शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सुविधांवर भर द्या, टक्केवारी नक्की वाढेल

By admin | Updated: October 4, 2014 23:24 IST

भारत निवडणूक आयोगाने मतदार शिक्षण व सहभागाचा पद्धतशिर कार्यक्रम प्रभाविपणे राबविण्याच्या सूचना दिल्या असून त्या अनुषंगाने मतदारांना माहिती, प्रोत्साहन व सुविधा पुरविल्यास

चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाने मतदार शिक्षण व सहभागाचा पद्धतशिर कार्यक्रम प्रभाविपणे राबविण्याच्या सूचना दिल्या असून त्या अनुषंगाने मतदारांना माहिती, प्रोत्साहन व सुविधा पुरविल्यास मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल, असा विश्वास स्वीपचे निरीक्षक कृपाशंकर यादव यांनी व्यक्त केला. प्रियदर्शिनी सभागृह येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, मनपा आयुक्त सुधीर शंभरटकर, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दामोधर नान्हे, स्वीपचे नोडल आॅफिसर सुरेश वानखेडे तथा सदस्य यावेळी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होणे व आयोगाचा उद्देश असून त्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशिल आहे. लोकांना मतदानासाठी जागृत करणे, प्रोत्साहित करणे व सुविधा पुरविणे या बाबी केल्यास मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढणार आहे, असे त्यांनी सांगितले. शाळा, महाविद्यालयात मॉक पोल घेण्याच्या सूचना यादव यांनी दिल्या. प्रत्येक मतदान केंद्रावर एक दिवस मतदार याद्या लावण्याचे त्यांनी सूचविले. जिल्ह्यातील सर्व मतदार संघात ८ आॅक्टोबरपर्यंत मतदार चिठ्ठीची (पोलींग चिट) पोहचविली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत शहरी भाागात कमी मतदार झाल्याचे निर्देशनास आल्याचे सांगून ८४ मतदान केंद्रावर ५० टक्क्यापेक्षा कमी मतदार झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. गैरहजर किंवा स्थलांतरित झालेल्या मतदारामुळेसुद्धा टक्केवारीवर परिणाम झाला असून अशा मतदारांची यादी वेगळ्याने तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक दिवस मतदारांच्या सुविधेसाठी याद्या लावण्यात येणार आहे. मतदारांच्या सुविधेसाठी मोबाईल मतदार सुविधा केंद्र प्रत्येक तालुक्यासाठी तयार करण्यात आले असून यात लॅपटापवर मतदार यादी पाहण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. लोकसभेमध्ये जास्त मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतीला पुरस्कार देण्यात आला होता. विधानसभेसाठीही जास्त मतदान करणाऱ्या ग्रामपंचायतीला पुरस्कार देण्यात येणार असून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सहाय्य करणाऱ्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांनाही पुरस्कृत करण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली.लोकसभेत जास्त मतदान करणाऱ्या स्पर्धेत प्रथम आलेल्या नागलोन ता.भद्रावती, द्वितीय भालेश्वर ता. ब्रह्मपुरी, तृतीय सोनुर्ली ता. राजुरा सर्वाधिक महिला मतदान स्पर्धेत प्रथम साखरी ता. राजुरा, भालेश्वर, पाचगाव ता. ब्रह्मपुरी या गावाच्या सरपंच व ग्राम सचिवाचा यावेळी सत्कार करण्ययात आला. मतदान जागृती करण्यासाठी शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आदिवासी विभाग, समाज कल्याण विभाग, सहकार विभाग व नेहरु युवा केंद्राने आराखडा बनविला असून या आराखड्याचे सादरीकरण स्वीप निरीक्षक यांच्यासमोर करण्यात आले. सकाळच्या सत्रात मनपा आयुक्त सुधीर शंभरकर यांनी मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त मतदान करुन घेण्यासाठी प्रोत्साहित केले. (शहर प्रतिनिधी)