शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

घामाच्या दामासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष

By admin | Updated: December 6, 2014 22:45 IST

शेतमालाला यावर्षी योग्य दर मिळेल अशी अपेक्षा नविन सरकारकडून शेतकऱ्यांना होती. मात्र सरकारने तोकडा कापूस दर जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांचा वर्षभराचा बजेट कोलमडला आहे.

प्रकाश काळे - गोवरीशेतमालाला यावर्षी योग्य दर मिळेल अशी अपेक्षा नविन सरकारकडून शेतकऱ्यांना होती. मात्र सरकारने तोकडा कापूस दर जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांचा वर्षभराचा बजेट कोलमडला आहे. नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कापूस कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांचा श्वास गुदमरत आहे. भारत कृषी प्रधान देश आहे. महाराष्ट्रात अन्य पिकांसह कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. कापूस शेतकऱ्यांचे नगदी पीक असल्यामुळे लागवड अधिक आहे. नव्या मायबाप सरकारने उत्पादन खर्च न बघता चार हजार ५० रुपये तोकडा कापूस दर जाहीर केला. शासनाची कापूस संकलन केंद्रे सुरू होईल, अशी आस शेतकऱ्यांना होती. मात्र मोजकीच कापूस संकलन केंद्रे सुरू झाली आहेत. त्याचा पुरेपुर फायदा खासगी व्यापाऱ्यांनी उचलला आहे. शेतीवर केलेला खर्च बघता कापूस पिकवून विकू शकत नाही, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. मात्र कापूस घरी ठेऊन शेतकऱ्यांचे भागणार कसे? शेतकऱ्यांना कापूस विकावाच लागतो, अशी पक्की धारणा खासगी व्यापाऱ्यांना आहे. वर्षभर ऊन, वारा, पाऊस, थंडीची तमा न बाळगता शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांची ही अवस्था असेल तर बळीराजाने कुठपर्यंत हाल सहन करायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदरीत शेतकऱ्यांच्या हित पाहणारा असा एकही वाली उरला नाही, असे म्हणण्याची दुदैवी वेळ आली आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. या अधिवेशनात सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किती चर्चा करते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या पीक दरवाढीच्या शेवटचा टप्पा म्हणजे नागपूरचे हिवाळी अधिवेशन असते. शेतकऱ्यांच्या समस्यांवर हिवाळी अधिवेशनात चर्चा केली जाते. शेतकऱ्यांना शेतमालाच्या दरवाढीची अपेक्षा असते. यावर्षी देशाच्या राजकारणात बरीच उपलापालथ झाल्याने शेतकऱ्यांना नवीन सरकारकडून कापूस दवाढीची अपेक्षा असते. जनतेचे लोकप्रतिनिधी शेतकरी प्रश्नावर किती बोलतात, हे पाहणे आता मनोरंजक ठरणार आहे. निवडणूक काळात शेतकऱ्यांवर जीव ओवाळणारे पुढारी शेतकऱ्यांच्या हिताचे कोणते निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.देशात शेतकऱ्यांचे ‘अच्छे दिन’ आणू असे म्हणाणाऱ्या मोदी सरकारनेही तोकडा कापूस दर जाहीर करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे सातत्याने दुष्काळाशी सामना करणारा शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. यासाठी सरकारने योग्य पाऊल उचलून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे आवश्यक आहे.