शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांवर ओढवले आर्थिक संकट

By admin | Updated: May 8, 2015 01:11 IST

कोरपना तालुक्यात आजमितीला चार सिमेंट कंपन्या आहेत. या कंपन्यांसाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या.

रत्नाकर चटप नांदाफाटाकोरपना तालुक्यात आजमितीला चार सिमेंट कंपन्या आहेत. या कंपन्यांसाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या. यामागे नोकरीची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्याप्रमाणे या सिमेंट कंपन्यांनी नोकऱ्याही दिल्या. यातील तीन सिमेंट कंपन्यांचे उत्पादन सुरळीत सुरू आहे. परंतु मुर्ली अ‍ॅग्रो सिमेंट कंपनीचे उत्पादन ठप्प झाल्याने कामगारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यातील बहुतांशी कामगार परप्रांतीय आणि बाहेरचे असले तरी ज्यांच्या जमिनी गेल्या अशाही कामगारांची संख्या अधिक आहे. कंपनीत काम व वेतन मिळत नसल्याने आता आम्ही नक्षलवादी बनायचे काय, असा सवाल कामगार लोकप्रतिनिधींना विचारत आहे. नोकरी मिळेल, या आशेत लाखो रुपये किमतीच्या पिकावू शेतजमिनी कंपन्यांच्या घशात गेल्या आणि आता काम व दामही नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या शेतजमिनीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा, ती जमीन मालकीची राहिलेली नाही. त्यामुळे बेरोजगार झालेल्या शेतकरी मुलांनी करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी कंपन्यांना देताना नोकरी, शेतीचा मोबदला, मुलभूत सुविधा आदींचा अंतर्भाव करून आश्वासने दिली गेली. परंतु आता कंपनी प्रशासन ढुंकूनही पाहायला तयार नसल्याचे चित्र मुर्ली अ‍ॅग्रो सिमेंट कंपनीत दिसून येत आहे. कंपनीत स्थायी नोकरी मिळाल्याने अनेकांनी विवाह उरकून टाकले. म्हाताऱ्या माय-बापांनाही शेती गेली. पण नोकरी मिळायचा दिलासा वाटला. परंतु काम मिळत नसल्याने कामगारांच्या घरी चिंतेचे वातावरण पसरले आहे. हाती पैसाच नसल्याने यातील काही कामगारांनी नातलगांच्या लग्न समारंभाला जाण्याचेही टाळले असल्याचे समजते. शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना लोकप्रतिनिधी उद्योजकांना साथ देतात. मात्र त्याच शेतकऱ्यांच्या मुलांवर बेरोजगारीचे सावट आ वासून उभे असताना ‘ब्र’शब्दही काढत नाही. वास्तविक मुर्ली अ‍ॅग्रो कंपनीने कामगारांच्या हितासाठी काही उपक्रम राबविणे आवश्यक आहे. मात्र कामगारांच्या आयुष्यात निवासी घरे, पाणी, शाळा, आरोग्य व दत्तक गावांमध्येही मुलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. कंपनीचे याकडे लक्ष नाही. परंतु याकडेही कंपनी प्रशासन लक्ष देत नसल्याची ओरड कामगार करीत आहे. यापूर्वी शेती असल्याने किमान खायचे धान्य घरी भरून राहायचे तर नगदी पिके विकून पैसा मिळत होता. मात्र आता वेतनच मिळत नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहे. गावातील दुकानदार, व्यापाऱ्यांनाही याबाबत माहिती असल्याने तोही माल देण्यास टाळाटाळ करीत आहे.