शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पोटाची खळगी भरण्यासाठी थाटला शेतातच संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:56 IST

उपाशी पोट माणसाला स्वस्थ बसू देत नाही. पोटासाठी त्याला कुठली ना कुठली तडजोड करावी लागते. टिचभर पोटासाठी स्वत:चे घरदार सोडून रोजगाराच्या शोधात आलेल्या कुटुंबीयांनी शेतातच संसार थाटला आहे.

ठळक मुद्देजीवापाड मेहनत : घरदार सोडून कामासाठी भटकंती

प्रकाश काळे ।आॅनलाईन लोकमतगोवरी: उपाशी पोट माणसाला स्वस्थ बसू देत नाही. पोटासाठी त्याला कुठली ना कुठली तडजोड करावी लागते. टिचभर पोटासाठी स्वत:चे घरदार सोडून रोजगाराच्या शोधात आलेल्या कुटुंबीयांनी शेतातच संसार थाटला आहे.तेलंगणा राज्यातील भगवान भटकाळी रा. रुपापूर व अंकूश जाधव हे आदिलाबाद जिल्ह्यातील एकाच गावातील रहिवासी तर मनोहर दुबळे हा जिवती तालुक्यातील टेकेझरी या गावाचा. गावाकडे रोजगाराची सोय नाही. दिवाळीनंतर गावाकडे रोजगार मिळत नाही. त्यामुळे पोटाची मारामार होते. कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर येतो. त्यामुळे रोजगाराची सोय म्हणून गावोगावी रोजगार शोधावा लागतो, असे त्यांचे म्हणणे आहे. राजुरा तालुक्यातील गोवरी येथील अमित रणदिवे व सुमीत रणदिवे या दोन भावंडानी त्यांना राहण्यासाठी शेतातच सोय करुन दिली आहे. कापूस वेचून दिवसाकाठी जे मजुरी मिळते, त्या मजुरीवरच ते कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. अंकुश जाधव व मनोहर दुबळे यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. घरी जमिनीचा कोरभर तुकडाही नाही. त्यामुळे त्यांना रोजगार केल्याशिवाय कोणताच पर्याय नाही. भगवान भटकाळी यांची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. गावाकडे रोजगाराची कोणतीच सोय नसल्याने त्यांना रोजगार मिळविण्यासाठी नेहमीच भटकंती करावी लागते. लहान मुलाबाळांना व म्हाताºया आईवडीलांना घरीच सोडून हे कुटुंब रोजगारासाठी गोवरी येथे आले आहे. आम्ही शेतातच राहतो. आम्हाला फक्त रोजगार मिळवून द्या, असा त्यांचा केविलवाणा टाहो आहे. काम संपल्यावर पुन्हा त्यांना आम्हाला दुसºया गावाला रोजगार शोधात जावे लागणार असल्याची खंत अंकुश जाधव याने बोलून दाखविली.ऊन्ह, वारा, थंडीची जराहा जमा न बाळगता टिचभर पोटासाठी शेतातच केविलवाणा संसार थाटून त्यांची चाललेली धडपड संघर्षाचे जिणे समाजमन सुन्न करणारे आहे.नशिबात संघर्षाचेच जिणेगावाकडे रोजगार मिळत नाही. रोजगाराचा शोधात नेहमीच भटकंती करावी लागते. काम केले नाही तर उद्याची चूल पेटणार कशी ? त्यामुळे काम केल्याशिवाय आम्हाला कोणताच पर्याय नाही, अशी खंत या कुटुंबीयांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.