळे जंगलालगतच्या गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतीचा हंगाम सुरू झाला असून, शेतीच्या मशागतीकरिता शेतकऱ्यांना शेतावर जावे लागत आहे. तालुक्यात वाघांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत असल्याने जंगलालगतच्या शेतामध्ये जाण्यासाठी शेतकऱ्यांना भीती वाटू लागली आहे. तसेच स्वयंपाकाकरिता सरपण गोळा करण्यासाठी जाणाऱ्या गरीब महिलांमध्येही वाघाची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीच्या हंगामात शेतीची मशागत करायची कशी आणि स्वयंपाकाकरिता सरपणाअभावी चूल पेटवायची कशी, असा प्रश्न तालुक्यातील शेतकरी व महिला भगिनींना पडला आहे. त्यामुळे तालुक्यातील जंगलालगतच्या गावात वाढलेले वाघाचे हल्ले कमी करण्यासाठी वनविभागाने योग्य उपाययोजना करून शेतकरी आणि महिलांना संरक्षण द्यावे, अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या नेतृत्वात काॅंग्रेसच्या शिष्टमंडळाने ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. भेटलेल्या शिष्टमंडळात काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, बाजार समिती संचालक तथा सरपंच अखिल गांगरेड्डीवार, नवनियुक्त शहरअध्यक्ष सुनील शेरकी, नगरसेवक विनोद कामडे, सुरेश फुलझेले, कैलास चलाख, रुमदेव गोहणे आदी उपस्थित होते.