शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

धान वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By admin | Updated: October 10, 2015 00:17 IST

तालुक्यात प्रचंड उष्णतेमुळे पीक करपायला लागले आहे. पिकाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असून शेतीजवळ ....

पाण्याचे संकट : उष्णतेमुळे पीक लागले करपायलासिंदेवाही : तालुक्यात प्रचंड उष्णतेमुळे पीक करपायला लागले आहे. पिकाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असून शेतीजवळ असलेल्या विविध पाणी स्त्रोतून आईल इंजिनच्या साहाय्याने पिकांसाठी पाणी देण्याचे काम सध्या शेतकरी रात्रंदिवस करीत आहे.तालुक्यात सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे खरीप हंगामात पावसाच्या भरवशावर शेतकरी धानाचे पीक घेतात. अशा परिस्थितीत शेतकरी शेताजवळून वाहणारी नदी, नाले, बोडी, तलाव आदीमधून इंजिन व वीज पंपाद्वारे पाणी घेत असतात. यावर्षी पावसाळ्यात पाऊस कमी झाला. दरवर्षी पेक्षा पाऊस कमी पडल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. अनेक शेतांमध्ये पाणी नसल्या कारणाने रोवणीच झाली नाही. ज्यांनी विलंबाने रोवणी केली. त्यात धानाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. सध्या मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. उन्हाच्या काहिलीने धान पीक करपू लागले आहे. ते जगविण्यासाठी शेतकरी नाले, नदी आदी स्त्रोतांद्वारे पाणी दिले जात आहे. काही भागात धानावर विविध रोगांचा थैमान असून शेतकरी त्रस्त आहेत. शासनाने तालुका दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)