शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

अखेर जिल्हा प्रशासनाला मिळाले 79 कोटी 23 लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2022 22:59 IST

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधी देण्यासाठी त्यांचे बँक खाते क्रमांक आवश्यक आहे.     यासाठी तलाठी व  कोतवाल यांच्याकडे बँक खाते क्रमांक जमा करावयाचा असून याकरिता सर्व गावांमध्ये जाहीर प्रसिद्धी देऊनही मोठ्या प्रमाणात बँक खाते क्रमांक अप्राप्त आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेकडो हेक्टर क्षेत्रातील जमिनी खरडली.  जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करून शासनाकडे अहवाल सादर केल्याने नुकसानभरपाईसाठी वरोरा तालुक्याचा ७९ कोटी २३ लाखांचा निधी प्रशासनाकडे प्राप्त झाला. ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहे.अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधी देण्यासाठी त्यांचे बँक खाते क्रमांक आवश्यक आहे.     यासाठी तलाठी व  कोतवाल यांच्याकडे बँक खाते क्रमांक जमा करावयाचा असून याकरिता सर्व गावांमध्ये जाहीर प्रसिद्धी देऊनही मोठ्या प्रमाणात बँक खाते क्रमांक अप्राप्त आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही बँक खाते क्रमांक जमा केले नाही, त्यांनी तत्काळ आपले बँक खाते पासबुक तसेच आधारकार्डची झेरॉक्स प्रत संबंधित गावाचे तलाठी, ग्रामपंचायत कार्यालय, कोतवाल, ग्रामसेवक व कृषी सहायकाकडे जमा करावे, अशा   सूचना महसूल प्रशासनाने दिल्या. 

ई-केवायसीचा अडथळाज्या शेतकऱ्यांचे बँक खाते बंद झाले तसेच ई-केवायसी केली नाही त्यांनी तत्काळ आपल्या बँकेशी संपर्क साधून आपले बँक खाते अद्ययावत करून घ्यावे. जेणेकरून, पीक नुकसानीची रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होईल. अनेक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली नसल्याचे निदर्शनास आले. ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली नसेल त्यांनी आजच ई-पीक पाहणी करून घ्यावी. जे शेतकरी ई-पीक पाहणी करणार नाही त्यांच्या सातबारावर पीडित पीक पाहणी दिसेल. परिणामी, त्यांना शासकीय अनुदान, पीक कर्ज आदींबाबत अडचणी निर्माण होतील.

शेतमाल विकताय; लाईव्ह फोटो अपलोड करा !चंद्रपूर : खरीप पणन हंगाम २०२२-२३ मधील शासकीय आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदी केंद्रांना धान खरेदी सुरू करण्यासाठी नोंदणी करताना सातबाराधारक शेतकऱ्याचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतः खरेदी केंद्रावर उपस्थित राहावे लागणार आहे. धान खरेदीसाठी शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत आहे; परंतु शेतकरी नोंदणी अल्प प्रमाणात झाल्याने धान व भरडधान्य खरेदीसाठी एनईएमएल पोर्टलवर शेतकरी नोंदणीसाठी २१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीत शेतकरी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांनी केले.

१५ ऑक्टाेबर अंतिम मुदत१५ ऑक्टोबर २०२२ ही पीक पाहणीची अंतिम मुदत असल्याने मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांनी आपली पीक पाहणी तत्काळ करून घ्यावी. वरोरा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपले अद्ययावत बँक खाते क्रमांक, संमतीपत्र तलाठीकडे जमा करावे. जेणेकरून विहित मुदतीत अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास तालुका प्रशासनास सोयीचे होईल, असे आवाहन वरोरा तहसीलदारांनी केले     आहे.

 

टॅग्स :government schemeसरकारी योजना