शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

चिमूरच्या बाजारओळीत भीषण आग

By admin | Updated: June 27, 2017 00:41 IST

शहरातील मुख्य बाजारपेठलगत असलेल्या साई मंदिराच्या जवळील छबुताई चुंचूवार यांच्या पुरातन वाड्याला सोमवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास आग लागली.

७० लाखांचे नुकसान : कापडाच्या गोडाऊनसह चुंचूवार यांचा वाडा जळून खाकलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : शहरातील मुख्य बाजारपेठलगत असलेल्या साई मंदिराच्या जवळील छबुताई चुंचूवार यांच्या पुरातन वाड्याला सोमवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीने उग्र रूप धारण करून जवळपास असलेल्या तीन दुकानांसह कापडाच्या गोडाऊनला आपले लक्ष्य केले. यामध्ये ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तविला जात आहे.शॉर्ट सक्रिट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रमजान ईदच्या पूर्वरात्री काही युवक या चौकातून जात असताना चुंचूवार यांच्या घरातून धूर निघत असताना दिसले. तेव्हा या युवकांनी जनरल स्टोअर्स मालकाला जागवून आगीची माहिती चिमूर पोलिसांना दिली. ठाणेदार दिनेश लबडे हे आपल्या सहकाऱ्यांना घेवून काही युवकाच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा जोर वाढतच गेला. तेव्हा पाहता-पाहता परिसरातील नागरिक घटनास्थळावर जमा झाले. नागरिक मदत करण्यासाठी जे जमेल ते करू लागले, पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडत होते. आगीचे रूद्र रूप बघून वरोरा व उमरेड येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र अग्निशमन दल येईपर्यंत आगीने दोन दुकानासह एका कापड्याच्या गोडावूनला आपले भक्ष्य बनविले. आग विझेपर्यंत छबुताई चुंचुवार यांचा पुरातन वाडा जळून खाक झाला. त्यामध्ये त्याचे ५ लाख ४५ हजाराचे नुकसान झाले. कांताबाई असावा यांचे कापड्याचे गोडाऊन जळाले. त्यात ३८ लाख रुपयांचे कपडे जळाले. तृप्ती विजय कामडी यांच्या जनरल स्टोर्समधील १ लाख २६ हजार रुपयाचा माल, सुरेश चौधरी यांचे २५ लाख तर चंद्रशेखर डबले यांचे १ लाख ५० हजारांचे साहित्य जळाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस व युवकांच्या सतर्कतेने टळली जिवीत हानी चुंचूवार यांच्या वाड्यात किरायाने राहणाऱ्या घरात दोन गॅस सिलिंडर होते. मात्र आगीची पर्वा न करता मागचा दरवाजा तोडून काही युवक व पोलिसांनीही सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे स्फोट घडण्यापासून बचावले. मध्यरात्री लागलेली आग विझविताना नागरिकांनी वॉटर टँकर, बादलीने पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रुप घेतल्याने टँकर व पाईपनेही आग विझविण्यात नागरिकांना यश येत नव्हते. तर अग्निशन दलाच्या दोन गाड्या पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र दोन बमखल मधील पाणीही अपुरे पडले. तेव्हा येथील तपासे यांच्या विहिरीवरून अग्निशमन गाडीत पाणी भरून तब्बल सहा तासाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.