शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

सुविधांवर भर द्या, टक्केवारी नक्की वाढेल

By admin | Updated: October 4, 2014 23:24 IST

भारत निवडणूक आयोगाने मतदार शिक्षण व सहभागाचा पद्धतशिर कार्यक्रम प्रभाविपणे राबविण्याच्या सूचना दिल्या असून त्या अनुषंगाने मतदारांना माहिती, प्रोत्साहन व सुविधा पुरविल्यास

चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाने मतदार शिक्षण व सहभागाचा पद्धतशिर कार्यक्रम प्रभाविपणे राबविण्याच्या सूचना दिल्या असून त्या अनुषंगाने मतदारांना माहिती, प्रोत्साहन व सुविधा पुरविल्यास मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल, असा विश्वास स्वीपचे निरीक्षक कृपाशंकर यादव यांनी व्यक्त केला. प्रियदर्शिनी सभागृह येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, मनपा आयुक्त सुधीर शंभरटकर, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दामोधर नान्हे, स्वीपचे नोडल आॅफिसर सुरेश वानखेडे तथा सदस्य यावेळी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होणे व आयोगाचा उद्देश असून त्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशिल आहे. लोकांना मतदानासाठी जागृत करणे, प्रोत्साहित करणे व सुविधा पुरविणे या बाबी केल्यास मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढणार आहे, असे त्यांनी सांगितले. शाळा, महाविद्यालयात मॉक पोल घेण्याच्या सूचना यादव यांनी दिल्या. प्रत्येक मतदान केंद्रावर एक दिवस मतदार याद्या लावण्याचे त्यांनी सूचविले. जिल्ह्यातील सर्व मतदार संघात ८ आॅक्टोबरपर्यंत मतदार चिठ्ठीची (पोलींग चिट) पोहचविली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत शहरी भाागात कमी मतदार झाल्याचे निर्देशनास आल्याचे सांगून ८४ मतदान केंद्रावर ५० टक्क्यापेक्षा कमी मतदार झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. गैरहजर किंवा स्थलांतरित झालेल्या मतदारामुळेसुद्धा टक्केवारीवर परिणाम झाला असून अशा मतदारांची यादी वेगळ्याने तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक दिवस मतदारांच्या सुविधेसाठी याद्या लावण्यात येणार आहे. मतदारांच्या सुविधेसाठी मोबाईल मतदार सुविधा केंद्र प्रत्येक तालुक्यासाठी तयार करण्यात आले असून यात लॅपटापवर मतदार यादी पाहण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. लोकसभेमध्ये जास्त मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतीला पुरस्कार देण्यात आला होता. विधानसभेसाठीही जास्त मतदान करणाऱ्या ग्रामपंचायतीला पुरस्कार देण्यात येणार असून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सहाय्य करणाऱ्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांनाही पुरस्कृत करण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली.लोकसभेत जास्त मतदान करणाऱ्या स्पर्धेत प्रथम आलेल्या नागलोन ता.भद्रावती, द्वितीय भालेश्वर ता. ब्रह्मपुरी, तृतीय सोनुर्ली ता. राजुरा सर्वाधिक महिला मतदान स्पर्धेत प्रथम साखरी ता. राजुरा, भालेश्वर, पाचगाव ता. ब्रह्मपुरी या गावाच्या सरपंच व ग्राम सचिवाचा यावेळी सत्कार करण्ययात आला. मतदान जागृती करण्यासाठी शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आदिवासी विभाग, समाज कल्याण विभाग, सहकार विभाग व नेहरु युवा केंद्राने आराखडा बनविला असून या आराखड्याचे सादरीकरण स्वीप निरीक्षक यांच्यासमोर करण्यात आले. सकाळच्या सत्रात मनपा आयुक्त सुधीर शंभरकर यांनी मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त मतदान करुन घेण्यासाठी प्रोत्साहित केले. (शहर प्रतिनिधी)