शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी रोवण्या खोळंबल्याने शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST

तालुक्याचे एकूण लागवड क्षेत्र ४६ हजार ३९४. ९८ हेक्टर आहे. यापैकी २६ हजार २९९. १४ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते. यात धानाचे पीक सर्वाधिक २२ हजार ७८८ हेक्टर,कापूस एक हजार ३२४ हेक्टर, सोयाबीन ६.९० हेक्टर, भाजीपाला ५१.४० हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली आहे. यावर्षी आतापर्यंत ३८२. ६ मिमि पाऊस पडला. त्यामुळे सिंचन व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांना पावसाची वाट बघावी लागत आहे.

ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षा : ३८२. ६ मिमी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यात रोवणी करण्यासाठी पुरेसे पाऊस न पडल्याने शेकडो शेतकऱ्यांची कामे ठप्प झाली आहेत. दमदार पाऊस पडला नाही तर रोवण्या पूर्ण होण्यास विलंब लागणार आहे.तालुक्याचे एकूण लागवड क्षेत्र ४६ हजार ३९४. ९८ हेक्टर आहे. यापैकी २६ हजार २९९. १४ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते. यात धानाचे पीक सर्वाधिक २२ हजार ७८८ हेक्टर,कापूस एक हजार ३२४ हेक्टर, सोयाबीन ६.९० हेक्टर, भाजीपाला ५१.४० हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली आहे. यावर्षी आतापर्यंत ३८२. ६ मिमि पाऊस पडला. त्यामुळे सिंचन व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांना पावसाची वाट बघावी लागत आहे. यावर्षी कापूस लागवडीत वाढ झाली. कापूस व सोयाबीन पीक सध्या चांगले आहे. भाजीपाला लागवडीकडे शेतकºयांचा कल वाढला. भाजीपाला हे नगदी पीक असल्याने शेतकरी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात लागवड करीत आहेत. यंदा समाधानकारक पाऊस आल्यास भात पिकासह कापूस, सोयाबीन, भाजीपाल्याचे उत्पादन चांगले होण्याची आशा आहे. मात्र, सध्या तरी शेतकरी चिंतेत आहेत.पावसाला सुरुवात झाली. मात्र, रोवणीसाठी पुरेसे पाऊस आला नाही. निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी रोवणीला सुरूवात केली नाही. कृषिपंप व सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी रोवणी करीत आहेत. कृषी पथक शेतकऱ्यांच्या बांध्यावर जावून पाहणी करीत आहे. पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव नये, यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.- प्रशांत कचराळे, तालुका कृषी अधिकारी, मूल

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती