शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

पेल्लोरा येथे शेतकऱ्यांनी सुरू केला ‘गुळाचा’ लघु उद्योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:26 IST

जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग : शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरणार प्रकाश काळे, गोवरी : निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नाही. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांची ...

जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग

: शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरणार

प्रकाश काळे,

गोवरी

:

निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नाही. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांची नेहमीच होरपळ झाली आहे. काळानुरूप शेतातील पीक पद्धतीत बदल होणे आवश्यक आहे, राजुरा तालुक्यातील पेल्लोरा येथील प्रयोगशील शेतकरी गजानन जुनघरी यांनी यावर्षी पारंपरिक पीक पद्धतीला बगल देत नैसर्गिक शेती करीत ऊस लागवड करून गुळाचा लघु कारखाना सुरू केला आहे.

जिल्ह्यातील पहिला गुळाचा लघु कारखाना उभारून इतर शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.

चंद्रपूर जिल्हा हा काळे सोने (कोळसा) व पांढरे (कपाशी) सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. यात राजुरा तालुक्यात बहुतांश जमिनीवर वेकोलिने जाळे पसरविले आहे तर उर्वरित शेतजमिनीवर जास्तीत जास्त शेतकरी पांढऱ्या सोन्याचे उत्पादन घेत आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून वाढत असलेला गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव यामुळे होत असलेले शेतकऱ्यांचे नुकसान, निसर्गाचे अस्मानी सुलतानी संकट, दरवर्षी होत असलेली नापिकी यामुळे उत्पन्नापेक्षा लागवड खर्च जास्त असल्याने शेतकरी वर्ग पर्यायी पिकांकडे वळले आहे. पेल्लोरा येथील जुनघरी यांनी नैसर्गिक शेतीसंबंधी अमरावती येथील पद्मश्री सुभाष पाळेकर यांचे मार्गदर्शन घेऊन सतीश पिंपळे यांच्या सल्ल्यानुसार मागील वर्षी पंधरा हजार रुपये खर्च करून दोन एकर शेतामध्ये माउली नावाच्या उसाची लागवड केली. शेतात लागवड केलेल्या उसाची मळणी करून ऊस दुसऱ्याला विकण्यापेक्षा स्वतःजवळ असलेले भांडवल लावून शेतात गूळ तयार करण्याचा लघु कारखाना सुरु केला.

बॉक्स

दोन एकरातून पाच टन गूळ

गजानन जुनघरी यांनी कवडु वडस्कर (मोहुर्ली), सुनील उमरे (नंदोरी) यांच्या मदतीने आठ लाख रुपये खर्च करून गूळ तयार करण्यासाठी आवश्यक असलेले यंत्र, साचे, टप, कढई, बाॅयलर व इतर साहित्य खरेदी करून कारखाना सुरु केला आहे.

जुनघरी यांना दोन एकर उसापासून तीन लाख रुपये किमतीच्या पाच टन गूळ निर्यातीची अपेक्षा आहे.

बॉक्स

रसायनाचा वापर नाही

गूळ तयार करीत असताना यात कोणत्याही रसायनाचा वापर न करता विलायची, अद्रक व जायफळ टाकून शुद्ध नैसर्गिक गुळाची निर्मिती केली जात आहे.

मानवी जीवनात गुळाचे महत्व वाढले असून आरोग्यासाठी साखरेपेक्षा गुळाला अधिक पसंती असल्याने गुळाच्या विक्रीमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. गुळाला वाढती मागणी पाहता जुनघरी यांनी हा प्रयोग सुरू केला असून सध्या परिसरात या गुळाला मागणी वाढली आहे. शेतामध्येच ८० ते ८५ रुपये प्रति किलो दराने विक्री केली जात आहे.

कोट

पारंपरिक पीक पद्धतीमुळे शेतात फायदा कमी व नुकसान जास्त यामुळे नवीन प्रयोग म्हणून ऊस लागवड व गूळ तयार करण्याबद्दल माहिती घेऊन मित्राच्या मदतीने कोणतेही कर्ज न घेता जवळ असलेले भांडवल गुंतवून नैसर्गिक गूळ तयार करण्याचा लघु कारखाना (गुऱ्हाळ) सुरू केला आहे. यात निश्चितच कमी खर्चात जास्त नफा मिळणार आहे,

-गजानन जुनघरी, प्रगतशील गूळ उद्योजक शेतकरी, पेल्लोरा.