शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शेतीचा पहिला दिवसच कर्दनकाळ

By admin | Updated: June 14, 2015 01:55 IST

कोरपना तालुक्यातील वडगाव येथे वीज पडून सहा जणांचा आकस्मिक मृत्यू झाला.

मदतही नाही : पितृछत्र हरपलेल्या अंकुशवर आई-बहिणींची जबाबदारीरत्नाकर चटप  नांदाफाटाकोरपना तालुक्यातील वडगाव येथे वीज पडून सहा जणांचा आकस्मिक मृत्यू झाला. यातील राजू गेडाम या मोलमजुरी करणाऱ्या शेतमजुरांच्या कुटुंबावर ओढविलेला जगण्यासाठीचा संघर्ष मन हेलावून टाकणारा आहे.मृत राजूला दोन पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबाचा संपुर्ण भार बारावीत असलेल्या अंकुशवर पडला आहे. पंधरा वर्षापूर्वी राजुरा तालुक्यातील मंगी या गावावरून हे कुटुंब कामासाठी वडगाव येथे स्थलांतरित झाले. मृत राजुला ट्रॅक्टर चालविण्याचे व शेती कामाचे चांगले कौशल्य असल्याने वडगावात त्याला काम मिळू लागले. या खरीप हंगामात त्याचा शेतात जाण्याचा हा पहिलाच दिवस होतो. ज्या दिवशी आकाशात अचानक ढग गोळा होऊन वीज चमकू लागली वीज कोसळून तो जागी ठार झाला. पहिला पाऊस, पहिला शेतातील दिवस त्याच्यासाठी व कुटुंबास कर्दनकाळ ठरला आहे. अंकुशच्या शिक्षणासह इयत्ता पाचवीमध्ये शिकणारी बहिण रिना व इयत्ता सातवीत शिकणाऱ्या कविताचा भार त्याला पेलावा लागणार आहे. राजू गेडाम यांचे नाव बीपीएल यादीत आहे.परंतु अद्याप त्यांना घरकुल मिळालेले नाही. गावातील नविन वस्तीतील जागेवर लाकूड फाटे, बांबुचे ताखे आणि कवेलू, पत्रे टाकून कुटुंब राहत आहे. येणाऱ्या दिवाळीला घरावर छत टाकून राहण्यापुरते घर तयार करण्याचे मृत राजूचे स्वप्न असल्याचे पत्नीने सांगितले. मात्र आता घरातील मुळ कर्णधार गेल्याने जगायचे कसे, असा प्रश्न घरच्यांसमोर निर्माण झाला आहे. घराचा संपुर्ण भार पेलावा लागणार असल्याने शिक्षणासाठी अंकुशला मोठी कसरत करावी लागणार आहे. मुळगावी वडिलांच्या नावे शेती नाही. कुठलाही बँक बॅलेन्स अथवा घराची जागा तेवढीच मालमत्ता असल्याचे अंकुशने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. हातावर आणून पानावर खाणाऱ्या या कुटुंबाचा आधारवड हिरावल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेतील इतर पाच मृतांची परिस्थिती अशीच आहे. एकाला लग्नाआधीच प्राण सोडावा लागला तर एकाचा चार महिन्यातच बाळ आणि पत्नीला सोडून असे जावे लागले.वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या या सहा जणांच्या घरातील चित्र मन हेलावणारे आहे. या घटनेनंतर स्थानिक आमदार, माजी आमदार, प्रशासकीय अधिकारी यांनी मृतांच्या कुटुंबियांना भेटी देऊन मदतीचे आश्वासन दिले आहे. मात्र अद्याप मदत नाही. तेव्हा शासन काय मदत करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.