शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

मृूल तालुक्यात वर्षभरात वाघ हल्ल्यात पाचजणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:35 IST

मूल : तालुक्याच्या विविध भागांत झालेल्या वाघांच्या हल्ल्यात यावर्षी पाचजणांचा मृत्यू झाला असून, चालू झालेल्या शेतीच्या हंगामात जंगलालगतच्या शेतकऱ्यांना ...

मूल : तालुक्याच्या विविध भागांत झालेल्या वाघांच्या हल्ल्यात यावर्षी पाचजणांचा मृत्यू झाला असून, चालू झालेल्या शेतीच्या हंगामात जंगलालगतच्या शेतकऱ्यांना भीती वाटू लागली आहे. त्यामुळे तालुक्यात वाढलेल्या वाघांचा तातडीने बंदोबस्त करून जनतेला संरक्षण द्यावे, अशी मागणी तालुका काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेला मूल तालुका ५० टक्के जंगलाने व्याप्त असून, यातील बहुतांश भाग बफर झोनमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील अनेक गावांत वाघांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. यावर्षी तालुक्यात आगडी येथील कल्पना वाढई, जानाळा येथील वनिता गेडाम आणि कीर्तीराम कुळमेथे, मारोडा येथे मनोहर प्रधाने आणि सुशी येथील वैशाली मांदाडे अशा पाचजणांवर वाघाने हल्ला केल्याने त्यांना जीव गमवावा लागला आहे. तालुक्यात घडलेल्या या पाच घटनांमुळे जंगलालगतच्या गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतीचा हंगाम सुरू झाला असून, शेतीच्या मशागतीकरिता शेतकऱ्यांना शेतावर जावे लागत आहे. तालुक्यात वाघांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत असल्याने जंगलालगतच्या शेतामध्ये जाण्यासाठी शेतकऱ्यांना भीती वाटू लागली आहे. तसेच स्वयंपाकाकरिता सरपण गोळा करण्यासाठी जाणाऱ्या गरीब महिलांमध्येही वाघाची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीच्या हंगामात शेतीची मशागत करायची कशी आणि स्वयंपाकाकरिता सरपणाअभावी चूल पेटवायची कशी, असा प्रश्न तालुक्यातील शेतकरी व महिला भगिनींना पडला आहे. त्यामुळे तालुक्यातील जंगलालगतच्या गावात वाढलेले वाघाचे हल्ले कमी करण्यासाठी वनविभागाने योग्य उपाययोजना करून शेतकरी आणि महिलांना संरक्षण द्यावे, अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या नेतृत्वात काॅंग्रेसच्या शिष्टमंडळाने ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. भेटलेल्या शिष्टमंडळात काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, बाजार समिती संचालक तथा सरपंच अखिल गांगरेड्डीवार, नवनियुक्त शहरअध्यक्ष सुनील शेरकी, नगरसेवक विनोद कामडे, सुरेश फुलझेले, कैलास चलाख, रुमदेव गोहणे आदी उपस्थित होते.