शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मशीन सेटिंगच्या भीतीने उमेदवारांत धास्ती

By admin | Updated: October 24, 2015 00:34 IST

लोकशाहीच्या आधारे भारतात सर्व समुदायाची जनता एकसंघ राहत आहे. ही सर्व किमया भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारामुळेच शक्य झाली आहे

अनेक तक्रारी : ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरच निवडणूक घेण्याची मागणीखडसंगी : लोकशाहीच्या आधारे भारतात सर्व समुदायाची जनता एकसंघ राहत आहे. ही सर्व किमया भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारामुळेच शक्य झाली आहे. भारतीय लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असून जनतेच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने प्रधानमंत्र्यापासून, मुख्यमंत्री तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकाऱ्यांची जनतेद्वारे निवड केली जाते. २००७ पासून ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करण्यात येत आहे. मात्र इव्हीएम मशीन सेट केल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी होत आहेत.याच पार्श्वभूमीवर, चिमूर नगरपरिषदमध्ये १ नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानामध्ये ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरद्वारे नगर परिषदेची निवडणूक घेण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन चिमूर तालुका काँग्रेस कमिटी तथा नगर परिषदेतील उमेदवारांनी निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले असल्याने हा विषय पुन्हा चर्चेचा ठरला आहे. दरम्यान, येत्या नगर पालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीन नको या मागणीसाठी माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर, माजी जि.प. अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, इव्हीएम मशीनच लोकशाहीस मारक ठरत असल्याची बाब चिमूर तालुका काँग्रेस कमिटी व नगर परिषद उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत मांडली आहे. त्याची प्रशासनाने दखल घ्यावी. या ईव्हीएममध्ये सेटिंग करण्यात येऊन चुकीच्या प्रतिनिधीची निवड होत असल्याच्या तक्रारी प्रात्यक्षिकासह निवडणूक आयोगाला अनेक राजकीय पक्षांनी यापूर्वी सादर केल्याची बाबही निवेदनातून मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या ईव्हीएम मशीनचा वापर करून निवडणूक प्रक्रिया पार पडली व बोगस मतदान झाले तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पत्रकार परिषदेला राजू देवतळे, धनराज मालके, प्रकाश बोकारे, राजू हिंगणकर, गिरीश भोपे, सुधीर पंदीलवार, राजू शर्मा, अवी अगडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)