शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

जिद्दीच्या बळावर शेतकरी पुत्राने उभारला ‘पोल्ट्री फार्म’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:20 IST

पॉझिटिव्ह स्टोरी शेतीला व्यवसायाची जोड : युवकांनी स्वयंरोजगार करावा प्रकाश काळे गोवरी - शेती बेभरवशाची झाली आहे. उत्पादन खर्च ...

पॉझिटिव्ह स्टोरी

शेतीला व्यवसायाची जोड : युवकांनी स्वयंरोजगार करावा

प्रकाश काळे

गोवरी -

शेती बेभरवशाची झाली आहे. उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे. मात्र शेतीला जोड धंदा म्हणून आधार व्हावा, यासाठी राजुरा तालुक्यातील गोवरी येथील शेतकरी पुत्र निखिल गणपत लांडे ( २८) यांनी आपल्या शेतात पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करून हक्काचा स्वयंरोजगार निर्माण केला आहे.

निसर्ग साथ देत नाही, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला तयार नाही. शेतीवर खर्च करूनही अपेक्षित उत्पादन होत नाही. त्यामुळे शेतीला उतरती कळा आली आहे. आपल्या घरी शेती आहे. परंतु शेतीला पूरक जोडधंदा करावा,यासाठी गोवरी येथील निखिल गणपत लांडे या शेतकरी पुत्राने आपल्या शेतातच ‘पोल्ट्री फार्म’ व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी विविध प्रकारच्या जातीची कोंबड्यांची पिल्ले आणली असून ती पिल्ले मोठी झाल्यानंतर त्यांना यातून चांगला नफा मिळत आहे. आजघडीला त्यांच्याकडे लहानमोठी ८०० कोंबड्यांची पिल्ले आहेत. मोठ्या मेहनतीने ते पिल्लांची देखभाल करतात. पिल्लांच्या चारा-पाण्यासाठी त्यांनी विशिष्ट प्रकारची सिस्टिम वापरली आहे. विविध प्रकारच्या जातीची पिल्लं त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली आहे. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या निखिल लांडे यांनी अल्पावधीतच व्यवसायाची भरभराट केली आहे. पोल्ट्री फार्म व्यवसायाचे त्यांनी केलेले नियोजन पाहण्यासाठी दूरवरून नागरिक माहिती घेण्यासाठी पोल्ट्री फार्मला भेट देत आहे. कुठेही नोकरीसाठी शोधाशोध न करता स्वतःच त्यांनी स्वयंरोजगार निर्माण करीत जिद्द, चिकाटी आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर त्यांचा पोल्ट्री फार्मचा व्यवसाय जोड धंदा म्हणून नक्कीच शेतीला बळ देणारा आहे. शेती बेभरवशाची झाल्याने युवकांनी शेतीला जोड धंदा म्हणून विविध प्रकारचे व्यवसाय सुरू केल्यास स्वयंरोजगार निर्माण करता येईल. त्यामुळे युवकांनी व्यवसायाकडे वळावे असेही निखिल लांडे यांनी सांगितले.

कोट

निसर्ग साथ देत नाही. शेतीवर केलेला खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे शेतीला उतरती कळा आली आहे. बेरोजगारीची बिकट समस्या आजच्या युवकांसमोर उभी आहे. प्रत्येक युवकांनी स्वयंरोजगार निर्माण केल्यास बेरोजगारीची समस्या दूर होईल. सोबतच शेतीला जोड धंदा म्हणून मी पोल्ट्री फार्मचा व्यवसाय सुरू केला आहे.

-निखिल गणपत लांडे,

युवा पोल्ट्री फार्म व्यवसायिक, गोवरी.