शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
3
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
4
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
5
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
6
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
7
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
8
इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
9
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
10
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
11
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
12
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
13
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
14
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
15
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
16
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
17
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
18
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
19
Iran Israel War: इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
20
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले

शेतकऱ्यांचा तालुका कृषी कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST

यंदा जिल्ह्याला हरभरा पिकाच्या प्रमाणित बियाणासाठी २ हजार ६२२ क्विंटल उद्दिष्टे ठेवण्यात आले. मात्र शेतकऱ्यांना हरभरा उपलब्ध होत नसल्याने तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रमाणित हरभरा बियाणे तातडीने देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. दहा-बारा दिवसाचा कालावधी लोटल्यास उत्पन्नावर अनिष्ट परिणाम होण्याचा धोका आहे.

ठळक मुद्देरब्बी हंगाम खोळंबणार : शेतकऱ्यांना हरभरा बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात प्रमाणित बियाने हरभरा बियाणे उपलब्ध न झाल्याने शेतकºयांनी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी बारा वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. हरभरा बियाणे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने कृषी विभागाची तारांबळ उडाली होती.चिमूर तालुक्यात नेरी, मासळ खडसंगी, भिसी, शंकरपूर परिसर खरीप हंगामातील धान, कापूस, सोयाबीन आणि रब्बी पिकासांठी हरभरा,गहू पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. शेतकऱ्यांचा खरिप हंगाम संपण्याच्या मार्गावर आला आहे त्यामुळे शेतकरी रब्बी पिकाच्या पेरणीसाठी तयारीला लागला आहे यावर्षी जिल्ह्यासह चिमूर तालुक्यात पडलेल्या पावसामुळे ओला दुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले. शेतकरी अनुदान तत्वावर हरभरा बियाणे मिळण्याकरिता कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. मात्र हंगाम सुरू होऊनही बियाणे न मिळाल्याने शेतकरी त्रस्त झाले. जि. प. सदस्य बुटके यांच्या नेतृत्वामध्ये कृषी अधिकारी ठिय्या आंदोलन केले. यावेळी सुनील दाभेकर, प्रमोद दांडेकर, विवेक रामटेके, वडशी, विनोद मेश्राम, प्रकाश कुमरे, दिगंबर कामडी, बालाजी कामडी, सुनील कडवे, रत्ना सोनुने, बालाजी वाकडे, बकाराम वाकडे, यशवंत सावसाकडे, विकास वाकडे, मधुकर भोयर, देवनाथ रादये मदनापूर , पांडुरंग वाकडे उपस्थित होते.रब्बी हंगाम वाया जाण्याच्या मार्गावरयंदा जिल्ह्याला हरभरा पिकाच्या प्रमाणित बियाणासाठी २ हजार ६२२ क्विंटल उद्दिष्टे ठेवण्यात आले. मात्र शेतकऱ्यांना हरभरा उपलब्ध होत नसल्याने तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रमाणित हरभरा बियाणे तातडीने देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. दहा-बारा दिवसाचा कालावधी लोटल्यास उत्पन्नावर अनिष्ट परिणाम होण्याचा धोका आहे. पहिल्या टप्प्यात काही शेतकऱ्यांना हरभरा बियाणे दिल्याचे समजते. पण, शेकडो शेतकरी वंचित राहिले. दुसऱ्या टप्प्यात बियाणे येणार की नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. हरभरा बियाणाची वाट बघत आहेत तर काही शेतकऱ्यांना परमिट वाटप करण्यात आले. पेरणीची वेळ निघून गेल्यानंतर काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप