शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाचव्या दिवशीही उपोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:50 IST

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आदिवासी बांधवांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देविविध संघटनांचा पाठिंबा : मागण्या पूर्ण करा; अन्यथा आंदोलन तीव्र

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आदिवासी बांधवांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशीही प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.चंद्रपूर जिल्ह्याला आदिवासी गोंड साम्राज्याचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पंधराशे ते सोळाशे वर्षांची वैभवशाली परंपरा या चंद्रपूर नगरीला असतानासुद्धा आदिवासींच्या इतिहासाकडे मुद्दाम डोळेझाक करून इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे. आदिवासी समाजातर्फे विविध मागण्यांसाठी जटपुरा गेट येथे १० मार्चला धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते. त्याचबरोबर गेल्या दोन वर्षांपासून याच मागण्यांसाठी विविध मोर्चे काढून प्रशासनाला निवेदने दिली आहेत. असे असतानाही अजूनपर्यंत शासन, प्रशासन आदिवासी बांधवांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे आदिवासी नगरीतच आदिवासी बांधवांना नतमस्तक होऊन बेमुदत उपोषण करण्याची वेळ आली आहे.चंद्रपुरातील जटपूरा गेटच्या आतील बाजूस राजे बल्लारशहा यांचा भव्य पुतळा बसवण्यात यावा. चंद्रपूर शहरातील चौकान्ाां महाराणी हिराई, राणी दुर्गावती, राजे खांडक्या बल्लाळशाह, भगवान बिरसा मुंडा, शहीद विर बाबूराव शेडमाके यांची नावे देण्यात यावी, आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण शुल्क व शिष्यवृत्ती हीे चालू शैक्षणिक सत्र संपत आले तरीही विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही, ती रक्कम तत्काळ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी. येथील जिल्हा कारागृह परिसरात असलेल्या झाडाला अटकवून बाबूराव शेडमाके यांना फासावर चढवले होते, त्या जागेत शहीद स्मारक उभारून सौंदर्यीकरण करण्यात यावे आदी मागण्या उपोषणकर्त्यांच्या आहेत. अशोक तुमराम, राजेंद्र धुर्वे, विनोद तोडराम, हरीश उइके, अमर निचत, जितेश कुळमेथे हे उपोषणाला बसले आहेत. जिल्ह्यातील आदिवासी बांधव वारलु मेश्राम, युवराज मेश्राम, जमुना तुमराम, वंदना मेश्राम, संदीप परचाके, बाळू कुळमेथे, कमलेश आत्राम, सतीश सोनटक्के, जयपाल गेडाम, गणेश इचनकर, वैशाली मेश्राम यांनी उपोषणमंडपाला भेट देऊन पाठिंबा दिला आहे.जिल्ह्यातून बऱ्याच आदिवासी बांधव या बेमुदत आमरण उपोषणाला दररोज भेटी देत आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या शासन, प्रशासन पूर्ण करणार नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, अशी निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे. आदिवासी नगरीतील आदिवासींवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी आहे.आज मोर्चामंगळवारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी आदिवासी बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघेणार आहे. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश माने, दशरथ मडावी व राजू झोडे, शिवसेनेचे किशोर जोरगेवार यांनी उपोषणमंडपाला भेट देऊन मोर्चाला पाठिंबा दर्शविला आहे.