शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
4
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
5
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
6
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
7
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
8
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
9
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
10
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
11
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
12
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
14
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
15
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
16
सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी
17
लेकीच्या वाढदिवसासाठी गावी आले; अवघ्या चार तासांतच कर्तव्यावर परतले
18
भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
19
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
20
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

घामाच्या दामासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष

By admin | Updated: December 6, 2014 22:45 IST

शेतमालाला यावर्षी योग्य दर मिळेल अशी अपेक्षा नविन सरकारकडून शेतकऱ्यांना होती. मात्र सरकारने तोकडा कापूस दर जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांचा वर्षभराचा बजेट कोलमडला आहे.

प्रकाश काळे - गोवरीशेतमालाला यावर्षी योग्य दर मिळेल अशी अपेक्षा नविन सरकारकडून शेतकऱ्यांना होती. मात्र सरकारने तोकडा कापूस दर जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांचा वर्षभराचा बजेट कोलमडला आहे. नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कापूस कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांचा श्वास गुदमरत आहे. भारत कृषी प्रधान देश आहे. महाराष्ट्रात अन्य पिकांसह कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. कापूस शेतकऱ्यांचे नगदी पीक असल्यामुळे लागवड अधिक आहे. नव्या मायबाप सरकारने उत्पादन खर्च न बघता चार हजार ५० रुपये तोकडा कापूस दर जाहीर केला. शासनाची कापूस संकलन केंद्रे सुरू होईल, अशी आस शेतकऱ्यांना होती. मात्र मोजकीच कापूस संकलन केंद्रे सुरू झाली आहेत. त्याचा पुरेपुर फायदा खासगी व्यापाऱ्यांनी उचलला आहे. शेतीवर केलेला खर्च बघता कापूस पिकवून विकू शकत नाही, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. मात्र कापूस घरी ठेऊन शेतकऱ्यांचे भागणार कसे? शेतकऱ्यांना कापूस विकावाच लागतो, अशी पक्की धारणा खासगी व्यापाऱ्यांना आहे. वर्षभर ऊन, वारा, पाऊस, थंडीची तमा न बाळगता शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांची ही अवस्था असेल तर बळीराजाने कुठपर्यंत हाल सहन करायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदरीत शेतकऱ्यांच्या हित पाहणारा असा एकही वाली उरला नाही, असे म्हणण्याची दुदैवी वेळ आली आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. या अधिवेशनात सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किती चर्चा करते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या पीक दरवाढीच्या शेवटचा टप्पा म्हणजे नागपूरचे हिवाळी अधिवेशन असते. शेतकऱ्यांच्या समस्यांवर हिवाळी अधिवेशनात चर्चा केली जाते. शेतकऱ्यांना शेतमालाच्या दरवाढीची अपेक्षा असते. यावर्षी देशाच्या राजकारणात बरीच उपलापालथ झाल्याने शेतकऱ्यांना नवीन सरकारकडून कापूस दवाढीची अपेक्षा असते. जनतेचे लोकप्रतिनिधी शेतकरी प्रश्नावर किती बोलतात, हे पाहणे आता मनोरंजक ठरणार आहे. निवडणूक काळात शेतकऱ्यांवर जीव ओवाळणारे पुढारी शेतकऱ्यांच्या हिताचे कोणते निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.देशात शेतकऱ्यांचे ‘अच्छे दिन’ आणू असे म्हणाणाऱ्या मोदी सरकारनेही तोकडा कापूस दर जाहीर करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे सातत्याने दुष्काळाशी सामना करणारा शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. यासाठी सरकारने योग्य पाऊल उचलून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे आवश्यक आहे.