शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकली; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
2
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
3
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
5
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
6
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
7
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
8
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
9
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
10
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
11
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
12
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
13
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
14
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
15
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
16
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
17
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
18
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
19
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
20
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
Daily Top 2Weekly Top 5

पोटाची खळगी भरण्यासाठी थाटला शेतातच संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:56 IST

उपाशी पोट माणसाला स्वस्थ बसू देत नाही. पोटासाठी त्याला कुठली ना कुठली तडजोड करावी लागते. टिचभर पोटासाठी स्वत:चे घरदार सोडून रोजगाराच्या शोधात आलेल्या कुटुंबीयांनी शेतातच संसार थाटला आहे.

ठळक मुद्देजीवापाड मेहनत : घरदार सोडून कामासाठी भटकंती

प्रकाश काळे ।आॅनलाईन लोकमतगोवरी: उपाशी पोट माणसाला स्वस्थ बसू देत नाही. पोटासाठी त्याला कुठली ना कुठली तडजोड करावी लागते. टिचभर पोटासाठी स्वत:चे घरदार सोडून रोजगाराच्या शोधात आलेल्या कुटुंबीयांनी शेतातच संसार थाटला आहे.तेलंगणा राज्यातील भगवान भटकाळी रा. रुपापूर व अंकूश जाधव हे आदिलाबाद जिल्ह्यातील एकाच गावातील रहिवासी तर मनोहर दुबळे हा जिवती तालुक्यातील टेकेझरी या गावाचा. गावाकडे रोजगाराची सोय नाही. दिवाळीनंतर गावाकडे रोजगार मिळत नाही. त्यामुळे पोटाची मारामार होते. कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर येतो. त्यामुळे रोजगाराची सोय म्हणून गावोगावी रोजगार शोधावा लागतो, असे त्यांचे म्हणणे आहे. राजुरा तालुक्यातील गोवरी येथील अमित रणदिवे व सुमीत रणदिवे या दोन भावंडानी त्यांना राहण्यासाठी शेतातच सोय करुन दिली आहे. कापूस वेचून दिवसाकाठी जे मजुरी मिळते, त्या मजुरीवरच ते कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. अंकुश जाधव व मनोहर दुबळे यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. घरी जमिनीचा कोरभर तुकडाही नाही. त्यामुळे त्यांना रोजगार केल्याशिवाय कोणताच पर्याय नाही. भगवान भटकाळी यांची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. गावाकडे रोजगाराची कोणतीच सोय नसल्याने त्यांना रोजगार मिळविण्यासाठी नेहमीच भटकंती करावी लागते. लहान मुलाबाळांना व म्हाताºया आईवडीलांना घरीच सोडून हे कुटुंब रोजगारासाठी गोवरी येथे आले आहे. आम्ही शेतातच राहतो. आम्हाला फक्त रोजगार मिळवून द्या, असा त्यांचा केविलवाणा टाहो आहे. काम संपल्यावर पुन्हा त्यांना आम्हाला दुसºया गावाला रोजगार शोधात जावे लागणार असल्याची खंत अंकुश जाधव याने बोलून दाखविली.ऊन्ह, वारा, थंडीची जराहा जमा न बाळगता टिचभर पोटासाठी शेतातच केविलवाणा संसार थाटून त्यांची चाललेली धडपड संघर्षाचे जिणे समाजमन सुन्न करणारे आहे.नशिबात संघर्षाचेच जिणेगावाकडे रोजगार मिळत नाही. रोजगाराचा शोधात नेहमीच भटकंती करावी लागते. काम केले नाही तर उद्याची चूल पेटणार कशी ? त्यामुळे काम केल्याशिवाय आम्हाला कोणताच पर्याय नाही, अशी खंत या कुटुंबीयांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.