शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बापरे ! चंद्रपुरातील धामनपेठ येथे अतिसाराने आठवडाभरात तिघांचा मृत्यू, तिघांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2022 14:46 IST

आरोग्य पथक दाखल : रुग्णांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले

आक्सापूर (चंद्रपूर) : गोंडपिपरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा अंतर्गत धामणपेठ येथे उलटी व हगवण आजाराने आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला. तीन रुग्ण रुग्णालयात भरती असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली. दरम्यान, रुग्णांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यासाठी गावातील अंगणवाडी केंद्रात शिबिर सुरू आहे. बाधितांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

धामणपेठ येथे अतिसाराची लागण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी गावात प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यात बापुजी बुचा धुडसे (६५) रा. धामनपेठ यांचा ४ सप्टेंबरला अतिसाराने मृत्यू झाला. त्यांना ३ सप्टेंबरला दाखल केले होते. त्यानंतर चंद्रपूर येथे रेफर केले असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर गंगाराम कुडीराम मडावी (५५) रा. धामनपेठ यांचा ६ सप्टेंबरला मृत्यू झाला. त्यांना ५ सप्टेंबरला धामनपेठ येथे दाखल केले होते. त्यांचाही मृत्यू चंद्रपूरला रेफर केल्यानंतर चंद्रपूर शासकीय रुग्णालयात झाला.

तर अनुसया तुकराम सरवर (७२) रा. नवेगाव वाघाडे या आपल्या मुलीकडे धामनपेठ येथे आल्या असता त्यांना अतिसाराची लागण झाली. त्यांना मूळगावी नवेगाव वाघाडे येथे नेले असता ६ सप्टेंबरला त्यांचाही मृत्यू झाला. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी आरोग्य चमूला साथरोग नियंत्रणाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. रुग्णांची आरोग्य तपासणी व औषधोपचार गावातील अंगणवाडी केंद्रात सुरू केलेल्या शिबिरात सुरू आहे. ७ सप्टेंबर रोजी बाह्यरुग्ण तपासणीत २१ रुग्ण तर ८ सप्टेंबर रोजी हगवण व उलटीची लक्षणे असलेल्या ११ रुग्णांची आरोग्य तपासणी केल्यानंतर औषधोपचार करण्यात आला.

१२० कुटुंबांना दिले जीवनड्राप

आतापर्यंत १२० कुटुंबांच्या घरी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून जीवनड्रॉप बॉटलचे वाटप केले. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, घरात व परिसरात स्वच्छता ठेवावी, आहारात तिखट व मसालेदार पदार्थ खाणे टाळावे, संतुलित आहार घ्यावा, घाबरून न जाता लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावे. सद्यस्थितीमध्ये प्रारंभिक लक्षणांवरून आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे, असा दावा जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केला आहे.

सध्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे पाच पाणी नमुने, एक ब्लिचिंग पावडर नमुना तसेच आठ रुग्णांचे शौच नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत दैनंदिन गृहभेटी देऊन सर्वेक्षण व जागृती केली जात आहे.

- डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Healthआरोग्यchandrapur-acचंद्रपूर