शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

आर्थिक कोंडी असताना शेतकऱ्यांना मजुरांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:01 IST

वाढीव भावाने बियाणे व खते घेताना बँकेचे व सावकाराच्या कर्जाचा बोजा शेतकºयांना सोसावा लागत आहे. त्यातच मजुरांची मजुरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतकरी डवरणी, फवारणी निंदा काढणे, पिकांची कापणी व मळणी करणे, रोवणी करणे, बाजारापर्यंत माल विक्री करताना त्याचा मजुरांची नितांत गरज पडते. पुरुष व स्त्री मजूर गावात मिळेनासे झाल्याने त्याला इतर गावातून मजूर आणण्यासाठी वाहनाचा खर्चही भरावा लागतो.

ठळक मुद्देशेतीचा हंगाम : ऐन पेरणीच्या वेळी पैशाची चणचण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊन तसेच दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्या तुलनेत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे सध्या शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यातच आता पावसाळी सुरू झाल्यामुळे पेरणीची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, मजुरांना मजुरी देताना शेतकऱ्यांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.यावर्षी बियाणे, खते, कीटकनाशकाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धानाचे बियाण्याचे भाव हजारोंच्या घरात आहे. धान तसेच कपाशीच्या अनेक प्रकारच्या प्रजाती पाहून शेतकरी सुद्धा भांबावले आहेत. याही परिस्थितीत वाढीव भावाने बियाण व खते घेऊन शेतकरी आपली शेती करण्यास पुढे आला आहे.वाढीव भावाने बियाणे व खते घेताना बँकेचे व सावकाराच्या कर्जाचा बोजा शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. त्यातच मजुरांची मजुरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतकरी डवरणी, फवारणी निंदा काढणे, पिकांची कापणी व मळणी करणे, रोवणी करणे, बाजारापर्यंत माल विक्री करताना त्याचा मजुरांची नितांत गरज पडते. पुरुष व स्त्री मजूर गावात मिळेनासे झाल्याने त्याला इतर गावातून मजूर आणण्यासाठी वाहनाचा खर्चही भरावा लागतो. मजुरी वाढ व बियाणे, खते, औषधे यांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढत मात्र शेतकऱ्यांच्या मालाला शासन व व्यापारी योग्य भाव देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. सध्या पेरणीचा हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांनी मजुरांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. मात्र पिकविलेला मालच विकला नसल्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे.अनेकांनी धरला शेतीचा मार्गकाही दिवसापूर्वी शेतीला मोठे महत्त्व होते. मात्र मध्यंतरी नोकरीला महत्त्व आले. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला आणि बहुतांश तरुणांनी गावाचा रस्ता धरला. त्यामुळे सध्या शेतीला पूर्वीसारखेच महत्त्व प्राप्त होत आहे. मात्र पिकविलेल्या मालाला योग्य भाव तसेच बाजारपेठ उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मागील काही वर्षांपासून शेती करणे कठीण झाले आहे. पिकविलेल्या मालाला योग्य भाग मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा ताण पडत आहे. त्यातच आता लॉकडाऊमुळे सर्वांचेच नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने मदत करणे गरजेचे आहे.- संभाशिव जुनगरी,शेतकरी, गोवरी

टॅग्स :Farmerशेतकरी