शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

अखेर महाबीजने दिली नुकसानभरपाई

By admin | Updated: May 8, 2017 00:35 IST

गळीत धान्य योजनेअंतर्गत कृषी विभागाच्या वतीने महाबीज कंपनीचे जेएस ९५६० या वाणाचे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात आले.

बियाणे उगविलेच नाही : ४५२ शेतकऱ्यांचे झाले होते नुकसानप्रवीण खिरटकर । लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : गळीत धान्य योजनेअंतर्गत कृषी विभागाच्या वतीने महाबीज कंपनीचे जेएस ९५६० या वाणाचे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात आले. यासोबतच सदर बियाणे कृषी केंद्रातून घेवून शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु वरोरा तालुक्यातील ३३० हेक्टरमधील ४५२ शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणाची उगवणच झाली नाही. महाबीज कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, याकरिता ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे सातत्याने लक्ष वेधले. याची दखल घेत आता महाबीज कंपनीने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई त्यांच्या बँक खात्यात जमा करणे सुरू केले आहे.वरोरा तालुक्यातील भेंडाळा, अंतापूर, पिंपळगाव, वडधा, दिंदोडा, जामगाव, धानोली, चारगाव (खु), साखरा, बोरगाव, परसोडा आदी गावांमध्ये कृषी विभागाच्या वतीने गळीत धान्य योजनेअंतर्गत कृषी विभागाच्या वतीने महाबीज कंपनीने जेएच ९५६० या वानाचे सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांनी अनुदानावर कृषी केंद्रातून सदर वानाचे सोयाबीन बियाणे घेवून पेरणी केली. मात्र कित्येक दिवस लोटूनही सोयाबीन बियाणाची उगवण झाली नाही. त्यामुळे ३३० हेक्टर जमिनीतील ४४२ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या. या तक्रारीनंतर कृषी विभागात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. सोयाबीन पेरणीचा हंगाम निघून गेला व पेरलेल्या सोयाबीनवर झालेला खर्च व एक हंगाम जमीन पिकाविना पडून राहणार, यामुळे शेतकरी पूर्णत: खचला होता. दरम्यान, लोकमतने शेतकऱ्यांची ही व्यथा प्रकाशित करून सातत्याने याचा पाठपुरावा केला. कृषी विभागाने तपासणी चमू तयार करून तक्रारग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात भेट देवून अहवाल शासनाकडे व महाबीज कंपनीकडे जुलै २९१६ मध्ये सादर केला. परंतु या अहवालात त्रुटी असल्याचे वारंवार महाबीज कंपनीने कृषी विभागास कळविले.तेवढ्याही त्रुटी दूर करण्याकरिता कृषी विभागाने कंबर कसली. त्यानंतर महाबीजकडून शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले आहे. महाबीज कंपनीने नुकसान भरपाई देण्याकरिता शेतकऱ्यांचे बँक खाते मागून त्या बँक खात्यात नुकसान भरपाई देणे सुरू केले आहे. मागील हंगामातील नुकसान भरपाई चालू हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना मिळत असल्याने शेतकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.महाबीज कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आपण त्याच वेळेस केली होती. महाबीज कंपनीने तातडीने नुकसान भरपाई दिली असती किंवा बियाणे पुरविले असते तर शेतकऱ्यांचा एक हंगाम व्यर्थ गेला नसता हे विशेष!- विशाल बदखल, सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती वरोराज्या शेतकऱ्यांनी बँक खात्यासंबंधी अचूक माहिती दिली. त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होत आहे. ज्यांनी बँक खाते व आवश्यक कागदपत्राची पूर्तता केली नाही, अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास विलंब होत आहे. परंतु येत्या काही दिवसात सुरळीत होईल.- व्ही.आर. प्रकाशतालुका कृषी अधिकारी वरोरा