शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा वन अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

येथील मामा तलाव परिसरात वाघाच्या हल्ल्यात माधव पेंदाम व चक्रधर खटू निकुरे या शेतकºयांच्या दोन शेळ्या ठार झाल्याची घटना गुरूवारी घडली. या परिसरात वाघाचा संचार सुरू असल्याने शेतीची कामे रखडली आहेत. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देकवळपेठ परिसरात वाघाची दहशत । तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : वनपरिक्षेत्र अंतर्गत चिचाळा कवळपेठ गट ग्रामपंचायत परिसरातील गावांमध्ये काही दिवसांपासून वाघाची दहशत सुरू आहे. वाघाने हल्ला केल्याने आठ दिवसात दोन जनावरे ठार तर एक व्यक्ती जखमी झाला. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी शेतकºयांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना शुक्रवारी घेराव घातला.चिचाळा व कवळपेठ येथील शेतकरी शेतीची कामे करीत आहेत. काही दिवसात रोवणीलाही सुरूवात होईल. शेतकºयांची शेती जंगलाला लागून आहे. मात्र, परिसरात वाघाचा संचार सुरू असल्याने शेतीची कामे अडचणी आल्याने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रा. पं. सदस्य प्रशांत गट्टुवार यांच्या नेतृत्वात नागेश टिकले, संजय धोडरे, वासुदेव बरांडे, सुभाष वाढई आदींनी चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.शेतीभोवती तारांचे कुंपण घालणारचिचाळा-कवळपेठ परिसरातील शेतकऱ्यांनी दिलेले निवेदन प्राप्त झाले. या भागातील ज्या शेतकऱ्यांची शेती जंगलाला लागून आहे. त्या शेती भोवताल तारा अथवा जाळीचे कुंपण लावण्याबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरकर यांनी ‘लोकमत‘ला दिली.तलावात परिसरात दोन शेळ्या ठारसावरगाव : येथील मामा तलाव परिसरात वाघाच्या हल्ल्यात माधव पेंदाम व चक्रधर खटू निकुरे या शेतकºयांच्या दोन शेळ्या ठार झाल्याची घटना गुरूवारी घडली. या परिसरात वाघाचा संचार सुरू असल्याने शेतीची कामे रखडली आहेत. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.वाघाच्या हल्ल्यात गाय ठारमासळ : वाघाच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या चैती रिठ (टेकाडी मांडवझरी) संरक्षित वनपरिक्षेत्र परिसरात मंगळवारी दुपारी घडली. कोलारा येथील शेतकरी आनंदराव नन्नावरे हे गुरूवारी सकाळी ८ वाजता शेताकडे जात असताना वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु समयसुचकतेने शेतकरी बचावले. कोलारा येथील गुराखी वसंता ढोणे हे ताडोबा लगतच्या जगंलालगत गुरे चारण्यासाठी गेले होते. वाघाने गुरांच्या कळपावर केल्याने गाय ठार झाली. शंकर ढोणे व वसंता जांभूळे यांनी आरडाओरडा केल्याने वाघ पळाला. घटनेची माहिती कोलारा कोअर झोनचे वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांना दिल्यानंतर पंचनामा केला. सातारा येथील अक्षय माळवे यांना भरपाई देण्याची मागणी गावातील शेतकऱ्यांनी वनविभागाकडे निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीforest departmentवनविभाग