शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शासनाच्या उदासीन धोरणामुळेच शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: May 24, 2015 01:58 IST

अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटाशी शेतकरी झुंजत असताना बँकेचे कर्ज व शेती उत्पादन मालाला कमी भाव या सर्व संकटात शेतकरी सापडला ...

चंद्रपूर : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटाशी शेतकरी झुंजत असताना बँकेचे कर्ज व शेती उत्पादन मालाला कमी भाव या सर्व संकटात शेतकरी सापडला असताना शासनाची मदतही शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. त्यात शासनाचे काही धोरणही शेतकऱ्यांविरोधी असल्याने शेवटी नाईलाजाने शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागतो, असे प्रतिपादन आपचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे यांनी केले.आम आदमी पार्टी महाराष्ट्रच्यावतीने १७ ते २४ मे या काळात विदर्भ आणि मराठवाड्यात स्वतंत्रपणे दोन वेगवगळ्या शेतकरी, शेतमजूर संवाद यात्रा काढण्यात आल्या. विदर्भात ही यात्रा अमरावती, वर्धा नंतर चंद्रपूर जिल्ह्यातील खांबाडा येथे १९ मे रोजी दाखल झाली. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या या यात्रेच्या माध्यमातून त्यांच्या घरी जाण्याचा हा प्रयत्न होता. खांबाडा येथील आत्महत्याग्रस्त कुटुंब नत्थू संबा देठे, अंकेश जनार्धन भोयर यांच्या घरी जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घेतली. या परिस्थितीत कसे लढायचे यावर संवाद साधण्यात आला. अशाप्रकारे चिंचाळा, जामणी, पिजदूरा, ताडगव्हान, येन्सा, शेंबळ आदी गावात आपची संवाद यात्रा पोहचली. या यात्रेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी आपली व्यथा सांगितली.त्यानंतर वरोरा येथे सभा पार पडली. सभेला आप पार्टीचे स्थानिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. वरोरा येथील आंबेडकर चौकात ही सभा पार पडली. संवाद यात्रा यशस्वी करण्याकरीता जिल्हा संयोजक अ‍ॅड. किशोर पुसलवार, जिल्हा सचिव दीपक गोंडे, सतीष परचाके, महापालिका संयोजक प्रशांत येरणे, सुनील मुसळे, योगेश आपटे, सुनील भोयर, संदीप पिंपळकर, भिवराज सोनी, परमजीत सिंग, मनोहर पवार आदीसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)