रेती निर्गती सुधारित धोरण २०२१८ नुसार अवैध उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता उपविभागीय स्तरावर उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, संबंधित तहसीलदार, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा प्रतिनिधी, उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधित तहसीलदार यांचा समावेश असलेली समिती गठित केलेली आहे. तालुका स्तरावर तहसीलदार, उप अधीक्षक भूमी अभिलेख, गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, नायब तहसीलदार आणि ग्रामपातळीवर सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल, तलाठी यांचा समावेश असलेली समिती गठित केली आहे. अवैध गौण खनिज खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता आकस्मित धाडी टाकून महाराष्ट्र जमीन महसूल संहितामधील तरतुदी अन्वये कारवाई करून दंड वसूल करण्यात आला.
तालुकानिहाय दंड वसूल
चंद्रपूर ८३६२६५५०, बल्लारपूर १९३२१००, मूल ३९३९०००, सावली ३०४६०००, गोंडपिपरी (रु. २०६७५८०, पोंभुर्णा १७८४५००, वरोरा ४५५०६००, भद्रावती ५८६३२००, चिमूर १६७३६००, सिंदेवाही २१३२५००, ब्रम्हपुरी ६२८८३०, नागभिड ४३०९६०, राजुरा २६२३३६०, कोरपना २९६२२०० व जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालय चंद्रपूर ४८०५८००
00000