शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
3
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
4
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
5
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
6
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
7
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
8
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
9
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
10
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
11
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
12
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
13
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
14
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
15
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
16
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
17
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
18
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
19
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
20
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी

शेतकऱ्यांना चिंतामुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 06:00 IST

ज्या भागांमध्ये ज्या ज्या पिकाचे उत्पादन होते, त्या विभागांमध्ये क्लस्टर तयार करण्यात येऊन शेतमालावर आधारित प्रक्रिया करणारे उद्योग येत्या काही दिवसात उभे राहणार असल्याचे ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी नैसर्गिकरित्या जळालेल्या घरांना शासनाकडून निधी उपलब्ध होत नव्हता. यानंतर जळालेल्या घरमालकांना शासकीय निधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार । चंद्रपूर व ब्रह्मपुरीत पालकमंत्र्यांचा नागरी सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर/ब्रह्मपुरी : १७ जानेवारीला नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ झाल्याचे पत्र मंत्रालयातून जिल्हाधिकाºयांकडे आले असल्याचे सांगून माझ्या मागणीनुसारच शेतकऱ्यांना धानाला २५०० रुपये भाव व ७०० रुपये बोनस मिळाला आहे. दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना सन्मान दिला आहे. शेतकऱ्यांना चिंतामुक्त केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.विजय वडेट्टीवार हे मंत्री झाल्यानंतर प्रथमच चंद्रपूर व ब्रह्मपुरी येथे आले. यावेळी त्यांचे दोन्ही ठिकाणी जंगी स्वागत करून नागरी सत्कार करण्यात आला.चंद्रपूर येथील कार्यक्रम गांधी चौकात घेण्यात आला. तत्पूर्वी शहरात रॅली काढण्यात आली. यावेळी खा. बाळूभाऊ धानोरकर, आ. सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार, शहर अध्यक्ष नंदू नगरकर, प्रदेश सचिव प्रकाश देवतळे, माजी अध्यक्ष सुभाषसिंह गौर, माजी आमदार देवराव भांडेकर, सुनिता लोढिया, जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेता सतीश वरजुरकर, राजुऱ्याचे नगराध्यक्ष अरुण धोटे, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर आदी उपस्थित होते.ब्रह्मपुरी येथील कार्यक्रम पंचशील वसतिगृहाच्या प्रांगणात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी प्रवक्ते अतुल लोंढे, प्रमुख अतिथी म्हणून आमदार सहसराम कोरेट्टी, गुडू अवस्थी, प्रकाश देवतळे, नगराध्यक्षा रिता उराडे, उपाध्यक्ष अशोक रामटेके, गोविंद भेंडारकर, देविदास जगनाडे आदी उपस्थित होते.शेतमालावर आधारित उद्योग आणणारज्या भागांमध्ये ज्या ज्या पिकाचे उत्पादन होते, त्या विभागांमध्ये क्लस्टर तयार करण्यात येऊन शेतमालावर आधारित प्रक्रिया करणारे उद्योग येत्या काही दिवसात उभे राहणार असल्याचे ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी नैसर्गिकरित्या जळालेल्या घरांना शासनाकडून निधी उपलब्ध होत नव्हता. यानंतर जळालेल्या घरमालकांना शासकीय निधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. बारामतीच्या धर्तीवर कृषीशी संबंधित शिक्षणाच्या सोयीसाठी कृषी विज्ञान केंद्र उभारण्याचा आपला मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार