शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

अतिरिक्त बिलामुळे शेतकरी त्रस्त

By admin | Updated: May 25, 2014 23:27 IST

या ना त्या कारणामुळे सतत संकटात असलेल्या शेतकर्‍यांवर आता वीज वितरण कंपनीच्या अनागोंधी कारभारामुळे नवीन आर्थिक संकट घोंघावत आहे. वाजवीपेक्षा जास्त वीज बिल देण्यात येत असल्याने

ंलखमापूर : या ना त्या कारणामुळे सतत संकटात असलेल्या शेतकर्‍यांवर आता वीज वितरण कंपनीच्या अनागोंधी कारभारामुळे नवीन आर्थिक संकट घोंघावत आहे. वाजवीपेक्षा जास्त वीज बिल देण्यात येत असल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

शेतकरी विहिर, बोअरवेल, नदी नाल्यांवर बसविलेल्या वीज मोटारच्या माध्यमातून शेतात सिंचन करतात. उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यात शेतकरी पाण्याचा कमी वापर करतात. वापर कमी असल्याने त्या प्रमाणात वीज बिल येणे अपेक्षित आहे. मात्र शेतकर्‍यांना अतिरिक्त बील देवून वीज वितरण कंपनी शेतकर्‍यांची आर्थिक लुट करीत असल्याचा आरोप कोरपना तालुक्यातील सिंचन करणार्‍या शेतकर्‍यांनी केला आहे. रिडिंगप्रमाणे बिल पाठवले जात नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. कोरपना तालुक्यातील अनेक शेतकरी बोअरवेल व विहिरीतून पाण्याचा उपसा करून सिंचन करतात. मात्र वीज बिलाच्या वाढीव दरामुळे व अतिरिक्त बील वाढ होवून येत असल्याने उत्पादन खर्चाचा विचार करता शेतकर्‍यांच्या पदरात काहीच पडत नसल्याचे चित्र आहे. यातच काही ठिकाणी शेतामध्ये पोल खचलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे वीज पुरवठा बंद आहे. याबाबत शेतकर्‍यांनी वीज कंपनीच्या कार्यालयांना विनंती अर्ज केले. मात्र त्याची कोणीही दखल घेत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहे.

वीज कनेक्शनसाठी वारंवार वीज वितरन कंपनीच्या कार्यालयात जावे लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे.

तालुक्यात गडचांदूर, कोरपना आणि पारडी येथे स्वतंत्र वीज पुरवठा केंद्र आहे. मात्र शेतकर्‍यांना सेवा देताना कुचराई केली जात आहे. कंपनीच्या ठराविक वाढीव दरानुसार बिल पाठवणे अपेक्षित असताना जळालेल्या युनिट पेक्षाही अधिक युनिटचे बील पाठविले जात आहे. वीज कनेक्शन बंद असताना व तसे सदर कार्यालयाला अर्जाद्वारे कळविले असतानाही ३ महिन्याचे बिल २ हजार ५00 ते ३ हजार रुपयापर्यंत पाठविण्यात येत आहे. याबाबत अधिकार्‍यांना विचारना केली असता योग्य उत्तर देण्यात येत नसल्याचेही शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. वीज वितरण कंपनी शेतकर्‍यांची आर्थिक लूट करीत असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)