शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

अखेर २५/१५ चा निधी पीडब्ल्यूडीला वळता

By admin | Updated: July 6, 2017 00:41 IST

विरोधकांच्या प्रश्नांना उडवाउडवीचे उत्तर देत मोठ्या कंत्राटदारांचे लाड पुरविण्यासाठी ग्रामीण लोकप्रतिनिधी ....

विरोधकांचा बहिष्कार : उडवाउडवीचे उत्तरे दिल्याचा आरोपलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विरोधकांच्या प्रश्नांना उडवाउडवीचे उत्तर देत मोठ्या कंत्राटदारांचे लाड पुरविण्यासाठी ग्रामीण लोकप्रतिनिधी कामाअंतर्गतचा (२५/१५) निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळते करण्याच्या हालचाली जिल्हा परिषद सत्ताधाऱ्यांकडून सुरू होत्या. बुधवारी पार पडलेल्या सभेत या विषयाला मंजुरी देण्यात आली. या निर्णयाला विरोध करीत विरोधकांनी जिल्हा परिषद बरखास्त करा, अशा घोषणा देत सभागृह सोडले. त्यामुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले कक्ष नूतनीकरणासाठी तसेच जिल्हा परिषद इमारतीसाठी ३ कोटी ४० लाख रूपये व ग्रामीण भागाच्या रस्त्यांसाठी ५ कोटी ४० लाख रूपयांची तरतूद केली. मात्र, ग्रामीण अर्थव्यवस्था असलेल्या कृषी विभागासह अन्य विभागाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात तोकड्या निधीची तरतूद केली. यातून सत्ताधारी पदाधिकारी ग्रामीण विकासाप्रति उदासीन असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे काँग्रेस गटनेते डॉ.सतीश वारजूकर यांनी केला आहे.सभेत सदस्यांना प्रश्नावली देण्यात आली नाही. त्यामुळे वातावरण चांगलेच गरम झाले. डॉ. वारजूकर यांचे ७० प्रश्न होते. त्यापैकी केवळ एका प्रश्नावर सभेत चर्चा झाली. मात्र एकाही प्रश्नाला लेखी उत्तर देण्यात आले नाही. सत्ताधाऱ्यांचा निषेधअर्थसंकल्पात वैयक्तिक लाभाच्या योजनांवर केवळ एक कोटींची तरतूद करण्यात आली. त्यामुळे वैयक्तिक लाभापासून सामान्य नागरिक वंचित राहण्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधी विकासकामासाठी (२५/१५ चा) २३ कोटी ६१ लाखांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त आहे. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता करून ग्रामपंचायतींवर अन्याय केल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद बरखास्त करा, अशा घोषणा देत गटनेता सतीश वारजूकर व इतर विरोधी सदस्यांनी सभागृहाबाहेर बहिर्गमन केले व सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदविला.शासन २५/१५ चा निधी जिल्हा परिषदेला एजन्सी म्हणून देत असते. या कामांचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले होते. कामे वेळेत पूर्ण व्हावीत म्हणून हा निधी पीडब्लूडीला वळता करण्यात आला आहे. वेळेवर निधी मिळाल्याने या कामांचे नियोजन जिल्हा परिषदेकडून होऊ शकले नसते आणि निधी परत गेला असता. - देवराव भोंगळे, जिल्हा परिषद अध्यक्ष, चंद्रपूर.