शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

मशीन सेटिंगच्या भीतीने उमेदवारांत धास्ती

By admin | Updated: October 24, 2015 00:34 IST

लोकशाहीच्या आधारे भारतात सर्व समुदायाची जनता एकसंघ राहत आहे. ही सर्व किमया भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारामुळेच शक्य झाली आहे

अनेक तक्रारी : ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरच निवडणूक घेण्याची मागणीखडसंगी : लोकशाहीच्या आधारे भारतात सर्व समुदायाची जनता एकसंघ राहत आहे. ही सर्व किमया भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारामुळेच शक्य झाली आहे. भारतीय लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असून जनतेच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने प्रधानमंत्र्यापासून, मुख्यमंत्री तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकाऱ्यांची जनतेद्वारे निवड केली जाते. २००७ पासून ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करण्यात येत आहे. मात्र इव्हीएम मशीन सेट केल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी होत आहेत.याच पार्श्वभूमीवर, चिमूर नगरपरिषदमध्ये १ नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानामध्ये ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरद्वारे नगर परिषदेची निवडणूक घेण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन चिमूर तालुका काँग्रेस कमिटी तथा नगर परिषदेतील उमेदवारांनी निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले असल्याने हा विषय पुन्हा चर्चेचा ठरला आहे. दरम्यान, येत्या नगर पालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीन नको या मागणीसाठी माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर, माजी जि.प. अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, इव्हीएम मशीनच लोकशाहीस मारक ठरत असल्याची बाब चिमूर तालुका काँग्रेस कमिटी व नगर परिषद उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत मांडली आहे. त्याची प्रशासनाने दखल घ्यावी. या ईव्हीएममध्ये सेटिंग करण्यात येऊन चुकीच्या प्रतिनिधीची निवड होत असल्याच्या तक्रारी प्रात्यक्षिकासह निवडणूक आयोगाला अनेक राजकीय पक्षांनी यापूर्वी सादर केल्याची बाबही निवेदनातून मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या ईव्हीएम मशीनचा वापर करून निवडणूक प्रक्रिया पार पडली व बोगस मतदान झाले तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पत्रकार परिषदेला राजू देवतळे, धनराज मालके, प्रकाश बोकारे, राजू हिंगणकर, गिरीश भोपे, सुधीर पंदीलवार, राजू शर्मा, अवी अगडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)