शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

अखेर ऐतिहासिक सराय इमारतीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:39 IST

प्राथमिक अधिसूचनेचा प्रस्ताव जाहीर : नागरिकांना दोन महिन्यांच्या आत नोंदविता येणार हरकती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील इंग्रजकालीन ऐतिहासिक सराय (धर्मशाळा) इमारत वाचविण्यासाठी इतिहासप्रेमींनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर अखेर राज्य शासनाने मंगळवारी (दि. १५) राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्याची प्राथमिक अधिसूचना जाहीर केली. अधिसूचना जाहीर झाल्यापासून नागरिकांना दोन महिन्यांच्या आत याबाबत हरकती दाखल करता येणार आहे. पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालकांकडून या अधिसूचनेची प्रत संबंधित सराई स्मारकाजवळ लावावी, अशी सूचना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत यांनी दिली आहे. 

स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेली इंग्रजकालीन 'सराय' जीर्ण होत आहे. या इमारतीची मालकी चंद्रपूर महानगर पालिकेकडे आहे. या जागेवर व्यावसायिक संकुल तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. १०० वर्षे जुन्या इमारतीचे जतन करण्यासाठी चंद्रपुरातील अभ्यासक अशोकसिंह ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. 

२३ हजार ७०० रुपयांत उभी झाली होती, इंग्रजांच्या काळात चंद्रपुरातील सराई इमारत. राज्य शासनाने अखेर मंगळवारी (दि. १५) शासन निर्णय जारी केला. त्यामध्ये सराय धर्मशाळेला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्याचा प्राथमिक अधिसूचनेचा प्रस्तावही जाहीर केला आहे.

राष्ट्रीय नेत्यांनी केला होता मुक्काम१९ फेब्रुवारी १९२७ रोजी चंद्रपूर नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष विश्वनाथ दीक्षित ऊर्फ बाबा पाटील आणि गृहमंत्री ई. राघवेंद्र यांच्या हस्ते उद्घाटन झाले. इमारतीसाठी दुर्मीळ सागवान लाकडाचा वापर झाला. बांधकामासाठी २३ हजार १०७ रुपये खर्च आला होता. महात्मा गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, वीर सावरकर, बॅरिस्टर युसुफ शरीफ, बॅरिस्टर अभ्यंकर आदी राष्ट्रीय नेत्यांनी या इमारतीत मुक्काम केल्याचा इतिहास आहे.

उच्च न्यायालयातील लढ्याला मिळाले यशया संघर्षाची न्यायालयाने सकारात्मक दखल घेतली आहे. ही इमारत स्मारक करण्याच्या दृष्टीने नागपूर खंडपीठाने याबाबत पुरातत्त्व विभागाच्या संचालकांना १५ जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. पुरातत्त्व विभागाचे नागपूर येथील सहायक संचालक मयूरेश खडके यांनीदेखील १८ डिसेंबरला राज्याचे संचालकांना सराय इमारतीला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषणा करत अधिसूचनेसाठी प्रस्तावपाठविण्याबाबतचे पत्र दिले होते. 

असा आहे सराय इमारतीचा इतिहासचंद्रपूर शहरात येणारे वाटसरू व महत्त्वाच्या लोकांना निवाऱ्याची सोय व्हावी, यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष माधवराव चेंडके यांच्या कार्यकाळात सराय बांधण्याची संकल्पना समोर आली. तेव्हा अनेकांनी लोकवर्गणी दिली. २ ऑक्टोबर १९२१ रोजी पायाभरणी झाली. तत्कालीन उपायुक्त जे. पी. बेहर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. सहा वर्षांनी इमारत पूर्ण झाली.

टॅग्स :historyइतिहासchandrapur-acचंद्रपूर