शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

कापड दुकानाला भीषण आग, लाखोंचा माल जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2022 10:56 IST

जटपुरा गेट परिसरातील घटना; सतर्कतेने मोठा धोका टळला

चंद्रपूर : शहरातील अत्यंत वर्दळीच्या जटपुरा गेट परिसरात असलेल्या एमफोरयू कापड दुकानाला भीषण आग लागल्याने लाखोंचा माल खाक झाला. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. आग लागताच अग्निशमन पथक अवघ्या काही वेळातच घटनास्थळावर पोहोचून नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत लाखोंचा माल खाक झाल्याची माहिती आहे.

चंद्रपुरातील जटपुरा गेट परिसरातील वसंत भवनाच्या चाळीत बरीच दुकाने आहेत. या मार्गावरील दुकानांतही प्रचंड गर्दी असते. वाहनांनी गजबजलेल्या वसंत भवनाच्या चाळीत एमफोरयू नावाचे कापड काही वर्षांपासून सुरू आहे. या कापड दुकानाला गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे मोठी तारांबळ उडाली. नागरिकांची गर्दी उसळल्याने वाहतुकीचाही खाेळंबा निर्माण झाला. आग लागताच लगेच महानगर पालिकेच्या अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले. पथक अवघ्या काही वेळात घटनास्थळावर पोहोचले. पाण्याचा मारा करून आग विझविण्यास यश मिळविले. मात्र, तोपर्यंत आगीत दुकानातील लाखो रुपयांचे कपडे जळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्किटमध्ये लागल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी पोलिसांनी पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.

आगीच्या घटनांची मालिका

चंद्रपुरातील वर्दळीच्या दुकानात व हॉटेलात आग लागण्याच्या घटना सतत घडत आहेत. वर्षभरापूर्वी याच मार्गावरील एका कापड दुकानाला आग लागली होती. या घटनेतही मोठे नुकसान झाले; परंतु आगीचे नेमके कारण पोलिसातून पुढे आले नव्हते. लोकमान्य टिळक शाळेजवळील मद्रास कॅपेलाही काही महिन्यांपूर्वी आग लागली होती. अशा घटना वारंवार घडत असल्याने आस्थापनांकडून दुकानांची इलेक्ट्रिक तपासणी होते की नाही अथवा आगीमागे विम्यासारखे कारणे आहेत, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

वसंत भवनचे फायर ॲाडिट केव्हा?

वसंत भवन हे जिल्हा परिषदच्या मालकीचे आहे. या इमारतीच्या दुकान चाळीचे भाडे आजच्या बाजारभाड्याच्या तुलनेत अत्यल्प आहे. त्यामुळे इमारतीतून मिळणारा तुटपुंजा उत्पन्न आणि डागडुजीचा खर्च अधिक अशी स्थिती आहे. अल्पभाड्याने वर्षानुवर्षे दुकाने सुरू असलेल्या या चाळीत आग लागल्याने जिल्हा परिषदचे नुकसान झाले. ही भरपाई करण्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न विचारला जात आहे. वसंत भवनचे फायर ऑडिट करा, ही मागणी माजी जि. प. सदस्य संजय गजपुरे यांनी यापूर्वी अनेकदा केली होती. आगीच्या घटनेनंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :fireआगchandrapur-acचंद्रपूर