शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा वन अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

येथील मामा तलाव परिसरात वाघाच्या हल्ल्यात माधव पेंदाम व चक्रधर खटू निकुरे या शेतकºयांच्या दोन शेळ्या ठार झाल्याची घटना गुरूवारी घडली. या परिसरात वाघाचा संचार सुरू असल्याने शेतीची कामे रखडली आहेत. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देकवळपेठ परिसरात वाघाची दहशत । तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : वनपरिक्षेत्र अंतर्गत चिचाळा कवळपेठ गट ग्रामपंचायत परिसरातील गावांमध्ये काही दिवसांपासून वाघाची दहशत सुरू आहे. वाघाने हल्ला केल्याने आठ दिवसात दोन जनावरे ठार तर एक व्यक्ती जखमी झाला. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी शेतकºयांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना शुक्रवारी घेराव घातला.चिचाळा व कवळपेठ येथील शेतकरी शेतीची कामे करीत आहेत. काही दिवसात रोवणीलाही सुरूवात होईल. शेतकºयांची शेती जंगलाला लागून आहे. मात्र, परिसरात वाघाचा संचार सुरू असल्याने शेतीची कामे अडचणी आल्याने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रा. पं. सदस्य प्रशांत गट्टुवार यांच्या नेतृत्वात नागेश टिकले, संजय धोडरे, वासुदेव बरांडे, सुभाष वाढई आदींनी चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.शेतीभोवती तारांचे कुंपण घालणारचिचाळा-कवळपेठ परिसरातील शेतकऱ्यांनी दिलेले निवेदन प्राप्त झाले. या भागातील ज्या शेतकऱ्यांची शेती जंगलाला लागून आहे. त्या शेती भोवताल तारा अथवा जाळीचे कुंपण लावण्याबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरकर यांनी ‘लोकमत‘ला दिली.तलावात परिसरात दोन शेळ्या ठारसावरगाव : येथील मामा तलाव परिसरात वाघाच्या हल्ल्यात माधव पेंदाम व चक्रधर खटू निकुरे या शेतकºयांच्या दोन शेळ्या ठार झाल्याची घटना गुरूवारी घडली. या परिसरात वाघाचा संचार सुरू असल्याने शेतीची कामे रखडली आहेत. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.वाघाच्या हल्ल्यात गाय ठारमासळ : वाघाच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या चैती रिठ (टेकाडी मांडवझरी) संरक्षित वनपरिक्षेत्र परिसरात मंगळवारी दुपारी घडली. कोलारा येथील शेतकरी आनंदराव नन्नावरे हे गुरूवारी सकाळी ८ वाजता शेताकडे जात असताना वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु समयसुचकतेने शेतकरी बचावले. कोलारा येथील गुराखी वसंता ढोणे हे ताडोबा लगतच्या जगंलालगत गुरे चारण्यासाठी गेले होते. वाघाने गुरांच्या कळपावर केल्याने गाय ठार झाली. शंकर ढोणे व वसंता जांभूळे यांनी आरडाओरडा केल्याने वाघ पळाला. घटनेची माहिती कोलारा कोअर झोनचे वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांना दिल्यानंतर पंचनामा केला. सातारा येथील अक्षय माळवे यांना भरपाई देण्याची मागणी गावातील शेतकऱ्यांनी वनविभागाकडे निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीforest departmentवनविभाग