शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

शेतकऱ्यांना चिंतामुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 06:00 IST

ज्या भागांमध्ये ज्या ज्या पिकाचे उत्पादन होते, त्या विभागांमध्ये क्लस्टर तयार करण्यात येऊन शेतमालावर आधारित प्रक्रिया करणारे उद्योग येत्या काही दिवसात उभे राहणार असल्याचे ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी नैसर्गिकरित्या जळालेल्या घरांना शासनाकडून निधी उपलब्ध होत नव्हता. यानंतर जळालेल्या घरमालकांना शासकीय निधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार । चंद्रपूर व ब्रह्मपुरीत पालकमंत्र्यांचा नागरी सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर/ब्रह्मपुरी : १७ जानेवारीला नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ झाल्याचे पत्र मंत्रालयातून जिल्हाधिकाºयांकडे आले असल्याचे सांगून माझ्या मागणीनुसारच शेतकऱ्यांना धानाला २५०० रुपये भाव व ७०० रुपये बोनस मिळाला आहे. दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना सन्मान दिला आहे. शेतकऱ्यांना चिंतामुक्त केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.विजय वडेट्टीवार हे मंत्री झाल्यानंतर प्रथमच चंद्रपूर व ब्रह्मपुरी येथे आले. यावेळी त्यांचे दोन्ही ठिकाणी जंगी स्वागत करून नागरी सत्कार करण्यात आला.चंद्रपूर येथील कार्यक्रम गांधी चौकात घेण्यात आला. तत्पूर्वी शहरात रॅली काढण्यात आली. यावेळी खा. बाळूभाऊ धानोरकर, आ. सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार, शहर अध्यक्ष नंदू नगरकर, प्रदेश सचिव प्रकाश देवतळे, माजी अध्यक्ष सुभाषसिंह गौर, माजी आमदार देवराव भांडेकर, सुनिता लोढिया, जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेता सतीश वरजुरकर, राजुऱ्याचे नगराध्यक्ष अरुण धोटे, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर आदी उपस्थित होते.ब्रह्मपुरी येथील कार्यक्रम पंचशील वसतिगृहाच्या प्रांगणात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी प्रवक्ते अतुल लोंढे, प्रमुख अतिथी म्हणून आमदार सहसराम कोरेट्टी, गुडू अवस्थी, प्रकाश देवतळे, नगराध्यक्षा रिता उराडे, उपाध्यक्ष अशोक रामटेके, गोविंद भेंडारकर, देविदास जगनाडे आदी उपस्थित होते.शेतमालावर आधारित उद्योग आणणारज्या भागांमध्ये ज्या ज्या पिकाचे उत्पादन होते, त्या विभागांमध्ये क्लस्टर तयार करण्यात येऊन शेतमालावर आधारित प्रक्रिया करणारे उद्योग येत्या काही दिवसात उभे राहणार असल्याचे ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी नैसर्गिकरित्या जळालेल्या घरांना शासनाकडून निधी उपलब्ध होत नव्हता. यानंतर जळालेल्या घरमालकांना शासकीय निधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. बारामतीच्या धर्तीवर कृषीशी संबंधित शिक्षणाच्या सोयीसाठी कृषी विज्ञान केंद्र उभारण्याचा आपला मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार