शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अखेर पावसाची उसंत; धान रोवणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:36 IST

जुलैच्या शेवटच्या आठवडयापर्यंत निसर्गाच्या लहरीपणाचा फटका खरीप हंगामाला बसला. शेतकऱ्यांना जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाची प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र गेल्या २९ जुलैपासून पावसाने दमदार हजेरी लावली. सततच्या पावसानंतर आज शुक्रवारी पावसाने उसंत घेतली.

ठळक मुद्देमजुरांची ने-आण शेतकऱ्यांवरच : मजुरांची मजुरी व गुत्त्याचे भाव वधारले

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : जुलैच्या शेवटच्या आठवडयापर्यंत निसर्गाच्या लहरीपणाचा फटका खरीप हंगामाला बसला. शेतकऱ्यांना जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाची प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र गेल्या २९ जुलैपासून पावसाने दमदार हजेरी लावली. सततच्या पावसानंतर आज शुक्रवारी पावसाने उसंत घेतली. त्यामुळे ग्रामीण भागात रोवणीच्या कामाला गती प्राप्त झाली असून सर्वत्र एकाचवेळी रोवणी सुरु झाल्याने शेतकºयांची मजुरांसाठी धावाधाव सुरु आहे. मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने मजुरीच्या दरात वाढ झाली आहे. तसेच गुत्त्याच्या भावातसुद्धा काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर रोवणीला बाहेरून मजूर आणावे लागत असल्याने मजुरी सोबतच ने-आण करण्याचे भाडेही मोजावे लागत आहे.जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत दडी मारलेल्या पावसाने गत १५ दिवसांपासून दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणी जमा झाले. आता रोवणीची कामे सुरू असून तालुक्यात १५० ते २५० रुपये मजुरी झाली असून एकरानुसार घेतल्या जाणाºया गुत्त्याच्या भावात २००-३०० रुपयांची वाढ झाली आहे. ब्रम्हपुरी तालुक्यात २७ हजार ८४८ हेक्टर धानाचे क्षेत्र असून ११ हजार २४६ हेक्टर शेतजमिनीवर आवत्या धानाची पेरणी करण्यात आली आहे. जुलैपर्यंत फक्त २५ टक्के रोवणी झाली होती. आतापर्यंत तीन हजार ८३८ हेक्टर शेतजमिनीवरील रोवणी आटोपली आहे तर १२७७ हेक्टर जमिनीवरील धानाचे पºहे शिल्लक असून समाधानकारक झालेल्या पावसामुळे रोवणीअंतिम टप्प्यात आली आहे.दरवर्षी होत असलेल्या बेशुमार वृक्षतोडीमुळे, वाढत्या प्रदूषणामुळे पर्जन्यावर विपरित परिणाम झाल्याने रोहिणी, मृग, आद्रा नक्षत्र कोरडे गेले. काही शेतकऱ्यांनी पऱ्हे वाचविण्यासाठी टँकरने पाणी टाकून पºहे जगविले होते. काही काळ दडी मारलेल्या पावसामूळे शेतकरी चिंतातुर झाला होता. यावर्षी कोरडा दुष्काळ तर पडणार नाही, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले होते. परंतु उशिरा का होईना गत पंधरवडयापासून पावसाची संततधार तसेच अधूनमधून रिमझिम पाऊस बरसत असल्याने धान उत्पादक शेतकºयांना दिलासा मिळाला. तालुक्यात सरासरी १२०० मिमी पाऊस होत असतो. ९ आॅगस्टच्या नोंदीनुसार ब्रम्हपुरी तालुक्यात आतापर्यंत ५९६.५ मिमी पाऊस झाला आहे. यावर्षी लांबलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी मध्यम व हलक्या प्रतिच्या वाणाच्या धानाची निवड केली आहे. तालुक्यातील अनेक तलावात समाधानकारक जलसाठा झाला असून नदी-नाल्यांनाही पाणी वाढल्याने रोवणीसाठी शेतकºयांना सिंचनाची सोया उपलब्ध झाली आहे. त्यामुळे रोवणी, पेरणी, खते टाकणे या कामांना वेग आला आहे.आठ घरांची पडझडसिंदेवाही : मागील १५ दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले असून शहरातील प्रभाग क्र. १३ व प्रभाग क्र. १६ मधील आठ घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामा करुन आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. तसेच शहरातील रस्त्याची दैनावस्था झाली आहे. पायदळसुद्धा चालू शकत नाही. नगरपंचायत त्वरित लक्ष देऊन समस्या सोडवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती