शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

मशीन सेटिंगच्या भीतीने उमेदवारांत धास्ती

By admin | Updated: October 24, 2015 00:34 IST

लोकशाहीच्या आधारे भारतात सर्व समुदायाची जनता एकसंघ राहत आहे. ही सर्व किमया भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारामुळेच शक्य झाली आहे

अनेक तक्रारी : ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरच निवडणूक घेण्याची मागणीखडसंगी : लोकशाहीच्या आधारे भारतात सर्व समुदायाची जनता एकसंघ राहत आहे. ही सर्व किमया भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारामुळेच शक्य झाली आहे. भारतीय लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असून जनतेच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने प्रधानमंत्र्यापासून, मुख्यमंत्री तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकाऱ्यांची जनतेद्वारे निवड केली जाते. २००७ पासून ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करण्यात येत आहे. मात्र इव्हीएम मशीन सेट केल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी होत आहेत.याच पार्श्वभूमीवर, चिमूर नगरपरिषदमध्ये १ नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानामध्ये ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरद्वारे नगर परिषदेची निवडणूक घेण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन चिमूर तालुका काँग्रेस कमिटी तथा नगर परिषदेतील उमेदवारांनी निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले असल्याने हा विषय पुन्हा चर्चेचा ठरला आहे. दरम्यान, येत्या नगर पालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीन नको या मागणीसाठी माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर, माजी जि.प. अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, इव्हीएम मशीनच लोकशाहीस मारक ठरत असल्याची बाब चिमूर तालुका काँग्रेस कमिटी व नगर परिषद उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत मांडली आहे. त्याची प्रशासनाने दखल घ्यावी. या ईव्हीएममध्ये सेटिंग करण्यात येऊन चुकीच्या प्रतिनिधीची निवड होत असल्याच्या तक्रारी प्रात्यक्षिकासह निवडणूक आयोगाला अनेक राजकीय पक्षांनी यापूर्वी सादर केल्याची बाबही निवेदनातून मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या ईव्हीएम मशीनचा वापर करून निवडणूक प्रक्रिया पार पडली व बोगस मतदान झाले तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पत्रकार परिषदेला राजू देवतळे, धनराज मालके, प्रकाश बोकारे, राजू हिंगणकर, गिरीश भोपे, सुधीर पंदीलवार, राजू शर्मा, अवी अगडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)