शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल वर्षभराच्या संघर्षानंतर मिळाला शेतकऱ्यांना पीक विमा

By साईनाथ कुचनकार | Updated: August 6, 2023 18:49 IST

महिला शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाला दिला होता निर्वाणीचा इशारा

साईनाथ कुचनकार, चंद्रपूर: मागील वर्षी आलेल्या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यातील काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला, तर काहींना विविध त्रुट्या काढून पीक विमा कंपनीने नुकसानभरपाई देण्याचे टाळले होते. दरम्यान, भद्रावती तालुक्यातील पिपरी देशमुख येथे शंभर टक्के नुकसान झाले असतानाही अल्पनुकसान देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. मात्र, येथील काही जागरूक शेतकऱ्यांनी विशेषत: महिला शेतकऱ्यांनी अन्नदाता एकता मंचच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासनाला निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर मात्र विमा कंपनी नरमली असून, मागील वर्षीच्या विम्याची रक्कम यावर्षी मिळणे सुरू झाले आहे.

मागील वर्षी जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. विविध ठिकाणी पुरामध्ये शेतीचे नुकसान झाले. भद्रावती तालुक्यातील पिपरी (देश) येथील संपूर्ण शेती पुराच्या पाण्याखाली आली होती. पिकांचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असतानाही काहींना अल्पनुकसान देऊन कंपनी मोकळी झाली. मात्र, अन्य शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. यानंतर अन्नदाता एकता मंचचे अध्यक्ष संदीप कुटेमाटे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना प्रथम तालुका कृषी कार्यालय गाठून तक्रार केली. यानंतरही त्यांच्या पदरी निराशा आली. मात्र, शेतकऱ्यांनी आपला लढा सुरूच ठेवला. जिल्हा कृषी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन देण्याचा उपक्रम सुरू ठेवला. एवढेच नाही गावातील महिला शेतकऱ्यांनी थेट जिल्हा कृषी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय गाठून विमा न दिल्यास कार्यालयातच बसून आंदोलन करण्याचा इशारा दिला. यानंतर मात्र कृषी विभागाला जाग आली. विभागाने विमा कंपनीच्या प्रतिनिधींना बोलावून चर्चा केली. यानंतर आता मागील वर्षीचा पीक विमा यावर्षी खात्यात जमा करणे सुरू केले आहे. मात्र, विमा पाॅलिसीनुसार शेतकऱ्यांना विमा न देता कमी देत असल्याने उर्वरित रक्कमही द्यावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

मागील वर्षी पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, विमा कंपनीने काहींनाच अल्प नुकसानभरपाई दिली, तर काही शेतकऱ्यांना भरपाई मिळालीच नाही. यासंदर्भात विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली. एवढेच नाही, तर गावातील महिला शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत आंदोलनाचा इशारा दिला होता. -संदीप खुटेमाटे, अध्यक्ष, अन्नदाता एकता मंच

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी