शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

सुविधांवर भर द्या, टक्केवारी नक्की वाढेल

By admin | Updated: October 4, 2014 23:24 IST

भारत निवडणूक आयोगाने मतदार शिक्षण व सहभागाचा पद्धतशिर कार्यक्रम प्रभाविपणे राबविण्याच्या सूचना दिल्या असून त्या अनुषंगाने मतदारांना माहिती, प्रोत्साहन व सुविधा पुरविल्यास

चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाने मतदार शिक्षण व सहभागाचा पद्धतशिर कार्यक्रम प्रभाविपणे राबविण्याच्या सूचना दिल्या असून त्या अनुषंगाने मतदारांना माहिती, प्रोत्साहन व सुविधा पुरविल्यास मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल, असा विश्वास स्वीपचे निरीक्षक कृपाशंकर यादव यांनी व्यक्त केला. प्रियदर्शिनी सभागृह येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, मनपा आयुक्त सुधीर शंभरटकर, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दामोधर नान्हे, स्वीपचे नोडल आॅफिसर सुरेश वानखेडे तथा सदस्य यावेळी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होणे व आयोगाचा उद्देश असून त्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशिल आहे. लोकांना मतदानासाठी जागृत करणे, प्रोत्साहित करणे व सुविधा पुरविणे या बाबी केल्यास मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढणार आहे, असे त्यांनी सांगितले. शाळा, महाविद्यालयात मॉक पोल घेण्याच्या सूचना यादव यांनी दिल्या. प्रत्येक मतदान केंद्रावर एक दिवस मतदार याद्या लावण्याचे त्यांनी सूचविले. जिल्ह्यातील सर्व मतदार संघात ८ आॅक्टोबरपर्यंत मतदार चिठ्ठीची (पोलींग चिट) पोहचविली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत शहरी भाागात कमी मतदार झाल्याचे निर्देशनास आल्याचे सांगून ८४ मतदान केंद्रावर ५० टक्क्यापेक्षा कमी मतदार झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. गैरहजर किंवा स्थलांतरित झालेल्या मतदारामुळेसुद्धा टक्केवारीवर परिणाम झाला असून अशा मतदारांची यादी वेगळ्याने तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक दिवस मतदारांच्या सुविधेसाठी याद्या लावण्यात येणार आहे. मतदारांच्या सुविधेसाठी मोबाईल मतदार सुविधा केंद्र प्रत्येक तालुक्यासाठी तयार करण्यात आले असून यात लॅपटापवर मतदार यादी पाहण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. लोकसभेमध्ये जास्त मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतीला पुरस्कार देण्यात आला होता. विधानसभेसाठीही जास्त मतदान करणाऱ्या ग्रामपंचायतीला पुरस्कार देण्यात येणार असून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सहाय्य करणाऱ्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांनाही पुरस्कृत करण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली.लोकसभेत जास्त मतदान करणाऱ्या स्पर्धेत प्रथम आलेल्या नागलोन ता.भद्रावती, द्वितीय भालेश्वर ता. ब्रह्मपुरी, तृतीय सोनुर्ली ता. राजुरा सर्वाधिक महिला मतदान स्पर्धेत प्रथम साखरी ता. राजुरा, भालेश्वर, पाचगाव ता. ब्रह्मपुरी या गावाच्या सरपंच व ग्राम सचिवाचा यावेळी सत्कार करण्ययात आला. मतदान जागृती करण्यासाठी शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आदिवासी विभाग, समाज कल्याण विभाग, सहकार विभाग व नेहरु युवा केंद्राने आराखडा बनविला असून या आराखड्याचे सादरीकरण स्वीप निरीक्षक यांच्यासमोर करण्यात आले. सकाळच्या सत्रात मनपा आयुक्त सुधीर शंभरकर यांनी मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त मतदान करुन घेण्यासाठी प्रोत्साहित केले. (शहर प्रतिनिधी)