शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने शेतकरी वैतागले

By admin | Updated: October 18, 2015 01:01 IST

वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या कमी वीज दाबाच्या पुरवठ्याने शेतातील मोटारपंप सुरू होत नाहीत.

शेतातील मोटारपंप झाले निकामी : रबी हंगामही धोक्यात येण्याची शक्यतागोवरी : वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या कमी वीज दाबाच्या पुरवठ्याने शेतातील मोटारपंप सुरू होत नाहीत. अनेकदा वीज पुरवठा खंडीत होत असल्याने मोटारपंप सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात चकरा माराव्या लागत आहे. खंडीत वीज पुरवठा व सातत्याने होणाऱ्या विजेच्या लपंडावाने शेतकऱ्यांचा रब्बी हंगामही धोक्यात आला आहे.राजुरा तालुक्यातील राजुरा वीज वितरण विभागांतर्गत गोवरी परिसरातील अनेक गावांतील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. सध्या रब्बी हंगामाला शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. दुरूस्तीच्या नावाखाली वीज वितरण कंपनी जनतेवर भारनियमनाचा बडगा उगारत आहे. या अघोषित भारनियमनाने नागरिक चांगलेच वैतागले आहेत. गोवरी, पोवनी, चिंचोली, माथरा, अंतरगाव, गोयेगाव, साखरी, वरोडा परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. सध्या शेतातील पिकांना मोटारपंपाच्या साहाय्याने पाणी द्यायला शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. मात्र वीज वितरण कंपनीच्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने घरगुती बल्बही सुरू होत नाहीत. एवढ्या कमी प्रमाणात वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे घरातील विजेची उपकरण शोभेची वस्तू झाली आहे. वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने लाख रुपये खर्च करून शेतात लावलेले मोटारपंप जळण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. विजेचा कमी प्रमाणात वापर होत असतानाही वीज वितरण कंपनीकडून क्षमतेपेक्षा जास्त वीज बिल पाठविले जाते. एकीकडे वीज नसल्याने नागरिक त्रस्त आहे तर दुसरीकडे जादा वीज बिलाचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे.शेतपिकांना सध्या सिंचनाची आवश्यकता आहे. दिवस-रात्रं कष्ट करून फुलविलेली पिके पाण्याअभावी सुकायला लागली आहेत. शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी शेतात जातात. मात्र कमी वीज दाबाच्या पुरवठ्याने शेतातील मोटारपंप सुरू होत नाही. वीज पुरवठा कधीही बंद करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना शेतात हेलपाटे मारावे लागत आहेत. शेतकरी वीज येण्याची आतूरतेने वाट पाहतात. मात्र वीज येत नाही. त्यामुळे शेतकरी चांगलेच वैतागले आहेत. याकडे वीज वितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)वीज वितरण कंपनीकडून कमी वीज दाबाचा पुरवठा करण्यात येत असल्याने शेतातील मोटारपंप सुरू होत नाही. परिणामी शेतातील पीक पाण्याअभावी सुकायला लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा रबी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता आहे.- भास्कर जुनघरी, शेतकरी, गोवरीविरूर (स्टेशन) येथील वीज उपकेंद्रातून ३३ के.व्ही. चा वीज पुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र त्यापेक्षा कमी वीज पुरवठा होत असल्याने कमी वीज दाबाची समस्या निर्माण झाली आहे.- श्रीनिवास बडगू, सहायक अभियंता (ग्रामीण), राजुरा