शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

विसापुरातील ३१५ कुटुंबातील लोकांचा जीवघेणा संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:01 IST

याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये अक्रोषाचे वातावरण आहे. विसापूर गावातील लोकसंख्या १६ हजारांवर आहे. येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये सर्वाधिक लोकसंख्या रोजंदारी मजुरांची आहे़ अशातच याच वॉर्डातील २६ वर्षांच्या तरूणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला. कोरोनाबाधित तरूणाच्या कुटुंबातील सदस्य व अन्य एक कुटुंबातील सदस्यासह १३ जणांना चंद्रपूर येथे विलगीकरण करण्यासाठी हलविण्यात आले.

ठळक मुद्देपॉझिटिव्ह रूग्ण निघाल्याचा परिणाम : ९० टक्के मजुरांचे हाल

सुभाष भटवलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कविसापूर : जिल्ह्यातील विसापूर गावात २१ मे रोजी एक २६ वर्षाचा तरूण कोरोनाबाधित आला. यामुळे विसापूर येथील वॉर्ड क्रमांक ५ प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले. या क्षेत्रातील ९० टक्के मजूर वर्ग असून दररोज मिळणाऱ्या मिळकतीवर उदरनिर्वाह करतात. या भागात कोरोनाबाधित रूग्ण निघाल्याचा विपरित परिणाम झाला. विसापूर येथील कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्रातील ३१५ कुटुंबातील ११५० लोकांचा जीवघेणा संघर्ष सुरू झाला आहे.याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये अक्रोषाचे वातावरण आहे. विसापूर गावातील लोकसंख्या १६ हजारांवर आहे. येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये सर्वाधिक लोकसंख्या रोजंदारी मजुरांची आहे़ अशातच याच वॉर्डातील २६ वर्षांच्या तरूणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला. कोरोनाबाधित तरूणाच्या कुटुंबातील सदस्य व अन्य एक कुटुंबातील सदस्यासह १३ जणांना चंद्रपूर येथे विलगीकरण करण्यासाठी हलविण्यात आले. यामुळे या भागातील नागरिकांवर उपासमारीचे जबरदस्त संकट ओढवले आहे. सदर प्रतिबंधात्मक क्षेत्रात जीवनाश्यक वस्तु मिळण्याचे नाममात्र दोन दुकाने असून तेदेखील बंद आहेत़ गावात इतर ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्रातील नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. परिणामी ३१५ कुटुंबातील ११५० सदस्यांना जीवघेण्या संघर्षाला तोंड देण्याची वेळ कोरोना संकटामुळे ओढवली आहे ़ लॉकडाऊनच्या तीन टप्प्यात काहिसा मोकळा श्वास घेणाºया नागरिकांना चवथ्या टप्प्यातील टाळेबंदीच्या काळात मोठा त्रासाला सामोरे जावे लागत आहे ़विसापूर येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये कोरोनाबाधित रूग्ण आल्याने व या क्षेत्रातील अंतर्गत रस्ते व सीमाबंदी केल्यामुळे येथील ९० टक्के रोजंदारी मजुरांची जीवन जगण्यासाठी घालमेल सुरू झाली आहे.कोरोना संकटापेक्षा उपासमारीने नागरिकांचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक पातळीवर प्रशासन आजघडीला कोरोना संकट हाताळण्यावर भर देत असले तरी प्रतिबंधात्मक क्षेत्रातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी उपाय योजना करण्याची गरज आहे़ भयभीत नागरिकांना उदरनिर्वाहासाठी साधन सामग्री उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी विसापूर येथील कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्रातील नागरिकांनी केली आहे 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या