शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:01 IST

चंद्रपूर शहरातील अनेक वर्षे तांत्रिक आणि जमीन अधिग्रहणाच्या कामाने रखडलेला बाबुपेठ रेल्वे उड्डाणपूल साकारण्याचा मार्ग राज्य शासनाच्या ऐतिहासिक निर्णयाने मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी विशेष बाब म्हणून सरकारी जमिनीवरील अतिक्रमणधारकांना एकरकमी नुकसान भरपाई देण्याबाबत अनुकूल निर्णय दिला आहे.

ठळक मुद्देबाबूपेठमधील अतिक्रमणधारकांना मिळणार भरपाई : पालकमंत्र्यांकडून आश्वासनाची पूर्तता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरातील अनेक वर्षे तांत्रिक आणि जमीन अधिग्रहणाच्या कामाने रखडलेला बाबुपेठ रेल्वे उड्डाणपूल साकारण्याचा मार्ग राज्य शासनाच्या ऐतिहासिक निर्णयाने मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी विशेष बाब म्हणून सरकारी जमिनीवरील अतिक्रमणधारकांना एकरकमी नुकसान भरपाई देण्याबाबत अनुकूल निर्णय दिला आहे.या उड्डाण पुलाचा आरखडा, निधी आणि तांत्रिक मंजुरी होऊनही अपेक्षित जागेवरील अतिक्रमण केलेल्या रहिवाशांना न्याय देण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेली होती. त्यानुसार या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी एक उच्चस्तरीय सचिव गट निर्माण करण्यात आला होता. या समितीने सकारात्मक अहवाल दिला असून बाबुपेठ उड्डाण पुलाच्या प्रस्तावित जागेवरील अतिक्रमणधारकांना आता एकरकमी नुकसान भरपाई मिळणार आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या अतिक्रमणधारकांच्या नुकसान भरपाईसाठी सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, यासाठी मंत्रिमंडळात हा विषय लावून धरला होता. तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे २५ कोटी रुपयांचा निधी वळता करण्यात आला होता. यासोबतच केंद्र शासनाच्या स्तरावर रेल्वे विभागाशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रेल्वे विभागाच्या पहिल्या अर्थ संकल्पात बाबुपेठ उडाणपुलाला मंजुरी मिळवून देण्याकरिता कसोशीने प्रयत्न केले होते. बाबुपेठच्या नागरिकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आ. नाना श्यामकुळे यांनी मनपा ते मुख्यमंत्री असा संपर्क ठेऊन उड्डाण पुलाचे काम तडीस नेण्यासाठी प्रयत्न चालविले होते. उड्डाण पुलाच्या जागेवरील ६८ मालमत्ताधारकांना सन २०१५ च्या दरसुचीनुसार तीन कोटी १५ लाख ०५ हजार ६३५ रु. मोबदल्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे तर रेल्वेच्या जागेवरील ७३ मालमत्ताधारकांसाठी ९५ लाख ४९ हजार ७७२ रु. चा प्रस्ताव आहे. एकूण चार कोटी १० लाख ५५ हजार ४०७ रुपयांच्या निधीची यासाठी आवश्यकता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाने बाबुपेठ उड्डाणपुलाच्या निर्मितीतील सर्व अडथळे दूर झाले असून सुमारे ६२ कोटी रुपयांचा निधी खर्चून या पुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वे