शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कापड दुकानाला भीषण आग, लाखोंचा माल जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2022 10:56 IST

जटपुरा गेट परिसरातील घटना; सतर्कतेने मोठा धोका टळला

चंद्रपूर : शहरातील अत्यंत वर्दळीच्या जटपुरा गेट परिसरात असलेल्या एमफोरयू कापड दुकानाला भीषण आग लागल्याने लाखोंचा माल खाक झाला. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. आग लागताच अग्निशमन पथक अवघ्या काही वेळातच घटनास्थळावर पोहोचून नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत लाखोंचा माल खाक झाल्याची माहिती आहे.

चंद्रपुरातील जटपुरा गेट परिसरातील वसंत भवनाच्या चाळीत बरीच दुकाने आहेत. या मार्गावरील दुकानांतही प्रचंड गर्दी असते. वाहनांनी गजबजलेल्या वसंत भवनाच्या चाळीत एमफोरयू नावाचे कापड काही वर्षांपासून सुरू आहे. या कापड दुकानाला गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे मोठी तारांबळ उडाली. नागरिकांची गर्दी उसळल्याने वाहतुकीचाही खाेळंबा निर्माण झाला. आग लागताच लगेच महानगर पालिकेच्या अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले. पथक अवघ्या काही वेळात घटनास्थळावर पोहोचले. पाण्याचा मारा करून आग विझविण्यास यश मिळविले. मात्र, तोपर्यंत आगीत दुकानातील लाखो रुपयांचे कपडे जळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्किटमध्ये लागल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी पोलिसांनी पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.

आगीच्या घटनांची मालिका

चंद्रपुरातील वर्दळीच्या दुकानात व हॉटेलात आग लागण्याच्या घटना सतत घडत आहेत. वर्षभरापूर्वी याच मार्गावरील एका कापड दुकानाला आग लागली होती. या घटनेतही मोठे नुकसान झाले; परंतु आगीचे नेमके कारण पोलिसातून पुढे आले नव्हते. लोकमान्य टिळक शाळेजवळील मद्रास कॅपेलाही काही महिन्यांपूर्वी आग लागली होती. अशा घटना वारंवार घडत असल्याने आस्थापनांकडून दुकानांची इलेक्ट्रिक तपासणी होते की नाही अथवा आगीमागे विम्यासारखे कारणे आहेत, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

वसंत भवनचे फायर ॲाडिट केव्हा?

वसंत भवन हे जिल्हा परिषदच्या मालकीचे आहे. या इमारतीच्या दुकान चाळीचे भाडे आजच्या बाजारभाड्याच्या तुलनेत अत्यल्प आहे. त्यामुळे इमारतीतून मिळणारा तुटपुंजा उत्पन्न आणि डागडुजीचा खर्च अधिक अशी स्थिती आहे. अल्पभाड्याने वर्षानुवर्षे दुकाने सुरू असलेल्या या चाळीत आग लागल्याने जिल्हा परिषदचे नुकसान झाले. ही भरपाई करण्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न विचारला जात आहे. वसंत भवनचे फायर ऑडिट करा, ही मागणी माजी जि. प. सदस्य संजय गजपुरे यांनी यापूर्वी अनेकदा केली होती. आगीच्या घटनेनंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :fireआगchandrapur-acचंद्रपूर