शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

मालमत्ता करवाढविरोधातील आंदोलनाचा पाचवा दिवस

By admin | Updated: March 12, 2016 01:22 IST

चंद्रपूर शहर महानगरपालिकेने मालमत्ता करात चार ते पाच पट वाढ केली आहे. यामुळे नागरिकांचे कंबरडेच मोडले

आंदोलन आणखी तीव्र : मनपाने करवाढ मागे घ्यावीचंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेने मालमत्ता करात चार ते पाच पट वाढ केली आहे. यामुळे नागरिकांचे कंबरडेच मोडले असून ही वाढ अन्यायकारक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या करवाढीविरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीच्या वतीने ७ मार्चपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. शुक्रवार उपोषणाचा चौथा दिवस असून आंदोलन आणखी तीव्र होत आहे.काल गुरुवारी काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता लोढीया, लालुमती यादव, तारावती यादव, रमाबाई अहिर उपोषणाला बसल्या होत्या. माजी खासदार नरेश पुगलिया, युवा नेता राहुल पुगलिया, शहर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष गजानन गावंडे, डॉ. महावीर सोईतकर यांच्या हस्ते लिंबूपाणी देऊन दुसऱ्या दिवशी बसलेल्या उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडविण्यात आले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी उपोषणास बसणाऱ्या नगरसेवक राजेश रेवेल्लीवार, देवीदास गेडाम, श्रीनिवास पारनंदी व भारत जंगम यांचे माल्यार्पण करून स्वागत करण्यात आले.वाढलेल्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेला ही करवाढ आणखी त्रस्त करणारी आहे. लहान मोठे व्यापारी, फुटपाथवरील कपडे विक्रेता, चहा टी स्टॉल किंवा हातठेलाधारक यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. हे लहान मोठे व्यापारी हातावर आणून पानावर खातात. एखाद्या छोटेखानी घरात त्यांचे वास्तव्य असते. मात्र आता त्या मालमत्तेसाठी त्यांचा चार ते पाच पट कर भरावा लागणार आहे. यामुळे ते आर्थिक कोंडीत सापडले आहेत. महानगरपालिकेने पूर्वीच्या कराप्रमाणे कर आकारणी करावी. जेणेकरून गोरगरीबांची उपासमार होणार नाही. त्यांना त्रास होणार नाही. जनतेच्या हितासाठी मनपाचे धोरण असावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. नागरिकांना न्याय देण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीने पुढाकार घेऊन ७ मार्चपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. (शहर प्रतिनिधी)