शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

सिंचनाची सोय नसल्याने शेतकरी संकटात - सतीश वारजूकर

By admin | Updated: March 19, 2016 00:48 IST

गोसेखुर्द धरणाचे मोखाबडी उपसा कालव्याद्वारे पाणी चिमूर तालुक्यात मिळावे म्हणून चार-पाच वर्षापूर्वी कॅनल तयार केले.

भिसी : गोसेखुर्द धरणाचे मोखाबडी उपसा कालव्याद्वारे पाणी चिमूर तालुक्यात मिळावे म्हणून चार-पाच वर्षापूर्वी कॅनल तयार केले. परंतु आजही कॅनल त्याच अवस्थेत आहेत. पाणीही आले नाही. कालव्याचे काम पूर्ण झाले नाही. यासाठी जबाबदार व्यक्तीवर कारवाई झालीच पाहिजे. परंतु चिमूर तालुक्यात शेती सिंचनाची सोय नसल्याने नेहमी शेतकऱ्यांवर संकट येऊन त्यांचे जीवनमान ढासळत आहे. त्यासाठी त्यांना आधार देणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश वारजूकर यांनी केले.सांस्कृतिक भवन भिसी येथे भिसीतील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिमूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष माधव बिरजे होते. उद्घाटक डॉ. अविनाश वारजूकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर प्रा. राम राऊत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय डोंगरे, काँग्रेस ज्येष्ठ नेते पंजाबराव गावंडे, घनश्याम डुकरे, दिनेश गावंडे, प्रफुल्ल खापर्डे, ओमजी खैरे, शेषराव भुरके, कादरबाबू शेख, अ‍ॅड. अरुण दुधनकर, कदीर शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी तुषार सूर्यवंशी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर डॉ. अविनाश वारजूकर व डॉ. सतीश वारजूकर यांच्या हस्ते विविध कामांचे लोकार्पण झाले. तसेच प्रस्तावित कामांचे भूमीपूजन करण्यात आले. याप्रसंगी कादरबाबू शेख, प्रा. राम राऊत, संजय डोंगरे, डॉ. अविनाश वारजूकर यांची भाषणे झालीत. (वार्ताहर)