शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

शासनाच्या उदासीन धोरणामुळेच शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: May 24, 2015 01:58 IST

अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटाशी शेतकरी झुंजत असताना बँकेचे कर्ज व शेती उत्पादन मालाला कमी भाव या सर्व संकटात शेतकरी सापडला ...

चंद्रपूर : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटाशी शेतकरी झुंजत असताना बँकेचे कर्ज व शेती उत्पादन मालाला कमी भाव या सर्व संकटात शेतकरी सापडला असताना शासनाची मदतही शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. त्यात शासनाचे काही धोरणही शेतकऱ्यांविरोधी असल्याने शेवटी नाईलाजाने शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागतो, असे प्रतिपादन आपचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे यांनी केले.आम आदमी पार्टी महाराष्ट्रच्यावतीने १७ ते २४ मे या काळात विदर्भ आणि मराठवाड्यात स्वतंत्रपणे दोन वेगवगळ्या शेतकरी, शेतमजूर संवाद यात्रा काढण्यात आल्या. विदर्भात ही यात्रा अमरावती, वर्धा नंतर चंद्रपूर जिल्ह्यातील खांबाडा येथे १९ मे रोजी दाखल झाली. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या या यात्रेच्या माध्यमातून त्यांच्या घरी जाण्याचा हा प्रयत्न होता. खांबाडा येथील आत्महत्याग्रस्त कुटुंब नत्थू संबा देठे, अंकेश जनार्धन भोयर यांच्या घरी जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घेतली. या परिस्थितीत कसे लढायचे यावर संवाद साधण्यात आला. अशाप्रकारे चिंचाळा, जामणी, पिजदूरा, ताडगव्हान, येन्सा, शेंबळ आदी गावात आपची संवाद यात्रा पोहचली. या यात्रेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी आपली व्यथा सांगितली.त्यानंतर वरोरा येथे सभा पार पडली. सभेला आप पार्टीचे स्थानिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. वरोरा येथील आंबेडकर चौकात ही सभा पार पडली. संवाद यात्रा यशस्वी करण्याकरीता जिल्हा संयोजक अ‍ॅड. किशोर पुसलवार, जिल्हा सचिव दीपक गोंडे, सतीष परचाके, महापालिका संयोजक प्रशांत येरणे, सुनील मुसळे, योगेश आपटे, सुनील भोयर, संदीप पिंपळकर, भिवराज सोनी, परमजीत सिंग, मनोहर पवार आदीसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)