शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

शासनाच्या उदासीन धोरणामुळेच शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: May 24, 2015 01:58 IST

अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटाशी शेतकरी झुंजत असताना बँकेचे कर्ज व शेती उत्पादन मालाला कमी भाव या सर्व संकटात शेतकरी सापडला ...

चंद्रपूर : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटाशी शेतकरी झुंजत असताना बँकेचे कर्ज व शेती उत्पादन मालाला कमी भाव या सर्व संकटात शेतकरी सापडला असताना शासनाची मदतही शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. त्यात शासनाचे काही धोरणही शेतकऱ्यांविरोधी असल्याने शेवटी नाईलाजाने शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागतो, असे प्रतिपादन आपचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे यांनी केले.आम आदमी पार्टी महाराष्ट्रच्यावतीने १७ ते २४ मे या काळात विदर्भ आणि मराठवाड्यात स्वतंत्रपणे दोन वेगवगळ्या शेतकरी, शेतमजूर संवाद यात्रा काढण्यात आल्या. विदर्भात ही यात्रा अमरावती, वर्धा नंतर चंद्रपूर जिल्ह्यातील खांबाडा येथे १९ मे रोजी दाखल झाली. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या या यात्रेच्या माध्यमातून त्यांच्या घरी जाण्याचा हा प्रयत्न होता. खांबाडा येथील आत्महत्याग्रस्त कुटुंब नत्थू संबा देठे, अंकेश जनार्धन भोयर यांच्या घरी जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घेतली. या परिस्थितीत कसे लढायचे यावर संवाद साधण्यात आला. अशाप्रकारे चिंचाळा, जामणी, पिजदूरा, ताडगव्हान, येन्सा, शेंबळ आदी गावात आपची संवाद यात्रा पोहचली. या यात्रेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी आपली व्यथा सांगितली.त्यानंतर वरोरा येथे सभा पार पडली. सभेला आप पार्टीचे स्थानिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. वरोरा येथील आंबेडकर चौकात ही सभा पार पडली. संवाद यात्रा यशस्वी करण्याकरीता जिल्हा संयोजक अ‍ॅड. किशोर पुसलवार, जिल्हा सचिव दीपक गोंडे, सतीष परचाके, महापालिका संयोजक प्रशांत येरणे, सुनील मुसळे, योगेश आपटे, सुनील भोयर, संदीप पिंपळकर, भिवराज सोनी, परमजीत सिंग, मनोहर पवार आदीसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)