शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बापरे ! चंद्रपुरातील धामनपेठ येथे अतिसाराने आठवडाभरात तिघांचा मृत्यू, तिघांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2022 14:46 IST

आरोग्य पथक दाखल : रुग्णांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले

आक्सापूर (चंद्रपूर) : गोंडपिपरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा अंतर्गत धामणपेठ येथे उलटी व हगवण आजाराने आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला. तीन रुग्ण रुग्णालयात भरती असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली. दरम्यान, रुग्णांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यासाठी गावातील अंगणवाडी केंद्रात शिबिर सुरू आहे. बाधितांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

धामणपेठ येथे अतिसाराची लागण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी गावात प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यात बापुजी बुचा धुडसे (६५) रा. धामनपेठ यांचा ४ सप्टेंबरला अतिसाराने मृत्यू झाला. त्यांना ३ सप्टेंबरला दाखल केले होते. त्यानंतर चंद्रपूर येथे रेफर केले असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर गंगाराम कुडीराम मडावी (५५) रा. धामनपेठ यांचा ६ सप्टेंबरला मृत्यू झाला. त्यांना ५ सप्टेंबरला धामनपेठ येथे दाखल केले होते. त्यांचाही मृत्यू चंद्रपूरला रेफर केल्यानंतर चंद्रपूर शासकीय रुग्णालयात झाला.

तर अनुसया तुकराम सरवर (७२) रा. नवेगाव वाघाडे या आपल्या मुलीकडे धामनपेठ येथे आल्या असता त्यांना अतिसाराची लागण झाली. त्यांना मूळगावी नवेगाव वाघाडे येथे नेले असता ६ सप्टेंबरला त्यांचाही मृत्यू झाला. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी आरोग्य चमूला साथरोग नियंत्रणाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. रुग्णांची आरोग्य तपासणी व औषधोपचार गावातील अंगणवाडी केंद्रात सुरू केलेल्या शिबिरात सुरू आहे. ७ सप्टेंबर रोजी बाह्यरुग्ण तपासणीत २१ रुग्ण तर ८ सप्टेंबर रोजी हगवण व उलटीची लक्षणे असलेल्या ११ रुग्णांची आरोग्य तपासणी केल्यानंतर औषधोपचार करण्यात आला.

१२० कुटुंबांना दिले जीवनड्राप

आतापर्यंत १२० कुटुंबांच्या घरी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून जीवनड्रॉप बॉटलचे वाटप केले. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, घरात व परिसरात स्वच्छता ठेवावी, आहारात तिखट व मसालेदार पदार्थ खाणे टाळावे, संतुलित आहार घ्यावा, घाबरून न जाता लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावे. सद्यस्थितीमध्ये प्रारंभिक लक्षणांवरून आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे, असा दावा जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केला आहे.

सध्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे पाच पाणी नमुने, एक ब्लिचिंग पावडर नमुना तसेच आठ रुग्णांचे शौच नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत दैनंदिन गृहभेटी देऊन सर्वेक्षण व जागृती केली जात आहे.

- डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Healthआरोग्यchandrapur-acचंद्रपूर