शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

आपसी वैमनस्यातून धान पुंजण्याला आग

By admin | Updated: December 3, 2015 01:16 IST

सावली तालुक्यातील व्याहाड (बुज.) शेतशिवार मंगळवारी रात्री अज्ञात इसमाने येथील कवडू कोंडु शेरकी यांच्या शेतातील धानाचे पुंजण्याला आग लावली.

उपरी: सावली तालुक्यातील व्याहाड (बुज.) शेतशिवार मंगळवारी रात्री अज्ञात इसमाने येथील कवडू कोंडु शेरकी यांच्या शेतातील धानाचे पुंजण्याला आग लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे अंदाजे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेबाबत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. शेताचे मालक कवडू कोंडु शेरकी यांनी आठवडा भरापूर्वी दोन एकर शेतातील हिरा हा उच्च वर्णीय धानाची कापणी केली. १ डिसेंबर रोजी धानाची बांधण केली. जवळपास ४०० भारा निघाला. सर्व भारा एकत्र करुन पुंजणा (ढिग) केला. रात्री ७ वाजेपर्यंत आम्ही शेतातच होतो. कोणीतरी अज्ञाताने रात्रीच्या सुमारास आग लावली असावी, असा संशय त्यांनी यावेळी व्यक्त केला. या घटनेची माहिती बुधवारी सकाळी त्या परिसरात शेताकडे जाणाऱ्या एका शेतकऱ्याने दिल्याचे शेरकी यांनी सांगितले. माहिती मिळताच, शेतात गेलो. मात्र पुंजणा जळून राख झाला होता, अशी माहिती त्यांनी दिली. धानाच्या पुंजणा जळाल्याची माहिती मिळताच, सरपंच शिला पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष दिवाकर मॅकलवार, दीपक गदेवार, शंकर मेश्राम यांनी शेतात जावून प्रत्यक्ष शेतकऱ्यांची भेट घेवून त्यांना दिलासा दिला. महसूल विभागाचे व्याहाड (बुज.) येथील तलाठी जयश्री कोसुळकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन मोका चौकशी करुन तसा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला असल्याचे सांगितले.यावर्षी सर्वत्र दुष्काळाचे चित्र असताना अज्ञाताने गरीब शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे जाळल्याने त्याच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. (वार्ताहर)