शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता करवाढविरोधातील आंदोलनाचा पाचवा दिवस

By admin | Updated: March 12, 2016 01:22 IST

चंद्रपूर शहर महानगरपालिकेने मालमत्ता करात चार ते पाच पट वाढ केली आहे. यामुळे नागरिकांचे कंबरडेच मोडले

आंदोलन आणखी तीव्र : मनपाने करवाढ मागे घ्यावीचंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेने मालमत्ता करात चार ते पाच पट वाढ केली आहे. यामुळे नागरिकांचे कंबरडेच मोडले असून ही वाढ अन्यायकारक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या करवाढीविरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीच्या वतीने ७ मार्चपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. शुक्रवार उपोषणाचा चौथा दिवस असून आंदोलन आणखी तीव्र होत आहे.काल गुरुवारी काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता लोढीया, लालुमती यादव, तारावती यादव, रमाबाई अहिर उपोषणाला बसल्या होत्या. माजी खासदार नरेश पुगलिया, युवा नेता राहुल पुगलिया, शहर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष गजानन गावंडे, डॉ. महावीर सोईतकर यांच्या हस्ते लिंबूपाणी देऊन दुसऱ्या दिवशी बसलेल्या उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडविण्यात आले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी उपोषणास बसणाऱ्या नगरसेवक राजेश रेवेल्लीवार, देवीदास गेडाम, श्रीनिवास पारनंदी व भारत जंगम यांचे माल्यार्पण करून स्वागत करण्यात आले.वाढलेल्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेला ही करवाढ आणखी त्रस्त करणारी आहे. लहान मोठे व्यापारी, फुटपाथवरील कपडे विक्रेता, चहा टी स्टॉल किंवा हातठेलाधारक यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. हे लहान मोठे व्यापारी हातावर आणून पानावर खातात. एखाद्या छोटेखानी घरात त्यांचे वास्तव्य असते. मात्र आता त्या मालमत्तेसाठी त्यांचा चार ते पाच पट कर भरावा लागणार आहे. यामुळे ते आर्थिक कोंडीत सापडले आहेत. महानगरपालिकेने पूर्वीच्या कराप्रमाणे कर आकारणी करावी. जेणेकरून गोरगरीबांची उपासमार होणार नाही. त्यांना त्रास होणार नाही. जनतेच्या हितासाठी मनपाचे धोरण असावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. नागरिकांना न्याय देण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीने पुढाकार घेऊन ७ मार्चपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. (शहर प्रतिनिधी)