शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

दारूबंदीचे भवितव्य पोलिसांच्या प्रामाणिकतेवर अवलंबून

By admin | Updated: November 8, 2014 01:01 IST

चंद्रपूर जिल्ह्यात एक महिन्याच्या आत दारूबंदी करण्याची घोषणा राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर व बल्लारपूर येथील सत्कार सोहळ्यात केली.

राजुरा: चंद्रपूर जिल्ह्यात एक महिन्याच्या आत दारूबंदी करण्याची घोषणा राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर व बल्लारपूर येथील सत्कार सोहळ्यात केली. त्यांच्या आश्वासनावर जनतेचा विश्वास आहे. दिलेला शब्द ते पाळतात, अशी जनतेत भावना आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील दारूबंदीसाठी संघर्ष करणाऱ्या हजारो महिला व संघर्षात सहभागी न झालेल्या महिला तसेच दारूच्या व्यसनापासून दूर असलेल्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. मात्र तसे झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीचे भवितव्य केवळ पोलिसांच्या प्रामाणिक कर्तव्यावर अवलंबून राहणार आहे. निकोप समाजासाठी दारूबंदी हिताची आहे. दारूबंदी झाली पाहिजे, असा मतप्रवाह आहे. ग्रामपंचायतस्तरावर जेव्हा दारूबंदीचा निर्णय होतो, तेव्हा मात्र काही महिला इच्छा असूनही दडपणाखाली येऊन भाग घेऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. गावात राहणे व दारूवाल्याचा विरोध पत्कारणे बऱ्याच लोकांना महागात पडते. दारू दुकानदार पुरुषांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी अनेक क्लुप्त्या वापरतात. त्याचा त्रास महिलांना होतो. त्यामुळे महिला हतबल होतात. याच संधीचा फायदा दारू दुकानदार घेतात व दारू बंदीसाठी विरोध करतात.दारूमुळे आजवर अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दारूच्या व्यसनामुळे अनेकांचा अकाली मृत्यू झाला. घरातील पुरुष व्यसनी झाला की, घरची मंडळी त्रस्त होते. त्याचा दुष्परिणाम पत्नी व मुलाबाळांवर होतो. पत्नीच्या कष्टातून मिळालेल्या पैशात दारू पिणारेही कमी नाहीत. त्याला विरोध केल्यास प्रसंगी महिलेला शारिरीक त्रास सहन करावा लागतो. यावर आळा घालण्यासाठी दारूबंदी होणे आवश्यक आहे. श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्ष पारोमिता गोस्वामी यांनी दारूबंदीसाठी गेल्या काही वर्षांपासून संघर्ष सुरू केला आहे. चिमूरमार्गे नागपूरपर्यंत हजारो महिलांचा पायी मोर्चा नेवून तत्कालिन शासनकर्त्यांकडे चंद्रपूर जिल्हा दारूबंदी करण्याची मागणी केली. परंतु शासनकर्त्यांनी महसुलाचा विचार करून ही मागणी प्रलंबीत ठेवली. यंदा विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या शब्दावर विश्वास ठेवून भाजपाला साथ दिली आणि भाजपाचे सरकार स्थापित होताच ‘दारूबंदी’चा आवाज निघू लागला. ना. मुनगंटीवार यांनीसुद्धा दिलेल्या वचनाचे पालन करीत एक-दिड महिन्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात येईल व दारूबंदी निश्चित होणार, याची हमी दिली. त्यामुळे सुमारे दहा वर्षांपासून दारूबंदीचा संघर्ष करणाऱ्यांना आता एका महिन्यात निर्णय मिळणार असल्यामुळे ते सुखावले आहेत. दारूबंदी होणार असल्याची बातमी कळताच, महिलाही उत्साहित झाल्यात. आतातरी चांगले दिवस येतील, असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे.आजही जिल्ह्यातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे पोलीस आपले कर्तव्य कशाप्रकारे पार पाडतात त्यावरच दारूबंदीचा निर्णय सार्थकी ठरणार आहे. (तालुका प्रतिनिधी)