शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:01 IST

चंद्रपूर शहरातील अनेक वर्षे तांत्रिक आणि जमीन अधिग्रहणाच्या कामाने रखडलेला बाबुपेठ रेल्वे उड्डाणपूल साकारण्याचा मार्ग राज्य शासनाच्या ऐतिहासिक निर्णयाने मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी विशेष बाब म्हणून सरकारी जमिनीवरील अतिक्रमणधारकांना एकरकमी नुकसान भरपाई देण्याबाबत अनुकूल निर्णय दिला आहे.

ठळक मुद्देबाबूपेठमधील अतिक्रमणधारकांना मिळणार भरपाई : पालकमंत्र्यांकडून आश्वासनाची पूर्तता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरातील अनेक वर्षे तांत्रिक आणि जमीन अधिग्रहणाच्या कामाने रखडलेला बाबुपेठ रेल्वे उड्डाणपूल साकारण्याचा मार्ग राज्य शासनाच्या ऐतिहासिक निर्णयाने मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी विशेष बाब म्हणून सरकारी जमिनीवरील अतिक्रमणधारकांना एकरकमी नुकसान भरपाई देण्याबाबत अनुकूल निर्णय दिला आहे.या उड्डाण पुलाचा आरखडा, निधी आणि तांत्रिक मंजुरी होऊनही अपेक्षित जागेवरील अतिक्रमण केलेल्या रहिवाशांना न्याय देण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेली होती. त्यानुसार या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी एक उच्चस्तरीय सचिव गट निर्माण करण्यात आला होता. या समितीने सकारात्मक अहवाल दिला असून बाबुपेठ उड्डाण पुलाच्या प्रस्तावित जागेवरील अतिक्रमणधारकांना आता एकरकमी नुकसान भरपाई मिळणार आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या अतिक्रमणधारकांच्या नुकसान भरपाईसाठी सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, यासाठी मंत्रिमंडळात हा विषय लावून धरला होता. तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे २५ कोटी रुपयांचा निधी वळता करण्यात आला होता. यासोबतच केंद्र शासनाच्या स्तरावर रेल्वे विभागाशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रेल्वे विभागाच्या पहिल्या अर्थ संकल्पात बाबुपेठ उडाणपुलाला मंजुरी मिळवून देण्याकरिता कसोशीने प्रयत्न केले होते. बाबुपेठच्या नागरिकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आ. नाना श्यामकुळे यांनी मनपा ते मुख्यमंत्री असा संपर्क ठेऊन उड्डाण पुलाचे काम तडीस नेण्यासाठी प्रयत्न चालविले होते. उड्डाण पुलाच्या जागेवरील ६८ मालमत्ताधारकांना सन २०१५ च्या दरसुचीनुसार तीन कोटी १५ लाख ०५ हजार ६३५ रु. मोबदल्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे तर रेल्वेच्या जागेवरील ७३ मालमत्ताधारकांसाठी ९५ लाख ४९ हजार ७७२ रु. चा प्रस्ताव आहे. एकूण चार कोटी १० लाख ५५ हजार ४०७ रुपयांच्या निधीची यासाठी आवश्यकता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाने बाबुपेठ उड्डाणपुलाच्या निर्मितीतील सर्व अडथळे दूर झाले असून सुमारे ६२ कोटी रुपयांचा निधी खर्चून या पुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वे