शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

अखेर महाबीजने दिली नुकसानभरपाई

By admin | Updated: May 8, 2017 00:35 IST

गळीत धान्य योजनेअंतर्गत कृषी विभागाच्या वतीने महाबीज कंपनीचे जेएस ९५६० या वाणाचे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात आले.

बियाणे उगविलेच नाही : ४५२ शेतकऱ्यांचे झाले होते नुकसानप्रवीण खिरटकर । लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : गळीत धान्य योजनेअंतर्गत कृषी विभागाच्या वतीने महाबीज कंपनीचे जेएस ९५६० या वाणाचे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात आले. यासोबतच सदर बियाणे कृषी केंद्रातून घेवून शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु वरोरा तालुक्यातील ३३० हेक्टरमधील ४५२ शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणाची उगवणच झाली नाही. महाबीज कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, याकरिता ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे सातत्याने लक्ष वेधले. याची दखल घेत आता महाबीज कंपनीने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई त्यांच्या बँक खात्यात जमा करणे सुरू केले आहे.वरोरा तालुक्यातील भेंडाळा, अंतापूर, पिंपळगाव, वडधा, दिंदोडा, जामगाव, धानोली, चारगाव (खु), साखरा, बोरगाव, परसोडा आदी गावांमध्ये कृषी विभागाच्या वतीने गळीत धान्य योजनेअंतर्गत कृषी विभागाच्या वतीने महाबीज कंपनीने जेएच ९५६० या वानाचे सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांनी अनुदानावर कृषी केंद्रातून सदर वानाचे सोयाबीन बियाणे घेवून पेरणी केली. मात्र कित्येक दिवस लोटूनही सोयाबीन बियाणाची उगवण झाली नाही. त्यामुळे ३३० हेक्टर जमिनीतील ४४२ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या. या तक्रारीनंतर कृषी विभागात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. सोयाबीन पेरणीचा हंगाम निघून गेला व पेरलेल्या सोयाबीनवर झालेला खर्च व एक हंगाम जमीन पिकाविना पडून राहणार, यामुळे शेतकरी पूर्णत: खचला होता. दरम्यान, लोकमतने शेतकऱ्यांची ही व्यथा प्रकाशित करून सातत्याने याचा पाठपुरावा केला. कृषी विभागाने तपासणी चमू तयार करून तक्रारग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात भेट देवून अहवाल शासनाकडे व महाबीज कंपनीकडे जुलै २९१६ मध्ये सादर केला. परंतु या अहवालात त्रुटी असल्याचे वारंवार महाबीज कंपनीने कृषी विभागास कळविले.तेवढ्याही त्रुटी दूर करण्याकरिता कृषी विभागाने कंबर कसली. त्यानंतर महाबीजकडून शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले आहे. महाबीज कंपनीने नुकसान भरपाई देण्याकरिता शेतकऱ्यांचे बँक खाते मागून त्या बँक खात्यात नुकसान भरपाई देणे सुरू केले आहे. मागील हंगामातील नुकसान भरपाई चालू हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना मिळत असल्याने शेतकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.महाबीज कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आपण त्याच वेळेस केली होती. महाबीज कंपनीने तातडीने नुकसान भरपाई दिली असती किंवा बियाणे पुरविले असते तर शेतकऱ्यांचा एक हंगाम व्यर्थ गेला नसता हे विशेष!- विशाल बदखल, सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती वरोराज्या शेतकऱ्यांनी बँक खात्यासंबंधी अचूक माहिती दिली. त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होत आहे. ज्यांनी बँक खाते व आवश्यक कागदपत्राची पूर्तता केली नाही, अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास विलंब होत आहे. परंतु येत्या काही दिवसात सुरळीत होईल.- व्ही.आर. प्रकाशतालुका कृषी अधिकारी वरोरा