शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

पंधरा वर्षांपासून सुरू आहे घरकुलसाठी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : बल्हारपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोठारी येथील आर्थिकदृष्ट्या मागास व पात्र व्यक्तिंना मागील पंधरा वर्र्षांपासून घरकुलसाठी संबंधित अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करीत आहेत़ मात्र, विविध कारणे पुढे करून लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला़रमेश झाडे यांनी घरकुलसाठी ग्रा.पं.च्या कार्यालयात अर्ज दाखल केले होते़ त्यांचे कुटुंबिय दारिद्र्य रेषेखाली येते़ सदर ...

ठळक मुद्देवंचिताची व्यथा : अधिकाºयांकडून अर्जांला केराची टोपली

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : बल्हारपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोठारी येथील आर्थिकदृष्ट्या मागास व पात्र व्यक्तिंना मागील पंधरा वर्र्षांपासून घरकुलसाठी संबंधित अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करीत आहेत़ मात्र, विविध कारणे पुढे करून लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला़रमेश झाडे यांनी घरकुलसाठी ग्रा.पं.च्या कार्यालयात अर्ज दाखल केले होते़ त्यांचे कुटुंबिय दारिद्र्य रेषेखाली येते़ सदर प्रकार एकट्या रमेश झाडे यांची नसून इतर मागास प्रवर्गातील अनेकांच्या बाबत घडला घडला आहे़ सन २०१६-१७ या वर्षात अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास प्रवर्गातील ४४४ दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाल्याची यादी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली.त्यासाठी लाभार्थ्यांकडून कागदपत्राची मागणी करण्यात आली होती. कागदपत्रांची पूर्तता करूनही आजपर्यंत घरकुल देण्यात आले नाही. पंतप्रधान आवास योजनेतून कोठारी येथे ३४ घरकुल मंजूर झाले. त्यांचे कामही सुरु झाले. मात्र, त्यापूर्वी असलल्या ४४४ पैकी १४४ लाभार्थ्यांना घरकुल नामंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. या लाभार्थ्यांचा पंतप्रधान घरकुल योजनेत समाविष्ठ न केल्याने भविष्यात घरकुलचा लाभ मिळण्याची आशा धूसर झाली आहे. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील बहुतेक कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळाला़ मात्र दारिद्र्य रेषेखाली इतर मागास प्रवर्गातील गरीबांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्यात येत आहे.इतर मागास प्रवर्गातील गोरगरीबांचे जीवनमान अतिशय गरीबीचे आहे़मोलमजुरी करुन कुटुंबाचा गाडा हाकतात़ मुलांचे शिक्षण, लग्न करताना त्यांची दमछाक होत आहे. इंदिरा आवास व शबरी योजनेतून अनेक कुटुंबातील दोन-तीन व्यक्तींना तसेच सधन कुटुंबानाही लाभ देण्यात आला. पंतप्रधान योजनेत सध्या मंजूर घरकुल लाभार्थी आर्थिकदृष्ट्या संपन्न असताना त्यांनाही पात्र ठरविण्यात आले आहे.परंतु, जे प्रत्यक्ष योजनेसाठी लाभार्थी आहेत़ ज्यांना घरकुलाची निंतात आवश्यकता आहे़ त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे़ त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी या योजनेची चौकशी करून पात्र व्यक्तिंना लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे़