शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने शेतकरी वैतागले

By admin | Updated: October 18, 2015 01:01 IST

वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या कमी वीज दाबाच्या पुरवठ्याने शेतातील मोटारपंप सुरू होत नाहीत.

शेतातील मोटारपंप झाले निकामी : रबी हंगामही धोक्यात येण्याची शक्यतागोवरी : वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या कमी वीज दाबाच्या पुरवठ्याने शेतातील मोटारपंप सुरू होत नाहीत. अनेकदा वीज पुरवठा खंडीत होत असल्याने मोटारपंप सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात चकरा माराव्या लागत आहे. खंडीत वीज पुरवठा व सातत्याने होणाऱ्या विजेच्या लपंडावाने शेतकऱ्यांचा रब्बी हंगामही धोक्यात आला आहे.राजुरा तालुक्यातील राजुरा वीज वितरण विभागांतर्गत गोवरी परिसरातील अनेक गावांतील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. सध्या रब्बी हंगामाला शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. दुरूस्तीच्या नावाखाली वीज वितरण कंपनी जनतेवर भारनियमनाचा बडगा उगारत आहे. या अघोषित भारनियमनाने नागरिक चांगलेच वैतागले आहेत. गोवरी, पोवनी, चिंचोली, माथरा, अंतरगाव, गोयेगाव, साखरी, वरोडा परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. सध्या शेतातील पिकांना मोटारपंपाच्या साहाय्याने पाणी द्यायला शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. मात्र वीज वितरण कंपनीच्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने घरगुती बल्बही सुरू होत नाहीत. एवढ्या कमी प्रमाणात वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे घरातील विजेची उपकरण शोभेची वस्तू झाली आहे. वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने लाख रुपये खर्च करून शेतात लावलेले मोटारपंप जळण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. विजेचा कमी प्रमाणात वापर होत असतानाही वीज वितरण कंपनीकडून क्षमतेपेक्षा जास्त वीज बिल पाठविले जाते. एकीकडे वीज नसल्याने नागरिक त्रस्त आहे तर दुसरीकडे जादा वीज बिलाचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे.शेतपिकांना सध्या सिंचनाची आवश्यकता आहे. दिवस-रात्रं कष्ट करून फुलविलेली पिके पाण्याअभावी सुकायला लागली आहेत. शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी शेतात जातात. मात्र कमी वीज दाबाच्या पुरवठ्याने शेतातील मोटारपंप सुरू होत नाही. वीज पुरवठा कधीही बंद करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना शेतात हेलपाटे मारावे लागत आहेत. शेतकरी वीज येण्याची आतूरतेने वाट पाहतात. मात्र वीज येत नाही. त्यामुळे शेतकरी चांगलेच वैतागले आहेत. याकडे वीज वितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)वीज वितरण कंपनीकडून कमी वीज दाबाचा पुरवठा करण्यात येत असल्याने शेतातील मोटारपंप सुरू होत नाही. परिणामी शेतातील पीक पाण्याअभावी सुकायला लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा रबी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता आहे.- भास्कर जुनघरी, शेतकरी, गोवरीविरूर (स्टेशन) येथील वीज उपकेंद्रातून ३३ के.व्ही. चा वीज पुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र त्यापेक्षा कमी वीज पुरवठा होत असल्याने कमी वीज दाबाची समस्या निर्माण झाली आहे.- श्रीनिवास बडगू, सहायक अभियंता (ग्रामीण), राजुरा