शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
5
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
6
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
7
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
8
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
9
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
10
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
11
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
12
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
13
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
14
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
15
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
16
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
17
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
18
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
19
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले

अखेर ‘त्या’ माजी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी गाशा गुंडाळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 05:00 IST

जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींचा पाच वर्षांचा कालावधी संपेपर्यंतच या बंगल्यांचा वापर करावा लागतो. माजी जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले, उपाध्यक्ष रेखा कारेकर, सभापती नागराज गेडाम, राजू गायकवाड, सुनील उरकुडे आणि रोशनी खान यांच्यासाठी सिव्हील लाईन परिसरात जिल्हा परिषदेच्या मालकीचे बंगले पक्त पाच वर्षांसाठी अधिग्रहित केले होते.  काहींनी लगेच खाली केले तर काहींनी मात्र बंगल्यांचा अनधिकृत वापर सुरूच ठेवला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सत्तेचा मोह भल्या-भल्यांना आवरत नाही. सत्तेच्या अनुषंगाने येणारे फायदे हेच त्यामागचे मूळ कारण. जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल फेब्रुवारीत संपूनही शासकीय बंगल्यांचा वापर सुरूच असल्याचे लक्षात येताच शनिवारी प्रशासनाने कुलूप ठोकले. परिणामी, ‘त्या’ माजी पदाधिकाऱ्यांना आपला गाशा गुंडाळावा लागला.चंद्रपुरातील सिव्हील लाईन मार्गावर जि. प. पदाधिकाऱ्यांसाठी शासकीय बंगले तयार करण्यात आले. या बंगल्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी जि. प. कडे आहे. बंगल्यांची देखभाल दुरूस्ती वीजबिल यासह अन्य बाबींवर दरवर्षी लाखोंचा खर्च केला जातो. जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींचा पाच वर्षांचा कालावधी संपेपर्यंतच या बंगल्यांचा वापर करावा लागतो. माजी जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले, उपाध्यक्ष रेखा कारेकर, सभापती नागराज गेडाम, राजू गायकवाड, सुनील उरकुडे आणि रोशनी खान यांच्यासाठी सिव्हील लाईन परिसरात जिल्हा परिषदेच्या मालकीचे बंगले पक्त पाच वर्षांसाठी अधिग्रहित केले होते. कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी बंगले खाली करावे, अशा शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार काहींनी लगेच खाली केले तर काहींनी मात्र बंगल्यांचा अनधिकृत वापर सुरूच ठेवला होता.

अन् केला  वीजपुरवठा खंडितउन्हाळ्याच्या दिवसांत कामानिमित्ताने जिल्हास्थळी येणारे माजी जि. प. पदाधिकारी व त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते या बंगल्यांवर ठिय्या मांडायचे. एसीचाही सर्रास वापर केला जायचा. त्यामुळे वीज बिल वाढले. मुदत संपूनही काही पदाधिकारी बंगले खाली करण्याच्या मानसिकतेत दिसून येत नसल्याचे पाहून आता जिल्हा परिषदेनेच   त्या बंगल्यांना कुलूप लावले व वीजपुरवठा खंडित केला.

२० फेबु्वारीलाच संपला होता कार्यकाळ जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा काळ २० फेबु्वारी २०२२ रोजी संपला. जि. प. सध्या प्रशासकराज सुरू आहे. कालावधी संपून चार महिने होत असतानाही बंगले का रिकामे केले नाही, असा प्रश्न प्रशासकीय गोटांतूनच विचारला जात होता. दरम्यान, अनधिकृत वापर करून आर्थिक भुर्दंड बसत असल्याचे लक्षात येताच जि. प. प्रशासनाने अखेर कार्यवाही केली.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद