शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

चिमूरच्या बाजारओळीत भीषण आग

By admin | Updated: June 27, 2017 00:41 IST

शहरातील मुख्य बाजारपेठलगत असलेल्या साई मंदिराच्या जवळील छबुताई चुंचूवार यांच्या पुरातन वाड्याला सोमवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास आग लागली.

७० लाखांचे नुकसान : कापडाच्या गोडाऊनसह चुंचूवार यांचा वाडा जळून खाकलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : शहरातील मुख्य बाजारपेठलगत असलेल्या साई मंदिराच्या जवळील छबुताई चुंचूवार यांच्या पुरातन वाड्याला सोमवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीने उग्र रूप धारण करून जवळपास असलेल्या तीन दुकानांसह कापडाच्या गोडाऊनला आपले लक्ष्य केले. यामध्ये ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तविला जात आहे.शॉर्ट सक्रिट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रमजान ईदच्या पूर्वरात्री काही युवक या चौकातून जात असताना चुंचूवार यांच्या घरातून धूर निघत असताना दिसले. तेव्हा या युवकांनी जनरल स्टोअर्स मालकाला जागवून आगीची माहिती चिमूर पोलिसांना दिली. ठाणेदार दिनेश लबडे हे आपल्या सहकाऱ्यांना घेवून काही युवकाच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा जोर वाढतच गेला. तेव्हा पाहता-पाहता परिसरातील नागरिक घटनास्थळावर जमा झाले. नागरिक मदत करण्यासाठी जे जमेल ते करू लागले, पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडत होते. आगीचे रूद्र रूप बघून वरोरा व उमरेड येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र अग्निशमन दल येईपर्यंत आगीने दोन दुकानासह एका कापड्याच्या गोडावूनला आपले भक्ष्य बनविले. आग विझेपर्यंत छबुताई चुंचुवार यांचा पुरातन वाडा जळून खाक झाला. त्यामध्ये त्याचे ५ लाख ४५ हजाराचे नुकसान झाले. कांताबाई असावा यांचे कापड्याचे गोडाऊन जळाले. त्यात ३८ लाख रुपयांचे कपडे जळाले. तृप्ती विजय कामडी यांच्या जनरल स्टोर्समधील १ लाख २६ हजार रुपयाचा माल, सुरेश चौधरी यांचे २५ लाख तर चंद्रशेखर डबले यांचे १ लाख ५० हजारांचे साहित्य जळाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस व युवकांच्या सतर्कतेने टळली जिवीत हानी चुंचूवार यांच्या वाड्यात किरायाने राहणाऱ्या घरात दोन गॅस सिलिंडर होते. मात्र आगीची पर्वा न करता मागचा दरवाजा तोडून काही युवक व पोलिसांनीही सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे स्फोट घडण्यापासून बचावले. मध्यरात्री लागलेली आग विझविताना नागरिकांनी वॉटर टँकर, बादलीने पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रुप घेतल्याने टँकर व पाईपनेही आग विझविण्यात नागरिकांना यश येत नव्हते. तर अग्निशन दलाच्या दोन गाड्या पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र दोन बमखल मधील पाणीही अपुरे पडले. तेव्हा येथील तपासे यांच्या विहिरीवरून अग्निशमन गाडीत पाणी भरून तब्बल सहा तासाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.