शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

अखेर ‘त्या’ माजी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी गाशा गुंडाळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 05:00 IST

जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींचा पाच वर्षांचा कालावधी संपेपर्यंतच या बंगल्यांचा वापर करावा लागतो. माजी जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले, उपाध्यक्ष रेखा कारेकर, सभापती नागराज गेडाम, राजू गायकवाड, सुनील उरकुडे आणि रोशनी खान यांच्यासाठी सिव्हील लाईन परिसरात जिल्हा परिषदेच्या मालकीचे बंगले पक्त पाच वर्षांसाठी अधिग्रहित केले होते.  काहींनी लगेच खाली केले तर काहींनी मात्र बंगल्यांचा अनधिकृत वापर सुरूच ठेवला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सत्तेचा मोह भल्या-भल्यांना आवरत नाही. सत्तेच्या अनुषंगाने येणारे फायदे हेच त्यामागचे मूळ कारण. जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल फेब्रुवारीत संपूनही शासकीय बंगल्यांचा वापर सुरूच असल्याचे लक्षात येताच शनिवारी प्रशासनाने कुलूप ठोकले. परिणामी, ‘त्या’ माजी पदाधिकाऱ्यांना आपला गाशा गुंडाळावा लागला.चंद्रपुरातील सिव्हील लाईन मार्गावर जि. प. पदाधिकाऱ्यांसाठी शासकीय बंगले तयार करण्यात आले. या बंगल्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी जि. प. कडे आहे. बंगल्यांची देखभाल दुरूस्ती वीजबिल यासह अन्य बाबींवर दरवर्षी लाखोंचा खर्च केला जातो. जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींचा पाच वर्षांचा कालावधी संपेपर्यंतच या बंगल्यांचा वापर करावा लागतो. माजी जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले, उपाध्यक्ष रेखा कारेकर, सभापती नागराज गेडाम, राजू गायकवाड, सुनील उरकुडे आणि रोशनी खान यांच्यासाठी सिव्हील लाईन परिसरात जिल्हा परिषदेच्या मालकीचे बंगले पक्त पाच वर्षांसाठी अधिग्रहित केले होते. कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी बंगले खाली करावे, अशा शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार काहींनी लगेच खाली केले तर काहींनी मात्र बंगल्यांचा अनधिकृत वापर सुरूच ठेवला होता.

अन् केला  वीजपुरवठा खंडितउन्हाळ्याच्या दिवसांत कामानिमित्ताने जिल्हास्थळी येणारे माजी जि. प. पदाधिकारी व त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते या बंगल्यांवर ठिय्या मांडायचे. एसीचाही सर्रास वापर केला जायचा. त्यामुळे वीज बिल वाढले. मुदत संपूनही काही पदाधिकारी बंगले खाली करण्याच्या मानसिकतेत दिसून येत नसल्याचे पाहून आता जिल्हा परिषदेनेच   त्या बंगल्यांना कुलूप लावले व वीजपुरवठा खंडित केला.

२० फेबु्वारीलाच संपला होता कार्यकाळ जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा काळ २० फेबु्वारी २०२२ रोजी संपला. जि. प. सध्या प्रशासकराज सुरू आहे. कालावधी संपून चार महिने होत असतानाही बंगले का रिकामे केले नाही, असा प्रश्न प्रशासकीय गोटांतूनच विचारला जात होता. दरम्यान, अनधिकृत वापर करून आर्थिक भुर्दंड बसत असल्याचे लक्षात येताच जि. प. प्रशासनाने अखेर कार्यवाही केली.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद